शहरं
Join us  
Trending Stories
1
जिनाच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात
2
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
3
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
4
या पॉश रस्त्याला दिले जाणार डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव! ते ही भारतात...; मुख्यमंत्र्यांची घोषणा अन् भाजपा भडकली...  
5
IndiGo: मोठी बातमी! इंडिगो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा तातडीने सुनावणी करण्यास नकार
6
मोठी बातमी! कुख्यात 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; महाराष्ट्र-छत्तीसगड-मध्य प्रदेश नक्षलमुक्त
7
तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
8
आधार कार्ड खाली पडलं अन् झाली पोलखोल; सौरभ बनून फैजानने अडकवलेलं प्रेमाच्या जाळ्यात
9
IPL ला हलक्यात घेणाऱ्यांना लिलावात भाव देऊ नका! 'त्या' परदेशी खेळाडूंवर भडकले गावसकर, म्हणाले...
10
Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा
11
अलर्ट! 'या' ४ समस्या दिसल्यास त्वरित बदला तुमचा स्मार्टफोन; नाहीतर होईल मोठे नुकसान!
12
भारतासाठी गेमचेंजर ठरणार 'हा' नवा कॉरिडोर; रशियाला ४० दिवसांऐवजी आता २४ दिवसांत सामान पोहचणार
13
रुपया पुन्हा घसरला! डॉलरच्या तुलनेत ९०.११ च्या नीचांकी स्तरावर; महत्त्वाचं कारण आलं समोर
14
इंडिगोची कार्यसंस्कृती अशी आहे...? माजी कर्मचाऱ्याचे ओपन लेटर व्हायरल; '₹18,000 पगारात 3 लोकांचे काम'
15
काश्मीरमध्ये विनापरवाना फिरताना सापडला चिनी नागरिक, फोनमधून समोर आली धक्कादायक माहिती
16
Nagpur: वाघांना माणूस खाऊ घालणारी ही कसली वनपर्यटनाची नीती? दहशतीत जगणाऱ्या विदर्भातील माणसांचा सवाल
17
दुभाजक ओलांडताना धडक, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू; पतीसह चालक गंभीर जखमी
18
Psycho Killer Poonam : "माझ्या मुलीसारखं पूनमलाही तडफडून-तडफडून मारा"; जियाच्या आईचा सायको किलरबद्दल मोठा खुलासा
19
ऑनलाईन गेम खेळताना गमावले ६३ हजार; २६ वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, म्हणाली...
20
Haridwar: बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या शौर्य यात्रेवर दगडफेक, कार्यकर्त्यांचा रस्त्यावर गोंधळ!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: May 11, 2024 20:07 IST

आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आहे. 13 तारखेला मतदान होणार आहे. यासाठी, आता सध्या पडत असलेल्या रणरणत्या उन्हात, औरंगाबादच्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणणे सर्वच पक्षांसमोरील मोठे आव्हान अहे.

श्रीकृष्ण अंकुश -यावेळच्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध एआयएमआयएम, अशी चुरशीची लढत होत आहे. महत्वाचे म्हणजे, येथे पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना, सामना रंगला आहे. AIMIMचे नेते खासदार इम्तियाज जलील, शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे हे तीनही नेते तुल्यबळ असल्याचे मानले जात आहे. कोण जिंकेल? हे सांगणे कठीण आहे. एवढी अटीतटीची लढाई असतानाही, प्रचारात मात्र कुठल्याही पक्षाचा जोर बघायला मिळाला नाही. यातच, आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला. यामुळे आता 13 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी ठरणार आणि कुणाला फायदा होणार? हे बघण्यासारखे असेल.

रणरणत्या उन्हात लोकांना मतदानासाठी घराबाहेर काढण्याचे मोठे आव्हान -खरे तर, यावेळी कुठल्याही पक्षाच्या प्रचारात स्थानिक पातळीवर नेहमी प्रमाणे जोर दिसला नाही. नेहमी प्रमाणे गावा गावात प्रचारसभा दिसून आल्या नाही. गावा-गावांतून नेत्याच्या प्रचारासाठी भोंगे लावून फिरणारी वाहणे, संबंधित उमेदवार अथवा संबंधित पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावातून रॅली काढत लोकांना मतदानाचे आवाहन केल्याचे, मतदारांना भेटल्याचे क्वचितच बघायला मिळाले. आज चौथ्या टप्प्यासाठीचा प्रचार थंडावला आहे. 13 तारखेला मतदान होणार आहे. यासाठी, आता सध्या पडत असलेल्या रणरणत्या उन्हात, औरंगाबादच्या मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रांपर्यंत आणणे सर्वच पक्षांसमोरील मोठे आव्हान अहे.

यावर अवलंबून असणार 4 तारखेचा निकाल - सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. याचा परिणाम राज्यात आतापर्यंत झालेल्या मतदनावरही झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मतदारसंघातील लोकांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यात कोण यशस्वी होणार? बुथ पातळीवरील कार्यकर्ते किती जोर लावणार? आणि त्यांनी जोर लावल्यानंतरही मताचे विभाजन लक्षात घेता, त्याचा फायदा कुणाला किती होणार? या दृष्टीने लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. कारण यावरच 4 तारखेचा निकाल अवलंबून असणार आहे.

गेल्यावेळी अशी होती औरंगाबाद मदारसंघाची स्थिती -गेल्या निवडणुकीत AIMIM चे इम्तियाज जलील यांनी, शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा, भाजपसारखा मोठा पक्ष सोबत असतानाही पराभव केला होता. खैरे साधारणपणे साडेचार हजार मतांनी पराभूत झाले होते. आता शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. चंद्रकांत खैरे ठाकरे गटाकडून मैदानात आहेत. त्यांच्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. तर संदिपान भुमरे शिंदे गटाकडून मैदानात असून त्यांच्यासोबत भाजपची ताकद आहे. तसेच जलील यांच्यासोबत आता वंचित नाही, मात्र एकगठ्ठा मुस्लीम मतदान आहे. अशा प्रकारे औरंगाबाद लोकसभेची निवडणूक अटीतटीची असल्याने या तिनही पक्षांना मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उरलेल्या दोन दिवसांत मोठी ताकद लावावी लागणार आहे. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनImtiaz Jalilइम्तियाज जलीलChandrakant Khaireचंद्रकांत खैरेSandipan Bhumreसंदीपान भुमरे