शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मृत्युच्या महामार्गाची तात्पुरत्या उपायांवर बोळवण; बांधकाम विभाग बायपासवर मुरूम टाकणार, गतिरोधक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:17 IST

मृत्यूचा महामार्ग म्हणून मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीड बायपासवरून आता राजकीय गु-हाळ सुरू झाले आहे.

औरंगाबाद : मृत्यूचा महामार्ग म्हणून मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या बीड बायपासवरून आता राजकीय गु-हाळ सुरू झाले आहे. या सगळ्या गु-हाळात बांधकाम विभागाने त्या रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी तात्पुरता उपाय करून बोळवण करण्यास सुरुवात केली आहे. 

त्या रस्त्यावरील वाहतूक नियंत्रण महत्त्वाचे आहे. जोपर्यंत चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर उपाय निघत नाही, तोपर्यंत त्या रस्त्यावरील अपघात कमी होणे शक्य नाही. ६ कि़मी.च्या अंतरात १२ वसाहतींकडे जाण्यासाठी बीड बायपासवरील दुभाजक फोडून वळणाची व्यवस्था करणे शक्य नाही. त्यासाठी उड्डाणपूल, भुयारीमार्ग, सर्व्हिस रोड, रुंदरीकरण करण्यापैकी एखाद्या पर्यायावर महापालिका, बांधकाम विभागाने तातडीने विचार करणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका, बांधकाम विभागाने काहीही निर्णय घेतला नसून तात्पुरती कामे करून वेळकाढू धोरण अवलंबिल्याचा आरोप सातारा-देवळाईतील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले, बीड बायपासबाबत बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन कार्यवाही करीत आहे, त्या रस्त्याबाबत लवकरच निर्णय होईल. 

बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी सांगितले, विभागाने ५ ते ७ दिवसांत काम होईल, अशी तयारी केली आहे. साईडच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून तो भाग रस्त्याच्या लेव्हलवर आणला जाईल. साईनबोर्ड लावण्यात येणार आहेत. खड्डे भरण्यात येतील, तसेच गतिरोधक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सिग्नलवरील वळण रस्ते सध्या करणे शक्य नाही, परंतु डांबरी गतिरोधक करण्यात येतील. रम्बल्स स्पीड ब्रेकर्स टाकले जातील. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातpwdसार्वजनिक बांधकाम विभाग