शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादला मंत्रीपदांची बंपर लॉटरी? शिंदे गटांच्या ५ तर भाजपाच्या तीन आमदारांची दावेदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 19:21 IST

जिल्ह्याला मिळणार नवीन पालकमंत्री, मंत्रीपदी कोणाला मिळणार संधी याचीच चर्चा

औरंगाबाद: शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले व बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्याचा कारभार आता नव्याने सुरू होणार आहे. शिंदेंच्या बंडाला बंपर पाठिंबा शिवसेनेचा कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याने दिला. जिल्ह्यातील दोन मंत्र्यांसह पाच आमदार या बंडात सामील असल्यामुळे औरंगाबादला मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आ. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने यांच्यासोबत गेलेल्या सर्वच मंत्र्यांची पदे तशीच राहण्याची शक्यता अधिक आहे. आ. संदीपान भुमरे, आ. अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदे कायम राहून आ. संजय शिरसाट यांना एखादे खाते मिळू शकते. तर आ. अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. प्रशांत बंब यांना मंत्रिपदे मिळतील असा आत्मविश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत. २०१९ मध्ये अवघ्या चार महिन्यांसाठी आ. सावे हे उद्याेग राज्यमंत्री राहिले होते. विधानसभेनंतर कॅबिनेट होण्याची त्यांची संधी हुकली होती, ती आता पूर्ण होऊ शकते. महाविकास आघाडी सरकारमध्ये भुमरे कॅबिनेट तर सत्तर राज्यमंत्री होते. शिंदे यांच्या बंडात अधिकाधिक आमदारांना सहभागी करून घेण्यात औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांची भूमिका महत्वाची होती. शिवाय तिसऱ्यांदा आमदार होऊनही मंत्रिपद न मिळाल्याने शिरसाट नाराज होते, अशी प्रशिपासूनच चर्चा होतीच. त्यामुळे शिरसाट यांच्या रूपाने तिसरे मंत्रिपद मिळू शकते. भाजपच्या कोट्यातून आणखी कोणाला मंत्रिपदे मिळतात यावर जिल्ह्यास किती मंत्रिपदे मिळतील, ते अवलंबून आहे. 

एका तपात झालेले पालकमंत्री असे२०११ ते २०१४ पर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकमंत्री पद होते. त्यानंतर जानेवारी २०१५ मध्ये रामदास कदम यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील गटबाजीमुळे डॉ. दीपक सावंत यांना पालकमंत्री करण्यात आले. सावंत यांचा कार्यकाल संपल्यानंतर सहा महिन्यांसाठी आ. एकनाथ शिंदे हे पालकमंत्री राहिले. डिसेंबर २०१९ पासून २९ जूनपर्यंत सुभाष देसाई हे पालकमंत्री होते.

बाहेरचेच पालकमंत्री लाभलेआजवर जिल्ह्याला बाहेरचेच पालकमंत्री लाभलेले आहेत. मागील २५ वर्षांत चंद्रकांत खैरेवगळता सर्व पालकमंत्री बाहेरच्या जिल्ह्यातील राहिले. त्यामुळे औरंगाबादला राज्याच्या ‘टॉप टेन’ शहरात आणण्याच्या घोषणेला कुणीही पूर्ण करू शकले नाही. मागील १२ वर्षांत मुंबईतील चार पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले. बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस