शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
2
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
3
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
4
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
5
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
6
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
7
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
8
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
9
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
10
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!
11
Pune Rape: तोंडावर स्प्रे फवारून तरुणीवर बलात्कार; डिलिव्हरी बॉयच्या कृत्यानं पुणे हादरलं
12
Mumbai Crime: शिक्षिका आधी कारमध्येच करायची बलात्कार, नंतर हॉटेलमध्ये...; वर्षभर केले विद्यार्थ्याचे शोषण; काय काय घडलं?
13
Bank of Baroda मध्ये जमा करा २,००,००० रुपये; मिळेल, ₹४७,०१५ चं फिक्स व्याज आणि हमीही, जाणून घ्या
14
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
15
आणखी एक मोठा अपघात, वैमानिकाचं नियंत्रण सुटलं, विमानतळाची भिंत तोडून विमान पुढे गेलं
16
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
17
कार खरेदीवर ४ लाखांपर्यंत डिस्काउंट; कंपन्या करत आहेत ‘स्टॉक’ क्लीअर
18
सिबिल स्कोअर खराब होता, स्टेट बँकेनं नोकरीच दिली नाही; कोर्टानंही म्हटलं, "पैशांच्या बाबतीत..."
19
भारताचा पाकिस्तानी सेलिब्रिटींना दणका, २४ तासांत पुन्हा एकदा सोशल मीडिया अकाउंट केले ब्लॉक!
20
पत्नीसोबत Post Office च्या स्कीममध्ये करा गुंतवणूक; दर महिन्याला मिळेल ₹९००० चं फिक्स व्याज

कडब्याची गंजी जळून खाक

By admin | Updated: May 30, 2014 00:21 IST

मानवत : तालुक्यातील गोगलगाव येथे गावाच्या बाजूस असलेल्या परसातील कडब्याच्या गंजींना शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची २९ मे रोजी सकाळी ८़४५ वाजता घडली़

 मानवत : तालुक्यातील गोगलगाव येथे गावाच्या बाजूस असलेल्या परसातील कडब्याच्या गंजींना शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची २९ मे रोजी सकाळी ८़४५ वाजता घडली़ गोगलगावच्या गावाशेजारी परसामध्ये अनेक शेतकर्‍यांचे गोठे आणि कडब्याच्या गंजी लावलेल्या आहेत़ गुरुवारी सकाळी ८़४५ वाजता डिपीवरील शॉर्टसर्किटमुळे गावाशेजारील कडब्याच्या गंजींना आग लागली़ या आगीत भीमा किशन कांबळे, सोनाजी भाऊराव कोरडे, परमेश्वर भानुदास कोरडे यांच्या कडब्याच्या गंजी जळून खाक झाल्या़ या आगीत साधारणपणे ११ ते १२ हजार कडब्याच्या पेंंढ्या जळून खाक झाल्या़ यामुळे शेतकर्‍यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले़ शिवाय जनावरांचा चारा गेल्याने या शेतकर्‍यांपुढे संकट उभे टाकले आहे़ तसेच रमाबाई लुचारे यांच्या घरावरील पत्रे आणि साहित्य जळून खाक झाले़ आगीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार व्ही़ एच़ मंतावाड यांनी घटनास्थळास भेट दिली़ आग लागलेली कळताच घटनास्थळी पोलिस पाटील जिजाभाऊ मगर, सरपंच बाबासाहेब गुरव, उपसरपंच आबासाहेब पोंडाळ, नानासाहेब मगर, भगवान मगर, अण्णा मगर व गावातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले़ परंतु, सुटलेल्या वार्‍यामुळे आगीची तीव्रता वाढल्याने संपूर्ण कडबा जळून खाक झाला़ (वार्ताहर) ऩप़चे अग्निशमन वाहन कमजोरच गोगलगाव येथील कडब्याच्या गंजींना आग लागल्याचे मानवत येथील अग्निशमन वाहनाला सकाळी ९ वाजता कळविण्यात आले़ अर्ध्या तासाच्या आत अग्निशमन दलाचे वाहन वाहन चालक मधुकर खटले आणि सह कर्मचारी मुकेश कुमावत, राम दहे हे ९़३५ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले़ कर्मचार्‍यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले़ परंतु, अग्निशमन दलाचे वाहनामध्ये उणिवा असल्याने कमकुवत होते़ त्यामुळे ज्या वेगाने आग विझायला पाहिजे होती, त्या वेगात आग विझली नाही़ जितके नुकसान व्हायचे तितके झालेच़ संभाव्य नुकसान मात्र यामुळे टळले़ मानवतच्या अग्निशमन दलाच्या वाहनात हाऊस पाईप, बोअरकटर, हार्डसेक्शन पाईप, गमशुज आदी अत्यावश्यक साहित्य नाही़ यामुळे आग विझविण्याचे काम करताना कर्मचार्‍यांचे बुटेही जळाले़ तर गाडीला सध्या एक इंची पाईपवर काम करावे लागत असल्याने आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविता येत नाही़ कर्मचार्‍यांचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या वाहनात अडीच इंची पाईप असल्यास पाण्याचा वेग वाढवून आग तत्काळ आटोक्यात येते़ परंतु, महिन्यापासून नगरपालिकेने गाडीतील ज्या उणिवा आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला नाही़ अनेक ठिकाणी आग विझविण्यासाठी गेल्यानंतर या अग्निशमन दलाच्या वाहने एक ते दीड लाख रुपयांची कमाई केली़ परंतु, या कमाईतून गाडी अद्ययावत ठेवण्यासाठी प्रयत्न मात्र झाले नाहीत़ १५ मिनिटांचे आग विझविण्याचे काम एक तासाचे वेळ घेते आणि यातून समाधानही होत नाही़ ही बाब सर्वसामान्यांना माहीत नसल्यामुळे अग्निशमन वाहन आले आणि त्याने आग विझविली यातच लोकांचे समाधान असते़ अग्निशमन दलाच्या वाहनांवरील कर्मचार्‍यांना पगारी नसल्याने त्यांचीही काम करण्याची मानसिक स्थिती चांगली नाही़ या सगळ्या गोष्टींचा विचार करून नगरपालिकेने अग्निशमन वाहन अद्ययावत करण्याची गरज आहे़ गोगलगाव येथील आगीच्या घटनेत या वाहनांवरील कर्मचारी मधुकर खटले, मुकेश कुमावत, राम दहे यांचे तेथील नागरिकांनी स्वागत केले़