शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना कामे दिली त्यांना बोलवा प्रचाराला !

By admin | Updated: October 3, 2014 23:54 IST

बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला

बीड : मागील पाच वर्षांच्या काळात सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी आणला आणि खर्च केला. या निधीला सुरुंग लावण्याचे काम मोठमोठ्या गुत्तेदारांनी केले. सर्वसामान्य व दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना कामे मिळालीच नाहीत. आता प्रचारासाठी नेत्यांकडून दुसऱ्या फळीतील उमेदवारांना निमंत्रण येत आहे, मात्र कार्यकर्ते म्हणतात की, ‘ज्यांना कामे दिले त्यांनाच बोलवा आता प्रचाराला’ या स्थितीमुळे उमेदवार गोंधळले आहेत.विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. निवडणूक आणि प्रचार म्हटलं की, कार्यकर्त्यांची गर्दी आलीच. ही गर्दी जमविण्यासाठी उमेदवारांचे बगलबच्चे मोठा आटापिटा करीत आहेत. गावच्या सरपंचापासून ते पं.स. सदस्य, जि.प. सदस्य इथपर्यंत सगळे दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते जमविण्याचे काम सुरू आहे. मात्र या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक सूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी मुंबई, पुण्यावरुन गुत्तेदार आयात केले असल्याने छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना साधा गावातील रस्ताही मागच्या पाच वर्षांत मिळाला नाही. कोट्यवधीच्या निधीला बाहेरच्या गुत्तेदारांनी सुरुंग लावला. अशी स्थिती जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात कमी, जास्त प्रमाणात पहावयास मिळते. सध्या प्रचार सुरू झाला असल्याने ज्या गावांमधील ग्रामपंचायत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या ताब्यात आहे. त्यांना प्रचारासाठी बोलावले जात आहे. मात्र त्या कार्यकर्त्यांमध्ये संबंधित उमेदवाराविषयी रोष असल्याचे पहावयास मिळते. काही कार्यकर्ते तर म्हणतात की, ‘ज्यांना मागील पाच वर्षांत गुत्तेदाऱ्या दिल्या त्यांनाच आता प्रचाराला बोलवा’, असे खडे बोल कार्यकर्त्यांकडून ऐकविले जात असल्यामुळे उमेदवारांना त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचे काम करावे लागत आहे.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आला, खर्चही झाला. मात्र या विकास कामांचे गुत्ते कोणाला दिले? यावरुन कार्यकर्ते खल घालत आहेत. ज्या छोट्या-मोठ्या कार्यकर्त्याला नेत्यांनी विकास कामांचे ठेके दिले. त्यांनी बहुतांश ठिकाणी निकृष्ट कामे केली असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांनी यापूर्वी केलेला आहे. त्यामुळे सुरू असलेल्या प्रचार रणधुमाळीत सर्वसामान्य कार्यकर्ते उतरतील का? उतरले तर मनातून काम करतील का? याबाबत सर्वच पक्षातील उमेदवारांना संभ्रम वाटत आहे. (प्रतिनिधी)