शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई आॅनलाईन प्रवेश अर्जात बदल करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:01 IST

शाळांमध्ये मूलभूत शिक्षण हक्क (आरटीई)अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश झाले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सोडतपूर्वी काही अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची व्यवस्था शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे.

औरंगाबाद : शाळांमध्ये मूलभूत शिक्षण हक्क (आरटीई)अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश झाले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सोडतपूर्वी काही अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची व्यवस्था शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. याविषयीचे आदेश शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.आरटीई प्रवेशांतर्गत पहिल्या फेरीची सोडत ८ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. यामध्ये प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीद्वारे कागदपत्रांची तपासणी करून शाळेत जाऊन प्रवेश घेतले. पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसºया फेरीची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी पालकांना अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला मात्र कन्फर्म केला नाही, त्यांना ही कन्फर्म करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या पालकांचा क्रमांक पहिल्या फेरीत लागला नाही. त्यांचे गुगल लॉगीन चुकले असल्यास ते दुरुस्त करता येईल. त्यात दुरुस्त करताना शाळांची निवड नव्याने करावी लागणार आहे. मात्र, त्यात नाव आणि जन्मतारखेत काहीही बदल करता येणार नाही. ही दुरुस्ती २९ मे पासून ४ जूनपर्यंत करता येणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.चौकटयावर्षीही प्रवेश प्रक्रिया लांबणारमागील वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत लांबल्यामुळे शेकडो जागा रिक्त राहिल्या होत्या. प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे इच्छुक पालकांनी आरटीई प्रवेशाऐवजी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्रवेश घेऊन टाकले. यावर्षीही मे महिना संपला तरी फक्त पहिली फेरी पूर्ण झाली आहे. दुसºया फेरीची सोडत केव्हा निघणार याविषयी अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया लांबणार असल्याचे स्पष्ट झाले. ही प्रक्रिया लांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता