शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

मृत्युच्या महामार्गाची तात्पुरत्या उपायांवर बोळवण; बांधकाम विभाग बायपासवर मुरूम टाकणार, गतिरोधक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:17 IST

मृत्यूचा महामार्ग म्हणून मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीड बायपासवरून आता राजकीय गु-हाळ सुरू झाले आहे.

औरंगाबाद : मृत्यूचा महामार्ग म्हणून मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीड बायपासवरून आता राजकीय गु-हाळ सुरू झाले आहे. या सगळ्या गु-हाळात बांधकाम विभागाने त्या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तात्पुरता उपाय करून बोळवण करण्यास सुरुवात केली आहे. 

त्या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण महत्त्वाचे आहे. जोपर्यंत चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर उपाय निघत नाही, तोपर्यंत त्या रस्त्यावरील अपघात कमी होणे शक्य नाही. ६ कि़मी.च्या अंतरात १२ वसाहतींकडे जाण्यासाठी बीड बायपासवरील दुभाजक फोडून वळणाची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यासाठी उड्डाणपूल, भुयारीमार्ग, सर्व्हिस रोड, रुंदरीकरण करण्यापैकी एखाद्या पर्यायावर महापालिका, बांधकाम विभागाने तातडीने विचार करणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका, बांधकाम विभागाने काहीही निर्णय घेतला नसून तात्पुरती कामे करून वेळकाढू धोरण अवलंबिल्याचा आरोप सातारा-देवळाईतील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले, बीड बायपासबाबत बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन कार्यवाही करीत आहे, त्या रस्त्याबाबत लवकरच निर्णय होईल. 

बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, विभागाने ५ ते ७ दिवसांत काम होईल, अशी तयारी केली आहे. साईडच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून तो भाग रस्त्याच्या लेव्हलवर आणला जाईल. साईनबोर्ड लावण्यात येणार आहेत. खड्डे भरण्यात येतील, तसेच गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सिग्नलवरील वळण रस्ते सध्या करणे शक्य नाही, परंतु डांबरी गतिरोधक करण्यात येतील. रम्बल्स स्पीड ब्रेकर्स टाकले जातील. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातpwdसार्वजनिक बांधकाम विभाग