शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण

By साहेबराव हिवराळे | Updated: June 23, 2024 18:12 IST

दिवसभर टाळ वाजवून उपोषणकर्ते यांनी केले भजन

छत्रपती संभाजीनगर : ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ...मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, ‘साताऱ्याचा खंडोबा.... शासनाला बुद्दी द्या...’,‘मनपाच्या आयुक्ता.. गुंठेवारी रद्द करा....’ अशा एक ना अनेक घोषणा देत गुंठेवारी कायद्याच्या विरोधात रविवारी (दि.२३) सातारादेवळाई परिसरातील नागरिकांनी नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली उपोषण करत भजनं गायले.

सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी आंदोलन दरम्यान सांगितले की, आम्ही स्वतः हक्काची जमीन खरेदी करीत सर्व नियमांचे पालन केले, त्यानंतरच घरे बांधली. आता गुंठेवारी सारखा रजाकरी कायदाआमच्यावर लागू केला हा कायदा रद्द करा यासाठी आम्ही दिवसभर टाळ वाजवून, भजन गात, घोषणा देत, उपोषणही केले. या कठोर गुंठेवारी कायद्याला रद्द करून आम्हाला निवांत जगू द्या अशी आमची ही मागणी शासनापर्यंत, मनपापर्यंत पोहचावी यासाठी हे अनोखे आंदोलन केले आहे.

दिवसभर आंदोलनस्थळी यांनी दिल्या भेटी....यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले,सुदाम सोनवणे,विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे,बाळू गायकवाड,रमेश गायकवाड, हरिभाऊ हिवाळे,राजू शिंदे,खाजाभाई यांच्यासह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी येऊन गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न करता येईल आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. पालकमंत्री यांनी दोन जुलैला मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बैठक लावण्याचे मार्गदर्शनात सांगितले.

दिवसभर टाळ,घोषणाबाजी नंतर इशारानागरिकांनी यावेळी ‘आश्वासन नको तर प्रत्यक्ष कृती हवी’, अशी अपेक्षा व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत रोष व्यक्त केला जाईल असा इशाराही देण्यात आला. याशिवाय मनपाच्या अधिकारीवर्गानेही याकडे लक्ष द्यावे आवाहन करण्यात आले.

यांनी घेतला सहभागरविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५वाजेपर्यंत सातारा देवळाई भागातील नागरिक लाक्षणिक उपोषण बीड बायपास रोड जबिंदा मैदान जवळ पुलाखाली बसलेले होते. लवकर निर्णय घ्या अन्यथा आंदोलन मिश्र करण्याचा इशारा सातारा देवळाई भागातील संयोजन समितीचे रवींद्र पिंगळीकर, सविता कुलकर्णी, प्रा.स्मिता अवचार,प्रा एकनाथ साळुंके , लक्ष्मन शिंदे,असद पटेल, ॲड सुधीर कुलकर्णी,राजेंद्र कुमावत, राजेंद्र फिरोदिया,प्रा भारती भांडेकर, कल्पना राजपूत,मारोती वीर,आर.डि भुकेले, आबासाहेब देशमुख, महेश चिद्रवार, पद्मसिंह राजपुत, शरद देशपांडे, अनंत सोन्नेकर, नामदेव पवार,दिलीप भोपे, अश्विनी बेंद्रे,अनिरुद्ध जागीरदार , सुनिल गुट्टे, मीनल ईप्पर,बाजीराव गाडे, अँड . क्षितिज रोडे, अंबादास रगडे, अशोक तिनगोटे, ज्ञानेश्वर बोरसे  यांनी दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद