शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आरटीई आॅनलाईन प्रवेश अर्जात बदल करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:01 IST

शाळांमध्ये मूलभूत शिक्षण हक्क (आरटीई)अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश झाले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सोडतपूर्वी काही अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची व्यवस्था शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे.

औरंगाबाद : शाळांमध्ये मूलभूत शिक्षण हक्क (आरटीई)अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या सोडतीनंतर प्रवेश झाले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्या सोडतपूर्वी काही अर्जांमधील तांत्रिक त्रुटी दूर करण्याची व्यवस्था शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. याविषयीचे आदेश शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.आरटीई प्रवेशांतर्गत पहिल्या फेरीची सोडत ८ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. यामध्ये प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीद्वारे कागदपत्रांची तपासणी करून शाळेत जाऊन प्रवेश घेतले. पहिल्या फेरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दुसºया फेरीची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. त्यापूर्वी पालकांना अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार आहे. यात ज्या पालकांनी अर्ज भरला मात्र कन्फर्म केला नाही, त्यांना ही कन्फर्म करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्या पालकांचा क्रमांक पहिल्या फेरीत लागला नाही. त्यांचे गुगल लॉगीन चुकले असल्यास ते दुरुस्त करता येईल. त्यात दुरुस्त करताना शाळांची निवड नव्याने करावी लागणार आहे. मात्र, त्यात नाव आणि जन्मतारखेत काहीही बदल करता येणार नाही. ही दुरुस्ती २९ मे पासून ४ जूनपर्यंत करता येणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.चौकटयावर्षीही प्रवेश प्रक्रिया लांबणारमागील वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया दिवाळीपर्यंत लांबल्यामुळे शेकडो जागा रिक्त राहिल्या होत्या. प्रवेश प्रक्रियेला उशीर झाल्यामुळे इच्छुक पालकांनी आरटीई प्रवेशाऐवजी विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्रवेश घेऊन टाकले. यावर्षीही मे महिना संपला तरी फक्त पहिली फेरी पूर्ण झाली आहे. दुसºया फेरीची सोडत केव्हा निघणार याविषयी अद्यापही स्पष्टता नाही. त्यामुळे यावर्षी प्रवेश प्रक्रिया लांबणार असल्याचे स्पष्ट झाले. ही प्रक्रिया लांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षणRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता