शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

फळबागा जळाल्या

By admin | Updated: July 8, 2014 00:33 IST

परभणी : दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांना फटका बसत आहे. जून महिना उलटला तरी पाऊस न पडल्याने विहीर व हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यातील फळबागा जळू लागल्या आहेत.

परभणी : दोन ते तीन वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे फळबागांना फटका बसत आहे. जून महिना उलटला तरी पाऊस न पडल्याने विहीर व हातपंप कोरडेठाक पडल्याने जिल्ह्यातील फळबागा जळू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील बोटावर मोजणाऱ्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, अशा प्रतिकूल परिस्थिीतही शेतकऱ्यांनी फळबागा जगविल्या होत्या. परंतु जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे मोसंबी, डाळिंब, केळी, पेरू आदी फळबागा पाण्याविना जळू लागल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे, अशा शेतकऱ्यांना आता शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र येथील जिल्हा प्रशासनाला याचे देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. मागील आठवड्यात मानवत तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्ज बाजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही जिल्हा प्रशासन म्हणावे तसे जागे झाले नाही. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेजिल्ह्यात बोटावर मोजण्याऐवढ्याच फळबागा उरल्या आहेत. त्याही निसर्गाच्या लहरीपणामुळे नेस्तनाबूत होत आहेत. शेतकऱ्यांनी हा फळबागा लहान मुलांसारख्या जगविल्या परंतु निसर्गासमोर शेतकरीही हतबल झाला आहे. जिल्ह्यातील फळबागा पाण्याविना जळून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. मोसंबी व डाळींब बागायदार शेतकरी डोक्यावर पाणी आणून बाग जगवित आहेत. तसेच काही शेतकरी टँकरद्वारे बागांना पाणी देत आहेत. प्रशासनाच्या वतीने फळबागा जगविण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे लाखोंच्या फळबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.