शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युच्या महामार्गाची तात्पुरत्या उपायांवर बोळवण; बांधकाम विभाग बायपासवर मुरूम टाकणार, गतिरोधक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:17 IST

मृत्यूचा महामार्ग म्हणून मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीड बायपासवरून आता राजकीय गु-हाळ सुरू झाले आहे.

औरंगाबाद : मृत्यूचा महामार्ग म्हणून मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीड बायपासवरून आता राजकीय गु-हाळ सुरू झाले आहे. या सगळ्या गु-हाळात बांधकाम विभागाने त्या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तात्पुरता उपाय करून बोळवण करण्यास सुरुवात केली आहे. 

त्या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण महत्त्वाचे आहे. जोपर्यंत चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर उपाय निघत नाही, तोपर्यंत त्या रस्त्यावरील अपघात कमी होणे शक्य नाही. ६ कि़मी.च्या अंतरात १२ वसाहतींकडे जाण्यासाठी बीड बायपासवरील दुभाजक फोडून वळणाची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यासाठी उड्डाणपूल, भुयारीमार्ग, सर्व्हिस रोड, रुंदरीकरण करण्यापैकी एखाद्या पर्यायावर महापालिका, बांधकाम विभागाने तातडीने विचार करणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका, बांधकाम विभागाने काहीही निर्णय घेतला नसून तात्पुरती कामे करून वेळकाढू धोरण अवलंबिल्याचा आरोप सातारा-देवळाईतील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले, बीड बायपासबाबत बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन कार्यवाही करीत आहे, त्या रस्त्याबाबत लवकरच निर्णय होईल. 

बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, विभागाने ५ ते ७ दिवसांत काम होईल, अशी तयारी केली आहे. साईडच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून तो भाग रस्त्याच्या लेव्हलवर आणला जाईल. साईनबोर्ड लावण्यात येणार आहेत. खड्डे भरण्यात येतील, तसेच गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सिग्नलवरील वळण रस्ते सध्या करणे शक्य नाही, परंतु डांबरी गतिरोधक करण्यात येतील. रम्बल्स स्पीड ब्रेकर्स टाकले जातील. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातpwdसार्वजनिक बांधकाम विभाग