शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

गुलमंडी भागात सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील ...

औरंगाबाद : शहराचे हृदयस्थान असलेल्या गुलमंडीवर नागरिक विविध सामान खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. मात्र, नागरिकांसाठी फुटपाथची स्वतंत्र व्यवस्थाच मागील काही वर्षांमध्ये केलेली नाही. फुटपाथ या भागात शोधूनही सापडत नाही. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. अशा परिस्थितीत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. महापालिकेने यापूर्वी अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मनपाचे पथक परत जाताच पुन्हा अतिक्रमणे जैसे थे होतात.

स्मार्ट सिटी योजनेत पैठण गेट ते गुलमंडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने पीपल फॉर स्ट्रीट संकल्पना राबविण्यात येणार आहे. या भागात वाहनांची वर्दळ पूर्णपणे बंद करण्याचा विचार मनपाचा आहे. मात्र, गुलमंडीसाठी अशी कोणतीही योजना सध्या मनपा किंवा स्मार्ट सिटी प्रशासनाकडे नाही. मछलीखडक, रंगारगल्ली, कुंभारवाडा, सुपारी हनुमान मंदिर परिसर, गुलमंडी पार्किंग परिसरात नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात. अनेकदा दुचाकी, चारचाकी वाहनांमुळे किरकोळ अपघातही होतात.

रोज लाखो लोकांची ये-जा

गुलमंडी परिसरात दररोज लाखो नागरिक खरेदीसाठी येतात. शहरातील कोणत्याही भागात राहणारा नागरिक गुलमंडीवर विविध वस्तू खरेदीसाठी हमखास येतोच. सध्या कोरोना निर्बंधांमुळे मार्केट दुपारी ४ वाजताच बंद होते. पूर्वी नागरिकांची गर्दी रात्री १० पर्यंत राहत होती. आता सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत प्रचंड वर्दळ असते. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

फुटपाथ कागदावरच

शहरातील प्रत्येक रस्त्याला फुटपाथ असतोच. महापालिकेच्या कागदावरही या भागात फुटपाथ आहेत. प्रत्यक्षात एकही फुटपाथ दिसत नाही. प्रत्येक फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. व्यापाऱ्यांची अतिक्रमणे, त्यानंतर फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात दिसून येते. पायी चालणाऱ्यांना जागाच शिल्लक राहत नाही.

अतिक्रमण हटाव मोहीम नावालाच

महापालिकेकडून वर्षभरापूर्वी गुलमंडी, रंगारगल्ली भागात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली होती. अलीकडेच कुंभारवाड्यातही मोहीम राबविली. यानंतर परिस्थितीत किंचितही सुधारणा झालेली नाही. मनपाचे पथक निघून जाताच अतिक्रमणे पुन्हा जशास तशी असतात. वाहतुकीला, पादचाऱ्यांना त्रास होणार नाही, एवढा मोठा रस्ता मोकळा असायला हवा.

सहकुटुंब चालणे अवघड

लहान मुलांसह गुलमंडीवर पायी ये-जा करणे अशक्य आहे. वाहनांची प्रचंड वर्दळ असते. मुलांना एका ठिकाणी थांबवून खरेदी करावी लागते. पायी चालण्यासाठी तरी या भागात व्यवस्था असायला हवी. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

अभिजीत वाघुंडे, नागरिक

ग्राहकांची अडचण समजून घ्यावी

गुलमंडीवरील व्यापाऱ्यांनीही ग्राहकांची अडचण समजून घ्यावी. ग्राहकाला दुकानासमोर वाहन उभे करायला कुठेच जागा मिळत नाही. पार्किंगची व्यवस्था नाही. चारचाकी वाहन परिसरात कुठे उभे करावे. वाहन उभे करून खरेदीला गेल्यावर दुसरे वाहनधारक अंगावर येतात. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा.

अब्दुल माजीद, नागरिक

अधूनमधून कारवाई

गुलमंडी, रंगारगल्ली, कुंभारवाडा, औरंगपुरा रोड, मछलीखडक आदी भागात नागरिकांची अडचण लक्षात घेऊन अधूनमधून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येते. मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन, कोरोना परिस्थितीमुळे कारवाई झालेली नाही. बाजारपेठही ४ वाजताच बंद होते. पूर्णवेळ बाजारपेठ सुरू झाल्यावर पुन्हा मोहीम हाती घेतली जाईल.

रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त, मनपा.