औरंगाबाद : गिरिजा नदीच्या पुलावरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी २५ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाची संयुक्त पथके स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी गुरुवारी दिले. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हाधिकारी (पान ५ वर)दोनशे वाहनांवर कारवाईबैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके यांनी १ जुलैपासून २० जुलैपर्यंत आरटीओने केलेल्या कारवाईची माहिती दिली. या काळात एकूण २११ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातील १५३ वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत.४यामध्ये खाजगी रिक्षा, जीप या वाहनांचा समावेश आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४ मालवाहू वाहनांवरही कार्यवाही करण्यात आली, असेही शेळके यांनी सांगितले.
अवैध वाहतुकीविरोधात सोमवारपासून मोहीम
By admin | Updated: July 22, 2016 00:43 IST