शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ज्यांना कामे दिली त्यांना बोलवा प्रचाराला !

By admin | Updated: October 3, 2014 23:54 IST

बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला

बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला. या निधीला सुरुंग लावण्याचे काम मोठमोठ्या गुत्तेदारांनी केले. सर्वसामान्य व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कामे मिळालीच नाहीत. आता प्रचारासाठी नेत्यांकडून दुसऱ्या फळीतील उमेदवारांना निमंत्रण येत आहे, मात्र कार्यकर्ते म्हणतात की, ‘ज्यांना कामे दिले त्यांनाच बोलवा आता प्रचाराला’ या स्थितीमुळे उमेदवार गोंधळले आहेत.विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणूक आणि प्रचार म्हटलं की, कार्यकर्त्यांची गर्दी आलीच. ही गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांचे बगलबच्चे मोठा आटापिटा करीत आहेत. गावच्या सरपंचापासून ते पं.स. सदस्य, जि.प. सदस्य इथपर्यंत सगळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जमविण्याचे काम सुरू आहे. मात्र या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक सूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी मुंबई, पुण्यावरुन गुत्तेदार आयात केले असल्याने छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना साधा गावातील रस्ताही मागच्या पाच वर्षांत मिळाला नाही. कोट्यवधीच्या निधीला बाहेरच्या गुत्तेदारांनी सुरुंग लावला. अशी स्थिती जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात कमी, जास्त प्रमाणात पहावयास मिळते. सध्या प्रचार सुरू झाला असल्याने ज्या गावांमधील ग्रामपंचायत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात आहे. त्यांना प्रचारासाठी बोलावले जात आहे. मात्र त्या कार्यकर्त्यांमध्ये संबंधित उमेदवाराविषयी रोष असल्याचे पहावयास मिळते. काही कार्यकर्ते तर म्हणतात की, ‘ज्यांना मागील पाच वर्षांत गुत्तेदाऱ्या दिल्या त्यांनाच आता प्रचाराला बोलवा’, असे खडे बोल कार्यकर्त्यांकडून ऐकविले जात असल्यामुळे उमेदवारांना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे काम करावे लागत आहे.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आला, खर्चही झाला. मात्र या विकास कामांचे गुत्ते कोणाला दिले? यावरुन कार्यकर्ते खल घालत आहेत. ज्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला नेत्यांनी विकास कामांचे ठेके दिले. त्यांनी बहुतांश ठिकाणी निकृष्ट कामे केली असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या प्रचार रणधुमाळीत सर्वसामान्य कार्यकर्ते उतरतील का? उतरले तर मनातून काम करतील का? याबाबत सर्वच पक्षातील उमेदवारांना संभ्रम वाटत आहे. (प्रतिनिधी)