शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, गुंठेवारी कायद्याविरोधात सातारा देवळाईतील नागरिकांचे उपोषण

By साहेबराव हिवराळे | Updated: June 23, 2024 18:12 IST

दिवसभर टाळ वाजवून उपोषणकर्ते यांनी केले भजन

छत्रपती संभाजीनगर : ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ...मुंबईच्या एकनाथा गुंठेवारी रद्द करा’, ‘साताऱ्याचा खंडोबा.... शासनाला बुद्दी द्या...’,‘मनपाच्या आयुक्ता.. गुंठेवारी रद्द करा....’ अशा एक ना अनेक घोषणा देत गुंठेवारी कायद्याच्या विरोधात रविवारी (दि.२३) सातारादेवळाई परिसरातील नागरिकांनी नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाखाली उपोषण करत भजनं गायले.

सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांनी आंदोलन दरम्यान सांगितले की, आम्ही स्वतः हक्काची जमीन खरेदी करीत सर्व नियमांचे पालन केले, त्यानंतरच घरे बांधली. आता गुंठेवारी सारखा रजाकरी कायदाआमच्यावर लागू केला हा कायदा रद्द करा यासाठी आम्ही दिवसभर टाळ वाजवून, भजन गात, घोषणा देत, उपोषणही केले. या कठोर गुंठेवारी कायद्याला रद्द करून आम्हाला निवांत जगू द्या अशी आमची ही मागणी शासनापर्यंत, मनपापर्यंत पोहचावी यासाठी हे अनोखे आंदोलन केले आहे.

दिवसभर आंदोलनस्थळी यांनी दिल्या भेटी....यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी खा.चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले,सुदाम सोनवणे,विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे,बाळू गायकवाड,रमेश गायकवाड, हरिभाऊ हिवाळे,राजू शिंदे,खाजाभाई यांच्यासह विविध राजकीय पदाधिकाऱ्यांनी येऊन गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काय प्रयत्न करता येईल आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले. पालकमंत्री यांनी दोन जुलैला मुख्यमंत्र्यांसोबत याविषयी बैठक लावण्याचे मार्गदर्शनात सांगितले.

दिवसभर टाळ,घोषणाबाजी नंतर इशारानागरिकांनी यावेळी ‘आश्वासन नको तर प्रत्यक्ष कृती हवी’, अशी अपेक्षा व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत रोष व्यक्त केला जाईल असा इशाराही देण्यात आला. याशिवाय मनपाच्या अधिकारीवर्गानेही याकडे लक्ष द्यावे आवाहन करण्यात आले.

यांनी घेतला सहभागरविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५वाजेपर्यंत सातारा देवळाई भागातील नागरिक लाक्षणिक उपोषण बीड बायपास रोड जबिंदा मैदान जवळ पुलाखाली बसलेले होते. लवकर निर्णय घ्या अन्यथा आंदोलन मिश्र करण्याचा इशारा सातारा देवळाई भागातील संयोजन समितीचे रवींद्र पिंगळीकर, सविता कुलकर्णी, प्रा.स्मिता अवचार,प्रा एकनाथ साळुंके , लक्ष्मन शिंदे,असद पटेल, ॲड सुधीर कुलकर्णी,राजेंद्र कुमावत, राजेंद्र फिरोदिया,प्रा भारती भांडेकर, कल्पना राजपूत,मारोती वीर,आर.डि भुकेले, आबासाहेब देशमुख, महेश चिद्रवार, पद्मसिंह राजपुत, शरद देशपांडे, अनंत सोन्नेकर, नामदेव पवार,दिलीप भोपे, अश्विनी बेंद्रे,अनिरुद्ध जागीरदार , सुनिल गुट्टे, मीनल ईप्पर,बाजीराव गाडे, अँड . क्षितिज रोडे, अंबादास रगडे, अशोक तिनगोटे, ज्ञानेश्वर बोरसे  यांनी दिला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद