शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

गुलमंडी भागात सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील ...

औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील काही वर्षांमध्ये केलेली नाही. फुटपाथ या भागात शोधूनही सापडत नाही. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. अशा परिस्थितीत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. महापालिकेने यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मनपाचे पथक परत जाताच पुन्हा अतिक्रमणे जैसे थे होतात.

स्मार्ट सिटी योजनेत पैठण गेट ते गुलमंडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने पीपल फॉर स्ट्रीट संकल्पना राबविण्यात येणार आहे. या भागात वाहनांची वर्दळ पूर्णपणे बंद करण्याचा विचार मनपाचा आहे. मात्र, गुलमंडीसाठी अशी कोणतीही योजना सध्या मनपा किंवा स्मार्ट सिटी प्रशासनाकडे नाही. मछलीखडक, रंगारगल्ली, कुंभारवाडा, सुपारी हनुमान मंदिर परिसर, गुलमंडी पार्किंग परिसरात नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे किरकोळ अपघातही होतात.

रोज लाखो लोकांची ये-जा

गुलमंडी परिसरात दररोज लाखो नागरिक खरेदीसाठी येतात. शहरातील कोणत्याही भागात राहणारा नागरिक गुलमंडीवर विविध वस्तू खरेदीसाठी हमखास येतोच. सध्या कोरोना निर्बंधांमुळे मार्केट दुपारी ४ वाजताच बंद होते. पूर्वी नागरिकांची गर्दी रात्री १० पर्यंत राहत होती. आता सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत प्रचंड वर्दळ असते. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

फुटपाथ कागदावरच

शहरातील प्रत्येक रस्त्याला फुटपाथ असतोच. महापालिकेच्या कागदावरही या भागात फुटपाथ आहेत. प्रत्यक्षात एकही फुटपाथ दिसत नाही. प्रत्येक फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. व्यापाऱ्यांची अतिक्रमणे, त्यानंतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येते. पायी चालणाऱ्यांना जागाच शिल्लक राहत नाही.

अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच

महापालिकेकडून वर्षभरापूर्वी गुलमंडी, रंगारगल्ली भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. अलीकडेच कुंभारवाड्यातही मोहीम राबविली. यानंतर परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही. मनपाचे पथक निघून जाताच अतिक्रमणे पुन्हा जशास तशी असतात. वाहतुकीला, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही, एवढा मोठा रस्ता मोकळा असायला हवा.

सहकुटुंब चालणे अवघड

लहान मुलांसह गुलमंडीवर पायी ये-जा करणे अशक्य आहे. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मुलांना एका ठिकाणी थांबवून खरेदी करावी लागते. पायी चालण्यासाठी तरी या भागात व्यवस्था असायला हवी. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

अभिजीत वाघुंडे, नागरिक

ग्राहकांची अडचण समजून घ्यावी

गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनीही ग्राहकांची अडचण समजून घ्यावी. ग्राहकाला दुकानासमोर वाहन उभे करायला कुठेच जागा मिळत नाही. पार्किंगची व्यवस्था नाही. चारचाकी वाहन परिसरात कुठे उभे करावे. वाहन उभे करून खरेदीला गेल्यावर दुसरे वाहनधारक अंगावर येतात. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा.

अब्दुल माजीद, नागरिक

अधूनमधून कारवाई

गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा रोड, मछलीखडक आदी भागात नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते. मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन, कोरोना परिस्थितीमुळे कारवाई झालेली नाही. बाजारपेठही ४ वाजताच बंद होते. पूर्णवेळ बाजारपेठ सुरू झाल्यावर पुन्हा मोहीम हाती घेतली जाईल.

रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.