शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

पाणीपट्टीतील दरवाढ रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:45 IST

वाढीव पाणीपट्टीचे आदेश त्वरित रद्द करा, असे आदेश शनिवारी सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले.

औरंगाबाद : पाणीपट्टीत एक रुपयाही वाढ करू नये, असे आदेश सर्वसाधारण सभेने दिलेले असतानाही मनपा प्रशासनाने तब्बल दहा टक्के वाढ केली. ४ हजार ४० रुपयांवरून नागरिकांना आता ४ हजार ४७७ रुपये भरावे लागत आहेत. वाढीव पाणीपट्टीचे आदेश त्वरित रद्द करा, असे आदेश शनिवारी सर्वसाधारण सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले.

समांतरच्या कंत्राटदारासाठी महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी नियमावली तयार केली होती. या नियमावलीला शासनाची मंजुरी घेतली होती. या नियमावलीनुसार प्रत्येक वर्षी पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. समांतरच्या कंपनीची हकालपट्टी झाली असली, तरी नियमावली अद्याप जशास तशी आहे. त्यानुसार दरवर्षी पाणीपट्टीत दहा टक्के वाढ करण्यात येत आहे.

विशेष बाब म्हणजे सर्वसाधारण सभेने ही दरवाढ रद्द करण्याचा ठराव सहा महिन्यांपूर्वी घेतला आहे. तरी यंदा प्रशासनाने पाणीपट्टी ४४७७ रुपये केली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शनिवारी सर्वसाधारण सभेत महापौरांनी हा विषय उपस्थित केला.

सध्या शहरात पाणीटंचाई आहे. त्यात पाणीपट्टीत वाढ करणे योग्य नाही. यासंदर्भात आयुक्तांशी बोलणे झालेले आहे. त्यामुळे वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यात येत आहे, असे शुद्धीपत्रक उद्याच प्रसिद्धीस देण्यात यावे, असे आदेश पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना महापौरांनी दिले. सर्वसाधारण सभेला अवघ्या ७ नगरसेवकांची उपस्थिती होती. गणपूर्तीअभावी महापौरांनी सभा आटोपती घेतली.

 

टॅग्स :WaterपाणीAurangabadऔरंगाबाद