शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

शांतता राहिली तरच व्यवसायवृद्धी; शहराच्या कायदा सुव्यवस्थेसाठी व्यापाऱ्यांचे पोलिसांना सहकार्य

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 9, 2023 20:03 IST

रेस्टॉरंट, बार, हॉटेलमालकांची पुन्हा होणार बैठक

छत्रपती संभाजीनगर : अचानकपणे पोलिस विभागाने शहरात रात्री ११ वाजता बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेतला आणि तो लागूही केला. मात्र, याबद्दल व्यापारी संघटनांना विचारात घेतले नाही. थेट आदेश लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. ‘लोकमत’ने हा मुद्दा ऐरणीवर आणला होता. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी लगेच गुरुवारी दुपारी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींशी पोलिस आयुक्तालयात तातडीने बैठक घेतली. शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली, तरच येथील व्यवसायाची वृद्धी होईल. या मुद्यावर व्यापारी प्रतिनिधींनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद हॉटेल्स असोसिएशन व जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिशएनने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत परवानगी देण्याची मागणी केली. याविषयी येत्या दोन दिवसांत पुन्हा एकदा बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले. पोलिस आयुक्तांनी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून आमचे म्हणणे ऐकून घेतले व सकारात्मक चर्चा झाली. यामुळे व्यापारी प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले व ‘लोकमत’चे आभारही मानले.

जे शहर शांत असते, तिथेच व्यवसाय वाढतोजे शहर शांत असते, जिथे गुन्हेगारी कमी असते. त्याच शहरात पर्यटक येतात. तसेच शहराचा पैसा शहरात फिरला, तर शहराची वृद्धी होते, असे नाही; पण बाहेरील पैसा जेव्हा शहरात येतो तेव्हा त्या शहराचा विकास होतच असतो.

जिथे काही टपऱ्या मध्यरात्रीपर्यंत चालतात तिथे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे यास रोखण्यासाठी रात्री ११ वाजेपर्यंत बाजार बंदचा निर्णय पोलिसांनी घेतला, असे असेल तर पोलिसांना आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत.-आदेशपालसिंग छाबडा, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँड काॅमर्स

पोलिसांना सहकार्य करूरात्री ११ वाजेपर्यंतच जर दुकाने बंद केलीत अन् शहरातील कायद्या सुव्यवस्था अबाधित राहत असेल, तर जिल्हा व्यापारी महासंघ पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे. कापड व्यावसायिक व अन्य व्यावसायिकांनी ११ वाजता दुकानाचे शटर खाली करावे व नंतर त्यांना दुकानात कपड्यांच्या घडी घालणे, दुकान स्वच्छतेचे काम करू द्यावे, १२ वाजेपर्यंत काम आटोपून ते व्यापारी- कर्मचारी घरी जातील, या मागणीस पोलिस आयुक्तांनी सकारात्मकपणे घेतले.

पुन्हा एकदा होणार बैठकपोलिस प्रशासनाला आम्ही नेहमीच सहकार्य करत आहोत व पुढेही करू; पण हॉटेल, रेस्टॉरंट, बार ॲण्ड परमिट रूम मध्यरात्री दीड वाजेपर्यंत चालू ठेवावेत, अशी मागणी आम्ही पोलिस आयुक्तांना केली. यासंदर्भात येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊ. त्यात पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.-शिवाजी पाटील,अध्यक्ष, जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट ओनर्स असोसिएशन्स

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस