शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

छोट्या नव्हे, मोठ्या शहरांत कॅन्सरचा धोका अधिक; ही घ्या काळजी...

By संतोष हिरेमठ | Updated: February 4, 2025 11:25 IST

जागतिक कर्करोग दिन विशेष: मुंबई सर्वाधिक चिंतादायक, छत्रपती संभाजीनगरातही वाढतेय प्रमाण

छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर म्हटला की धडकी भरते. पण अत्याधुनिक उपचारांमुळे कर्करोगावर यशस्वीपणे उपचार घेणे शक्य आहे. कॅन्सरची लागण वाढत आहे. एका अहवालातून छोट्या शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सर्वाधिक चिंतादायक स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरातही कॅन्सरचा धोका वाढत आहे.

दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो. यानिमित्त विविध माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती केली जाते. राष्ट्रीय लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रमाद्वारे राज्यातील माहिती संकलित करण्यात येते. यातून जाहीर केलेल्या एका अहवालात राज्यातील वेगवेगळ्या शहरांत ७४ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना कर्करोग होण्याच्या धोक्यासंदर्भात प्रमाण नमूद आहे.

ही घ्या काळजी...- तंबाखू व धूम्रपान टाळणे.- नियमित आरोग्य तपासणी.- संतुलित आहार व योग्य व्यायाम.- ताणतणाव कमी.- प्रदूषण नियंत्रणावर भर.

कुठे किती कर्करोगाचा धोका?शहर/जिल्हा - पुरुषांना कर्करोगाचा धोका - महिलांना कर्करोगाचा धोका -मुंबई - ९ पैकी १ - ८ पैकी १नागपूर - १० पैकी १ - ११ पैकी १पुणे - ११ पैकी १ - १० पैकी १छत्रपती संभाजीनगर - १३ पैकी १ - १२ पैकी १वर्धा जिल्हा - १४ पैकी १ - १४ पैकी १बार्शी ग्रामीण - १७ पैकी १ - १५ पैकी १बीड-धाराशिव - २३ पैकी १ - १९ पैकी १

अतिप्रक्रियायुक्त अन्नपदार्थ टाळातंबाखूचा वापर आणि मद्यसेवन टाळण्याव्यतिरिक्त, अतिप्रक्रियायुक्त अन्न, स्थूलता आणि सूक्ष्म प्लास्टिक, कीटकनाशके व रसायनांनी दूषित होऊ शकणारे अन्न टाळावे. स्थूलत्व आणि अतिप्रक्रियायुक्त अन्नाचे दुष्परिणाम होतात.- डाॅ. अनुप तोष्णीवाल, कॅन्सरतज्ज्ञ

निदान सोपेसोनोग्राफी आणि सीटी स्कॅनमुळे कर्करोगाचे लवकर निदान होते. सोनोग्राफीमुळे स्तनातील गाठींचे स्वरूप आणि त्यांचा प्रकार ओळखणे सोपे जाते.- डॉ. राहुल रोजेकर, रेडिओलॉजिस्ट

जोखमीचे घटकतंबाखूचे सेवन, मद्यपान आणि लठ्ठपणा हे कॅन्सरवाढीमागे जोखमीचे घटक आहेत. त्याबरोबरच वाढते हवेचे प्रदूषण, भाज्या, फळांचे कमी सेवन हेही कारणीभूत ठरतेय.- डॉ. अर्चना राठोड, स्त्री कर्करोग विभाग प्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय

मात शक्यप्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. रुग्णाच्या स्थितीनुसार उपचारांवर भर द्यावा लागतो. कॅन्सरमधून बाहेर पडू, हा विश्वास रुग्णांनी ठेवला पाहिजे. उपचार घेऊन कॅन्सरवर मात करता येते.- डाॅ. वरुण नागोरी, कॅन्सरतज्ज्ञ

मी हरले नाहीकेमोथेरपीमुळे मी माझे केस गमावले, पण जिद्द गमावली नाही. मी ठरवले की, या आजाराला हरवायचेच. आता ठणठणीत आहे. इतर रुग्णांना मानसिक आधार देते.- एक कॅन्सरग्रस्त

टॅग्स :cancerकर्करोगchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य