शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाळूतस्करांविरुद्ध मोहीम

By admin | Updated: July 13, 2014 00:20 IST

जालना/ आष्टी : पावसाळा लांबल्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह दुधना, गिरजा- पूर्णा या नद्यांच्या पात्रातून गेल्या काही दिवसांपासून तस्कारांनी अत्याधुनिक मशनरींद्वारे बेसुमार उपसा सुरुच ठेवला

जालना/ आष्टी : पावसाळा लांबल्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरीसह दुधना, गिरजा- पूर्णा या नद्यांच्या पात्रातून गेल्या काही दिवसांपासून तस्कारांनी अत्याधुनिक मशनरींद्वारे बेसुमार उपसा सुरुच ठेवला असून, उशिरा का होईना, महसूल प्रशासनास आता जाग येऊ लागली आहे.अंबड तालुक्यातील ग्रामस्थांनी तस्करांविरोधात रस्त्यावर उतरुन आवाज उठविल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत १२ वाहने ताब्यात घेतली. पाठोपाठ आष्टीत शनिवारी केलेल्या कारवाईत बारा वाहनांसह शेकडो ब्रास वाळू जप्त करण्यात आली.आष्टीत जोरदार मोहीमकंत्राट संपल्यानंतर १५ लाख ७१३ ब्रासचे जास्तीचे उत्खनन झाल्याचे महसूल विभागाल तपासणीत आढळून आले. परतूर तालुक्यातील गंगा सावंगी, गोळेगाव, चांगतपुरी आणि इतर गावातून गोदावरी नदी वाहते. मोठे पात्र असून मोठ्या प्रमाणात वाळू साठा या ठिकाणी आहे. शिवाय, ही वाट आडवळणी असल्याने कारवाईचा फारसा धोका नाही. रात्रीच्या वेळी तर वाळू चोरांची मोठी चांदी होते. या भागातील सर्वच रस्ते वाळू वाहतुकीमुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. तहसीलदार विनोद गुडमवार यांनी ११ जुलै रोजी वाळू उपसा करण्याची मुदत संपत असल्याने सर्वच कंत्राटदारांना उपसा थांबविण्याचे आदेश जारी केले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना सूचना देण्यात आली होती. आष्टीचे मंडळ अधिकारी घुगे यांनी नोटिसा बजावल्या. कंत्राटदारांनी त्या स्वीकारल्या, परंतु वाळू उपसा सुरूच होता. या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिस व पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दिवसभर कारवाई करून १२ वाहनांवर कारवाई केली. आष्टी पोलिसांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.आष्टी-परतूर मार्गावर वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याची खबर पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांना देण्यात आली होती. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार वाळू उपसा करण्याची मुदत ३० जूनला संपल्यानंतर ५ हजार ५३ ब्रास वाळूचे अवैध उत्खनन झाले आहे. गंगासावंगी परिसरातील पात्रातून ११ हजार ६६० ब्रास जास्तीच्या वाळूचे उत्खनन करण्यात आले आहे. ही वसुली संबंधित कंत्राटदाराकडून करण्याची मागणी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षांनी केली आहे. (वार्ताहर)वाळूमाफियांचे धाबे दणाणलेगंगासावंगी, चांगतपुरी, गोळेगाव व इतर गावातील नदीच्या पात्रातून जास्तीच्या वाळूचे उत्खनन करण्यात आले आहे. हा संपूर्ण अहवाल महसूल विभागाने गोळा केला आहे. मात्र प्रत्यक्ष कारवाई करण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली नाही. ्र्रपरतूर तालुक्यातील श्रीष्टी येथे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने १० टायरचे दोन ट्रक वाळू वाहतूक करतांना पकडले. ही घटना १२ जुलै रोजी दुपारी श्रीष्टी गावात घडली. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख डिगांबर हवाले, रामेश्वर जाधव, रामेश्वर बगाटे, राजू पवार, इरशाद पटेल, साई पवार, रेखा लाटे, पुनम भट, चालक अनिल जाधव यांनी शनिवारी दुपारी छापा मारून दोन्ही ट्रक पकडले.