शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

छोट्या नव्हे, मोठ्या शहरांत कॅन्सरचा धोका अधिक; ही घ्या काळजी...

By संतोष हिरेमठ | Updated: February 4, 2025 11:25 IST

जागतिक कर्करोग दिन विशेष: मुंबई सर्वाधिक चिंतादायक, छत्रपती संभाजीनगरातही वाढतेय प्रमाण

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर म्हटला की धडकी भरते. पण अत्याधुनिक उपचारांमुळे कर्करोगावर यशस्वीपणे उपचार घेणे शक्य आहे. कॅन्सरची लागण वाढत आहे. एका अहवालातून छोट्या शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सर्वाधिक चिंतादायक स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरातही कॅन्सरचा धोका वाढत आहे.

दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो. यानिमित्त विविध माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती केली जाते. राष्ट्रीय लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रमाद्वारे राज्यातील माहिती संकलित करण्यात येते. यातून जाहीर केलेल्या एका अहवालात राज्यातील वेगवेगळ्या शहरांत ७४ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना कर्करोग होण्याच्या धोक्यासंदर्भात प्रमाण नमूद आहे.

ही घ्या काळजी...- तंबाखू व धूम्रपान टाळणे.- नियमित आरोग्य तपासणी.- संतुलित आहार व योग्य व्यायाम.- ताणतणाव कमी.- प्रदूषण नियंत्रणावर भर.

कुठे किती कर्करोगाचा धोका?शहर/जिल्हा - पुरुषांना कर्करोगाचा धोका - महिलांना कर्करोगाचा धोका -मुंबई - ९ पैकी १ - ८ पैकी १नागपूर - १० पैकी १ - ११ पैकी १पुणे - ११ पैकी १ - १० पैकी १छत्रपती संभाजीनगर - १३ पैकी १ - १२ पैकी १वर्धा जिल्हा - १४ पैकी १ - १४ पैकी १बार्शी ग्रामीण - १७ पैकी १ - १५ पैकी १बीड-धाराशिव - २३ पैकी १ - १९ पैकी १

अतिप्रक्रियायुक्त अन्नपदार्थ टाळातंबाखूचा वापर आणि मद्यसेवन टाळण्याव्यतिरिक्त, अतिप्रक्रियायुक्त अन्न, स्थूलता आणि सूक्ष्म प्लास्टिक, कीटकनाशके व रसायनांनी दूषित होऊ शकणारे अन्न टाळावे. स्थूलत्व आणि अतिप्रक्रियायुक्त अन्नाचे दुष्परिणाम होतात.- डाॅ. अनुप तोष्णीवाल, कॅन्सरतज्ज्ञ

निदान सोपेसोनोग्राफी आणि सीटी स्कॅनमुळे कर्करोगाचे लवकर निदान होते. सोनोग्राफीमुळे स्तनातील गाठींचे स्वरूप आणि त्यांचा प्रकार ओळखणे सोपे जाते.- डॉ. राहुल रोजेकर, रेडिओलॉजिस्ट

जोखमीचे घटकतंबाखूचे सेवन, मद्यपान आणि लठ्ठपणा हे कॅन्सरवाढीमागे जोखमीचे घटक आहेत. त्याबरोबरच वाढते हवेचे प्रदूषण, भाज्या, फळांचे कमी सेवन हेही कारणीभूत ठरतेय.- डॉ. अर्चना राठोड, स्त्री कर्करोग विभाग प्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय

मात शक्यप्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. रुग्णाच्या स्थितीनुसार उपचारांवर भर द्यावा लागतो. कॅन्सरमधून बाहेर पडू, हा विश्वास रुग्णांनी ठेवला पाहिजे. उपचार घेऊन कॅन्सरवर मात करता येते.- डाॅ. वरुण नागोरी, कॅन्सरतज्ज्ञ

मी हरले नाहीकेमोथेरपीमुळे मी माझे केस गमावले, पण जिद्द गमावली नाही. मी ठरवले की, या आजाराला हरवायचेच. आता ठणठणीत आहे. इतर रुग्णांना मानसिक आधार देते.- एक कॅन्सरग्रस्त

टॅग्स :cancerकर्करोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य