शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

वीज केंद्रातील रोहित्र जळाले

By admin | Updated: June 9, 2014 01:11 IST

पालम : तालुक्यातील फरकंडा येथील वीज कंपनीच्या उपकेंद्राचे रोहित्र जळून खाक झाले आहे़

पालम : तालुक्यातील फरकंडा येथील वीज कंपनीच्या उपकेंद्राचे रोहित्र जळून खाक झाले आहे़ यामुळे मागील चार दिवसांपासून सात गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ वीजपुरवठा खंडित झाल्याने या परिसरातील कृषी पंप बंद पडले आहेत़ फरकंडा येथे परिसरातील गावांना वीजपुरवठा करण्यासाठी वीज कंपनीचे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यान्वित आहे़ या उपकेंद्राकडे कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने नेहमीच तांत्रिक बिघाड होत आहेत़ या केंद्रातून आजूबाजूच्या सात गावांना व शेतातील कृषीपंपांना विजेचा पुरवठा केला जातो़ फरकंडा गावाला वीजपुरवठा करणारे रोहित्र तर मागील महिनाभरापासून जळाले आहे़ ३३ केव्ही उपकेंद्रातील रोहित्र व अन्य साहित्य जळून खाक झाले आहे़ फरकंडा, जवळा, गुळखंड, डिग्रस, सावंगी थडी, बरबडी या गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे़ या उपकेंद्रातील ब्रेकर व केव्हीसीटी खराब झाल्याने तांत्रिक बिघाड होऊन वायर तुटण्याचे प्रमाणही वाढले आहे़ चार दिवसांपासून सात गावांत पूर्णत: अंधाराचे साम्राज्य निर्माण झालेले आहे़ तसेच गोदाकाठावरील कृषीपंपही बंद पडल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे़ या बिघाडाकडे वीज कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांपुढील अडचणी वाढत आहेत़ वीज कंपनीने तातडीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, नवीन रोहित्र बसवावे, अशी मागणी चंद्रकांत पौळ, राम पौळ, देवीदास पौळ, सोपान पौळ, अंगद पौळ, भारत पौळ, अनंता पौळ, विष्णू पौळ, दिगांबर पौळ आदींसह ग्रामस्थांनी केली आहे़ (प्रतिनिधी)कायमस्वरुपी कर्मचारी मिळेनाफरकंडा येथे ३३ केव्ही उपकेंद्र असूनही या भागातील नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे़ उपकेंद्रात देखभाल करण्यासाठी वीज कंपनीचा कायमस्वरुपी एकही कर्मचारी नाही़ अनेक दिवसांपासून कायमस्वरुपी कर्मचारी नसल्याने तांत्रिक बिघाडात वाढ होत आहे़ या उपकेंद्रात कर्मचाऱ्यांसाठी निवास, पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था नाही़ यामुळे काम करण्यास कर्मचारी धजावत नाहीत़जीवितास धोकायेथील ३३ केव्ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मर हा ३़१५ एमव्हीए क्षमतेचा असल्यामुळे या भागातील नागरिकांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असतो़ तसेच या उपकेंद्रातील साहित्यही खराब झालेले आहे़ ब्रेकर आयसोलेटर बायपास केल्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे़ तसेच रोहित्र जळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे़ खराब साहित्यामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे़