शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

गुलमंडी भागात सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील ...

औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील काही वर्षांमध्ये केलेली नाही. फुटपाथ या भागात शोधूनही सापडत नाही. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. अशा परिस्थितीत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. महापालिकेने यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मनपाचे पथक परत जाताच पुन्हा अतिक्रमणे जैसे थे होतात.

स्मार्ट सिटी योजनेत पैठण गेट ते गुलमंडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने पीपल फॉर स्ट्रीट संकल्पना राबविण्यात येणार आहे. या भागात वाहनांची वर्दळ पूर्णपणे बंद करण्याचा विचार मनपाचा आहे. मात्र, गुलमंडीसाठी अशी कोणतीही योजना सध्या मनपा किंवा स्मार्ट सिटी प्रशासनाकडे नाही. मछलीखडक, रंगारगल्ली, कुंभारवाडा, सुपारी हनुमान मंदिर परिसर, गुलमंडी पार्किंग परिसरात नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे किरकोळ अपघातही होतात.

रोज लाखो लोकांची ये-जा

गुलमंडी परिसरात दररोज लाखो नागरिक खरेदीसाठी येतात. शहरातील कोणत्याही भागात राहणारा नागरिक गुलमंडीवर विविध वस्तू खरेदीसाठी हमखास येतोच. सध्या कोरोना निर्बंधांमुळे मार्केट दुपारी ४ वाजताच बंद होते. पूर्वी नागरिकांची गर्दी रात्री १० पर्यंत राहत होती. आता सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत प्रचंड वर्दळ असते. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

फुटपाथ कागदावरच

शहरातील प्रत्येक रस्त्याला फुटपाथ असतोच. महापालिकेच्या कागदावरही या भागात फुटपाथ आहेत. प्रत्यक्षात एकही फुटपाथ दिसत नाही. प्रत्येक फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. व्यापाऱ्यांची अतिक्रमणे, त्यानंतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येते. पायी चालणाऱ्यांना जागाच शिल्लक राहत नाही.

अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच

महापालिकेकडून वर्षभरापूर्वी गुलमंडी, रंगारगल्ली भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. अलीकडेच कुंभारवाड्यातही मोहीम राबविली. यानंतर परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही. मनपाचे पथक निघून जाताच अतिक्रमणे पुन्हा जशास तशी असतात. वाहतुकीला, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही, एवढा मोठा रस्ता मोकळा असायला हवा.

सहकुटुंब चालणे अवघड

लहान मुलांसह गुलमंडीवर पायी ये-जा करणे अशक्य आहे. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मुलांना एका ठिकाणी थांबवून खरेदी करावी लागते. पायी चालण्यासाठी तरी या भागात व्यवस्था असायला हवी. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

अभिजीत वाघुंडे, नागरिक

ग्राहकांची अडचण समजून घ्यावी

गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनीही ग्राहकांची अडचण समजून घ्यावी. ग्राहकाला दुकानासमोर वाहन उभे करायला कुठेच जागा मिळत नाही. पार्किंगची व्यवस्था नाही. चारचाकी वाहन परिसरात कुठे उभे करावे. वाहन उभे करून खरेदीला गेल्यावर दुसरे वाहनधारक अंगावर येतात. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा.

अब्दुल माजीद, नागरिक

अधूनमधून कारवाई

गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा रोड, मछलीखडक आदी भागात नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते. मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन, कोरोना परिस्थितीमुळे कारवाई झालेली नाही. बाजारपेठही ४ वाजताच बंद होते. पूर्णवेळ बाजारपेठ सुरू झाल्यावर पुन्हा मोहीम हाती घेतली जाईल.

रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.