शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

वीज केंद्रातील रोहित्र जळाले

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

पालम : तालुक्यातील फरकंडा येथील वीज कंपनीच्या उपकेंद्राचे रोहित्र जळून खाक झाले आहे़

पालम : तालुक्यातील फरकंडा येथील वीज कंपनीच्या उपकेंद्राचे रोहित्र जळून खाक झाले आहे़ यामुळे मागील चार दिवसांपासून सात गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ वीजपुरवठा खंडित झाल्याने या परिसरातील कृषी पंप बंद पडले आहेत़ फरकंडा येथे परिसरातील गावांना वीजपुरवठा करण्यासाठी वीज कंपनीचे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित आहे़ या उपकेंद्राकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होत आहेत़ या केंद्रातून आजूबाजूच्या सात गावांना व शेतातील कृषीपंपांना विजेचा पुरवठा केला जातो़ फरकंडा गावाला वीजपुरवठा करणारे रोहित्र तर मागील महिनाभरापासून जळाले आहे़ ३३ केव्ही उपकेंद्रातील रोहित्र व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे़ फरकंडा, जवळा, गुळखंड, डिग्रस, सावंगी थडी, बरबडी या गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे़ या उपकेंद्रातील ब्रेकर व केव्हीसीटी खराब झाल्याने तांत्रिक बिघाड होऊन वायर तुटण्याचे प्रमाणही वाढले आहे़ चार दिवसांपासून सात गावांत पूर्णत: अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे़ तसेच गोदाकाठावरील कृषीपंपही बंद पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे़ या बिघाडाकडे वीज कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांपुढील अडचणी वाढत आहेत़ वीज कंपनीने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी चंद्रकांत पौळ, राम पौळ, देवीदास पौळ, सोपान पौळ, अंगद पौळ, भारत पौळ, अनंता पौळ, विष्णू पौळ, दिगांबर पौळ आदींसह ग्रामस्थांनी केली आहे़ (प्रतिनिधी)कायमस्वरुपी कर्मचारी मिळेनाफरकंडा येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनही या भागातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे़ उपकेंद्रात देखभाल करण्यासाठी वीज कंपनीचा कायमस्वरुपी एकही कर्मचारी नाही़ अनेक दिवसांपासून कायमस्वरुपी कर्मचारी नसल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़ या उपकेंद्रात कर्मचाऱ्यांसाठी निवास, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था नाही़ यामुळे काम करण्यास कर्मचारी धजावत नाहीत़जीवितास धोकायेथील ३३ केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मर हा ३़१५ एमव्हीए क्षमतेचा असल्यामुळे या भागातील नागरिकांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असतो़ तसेच या उपकेंद्रातील साहित्यही खराब झालेले आहे़ ब्रेकर आयसोलेटर बायपास केल्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे़ तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ खराब साहित्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे़