शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

१५० घरांवर बुलडोजर

By admin | Updated: June 4, 2014 00:45 IST

नांदेड: विभागीय रेल्वे कार्यालयाच्या मंडळ इंजिनिअर्स विभागाकडून दोन वेळा नोटीस पाठवून व निर्धारित वेळेत रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण न काढणार्‍या

नांदेड: विभागीय रेल्वे कार्यालयाच्या मंडळ इंजिनिअर्स विभागाकडून दोन वेळा नोटीस पाठवून व निर्धारित वेळेत रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण न काढणार्‍या शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील लालवाडी परिसरातील १५० झोपडपट्या आणि घरे पोलिस बंदोबस्तात काढले. रेल्वे अधिकार्‍यांनी मनपा व महावितरण विभागाने रेल्वेच्या जमिनीवर काम करण्याची अगोदर कोणतीच परवानगी घेतली नसल्याची तक्रार केली आहे़ बीएसयूपी योजनेमध्ये हस्तांतरित केलेल्या जवळपास १०० घरकुलांना अवैध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवून त्यावर मार्कींग केले होते़ ही जागा रेल्वे प्रशासनाची असताना याठिकाणी मनपाने सुविधा कशा पुरविल्या असा प्रश्न पडला आहे़ सोमवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्यानंतर सहाय्यक विभागीय अभियंता (जनरल) एल़ बिक्षापती आणि बी. दयाल यांनी सांगितले की, मार्च व एप्रिल महिन्यात दोन वेळा रेल्वेची जमीन खाली करण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस देण्यात आली होती़ २० मे रोजी जिल्हाधिकारी धीरजकुमार, मनपा आयुक्त जी़श्रीकांत आणि पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी संबंधित परिसराबद्दल चौकशी केली होती़ यानंतर त्यांना रेल्वे प्रशासनाने नोटिसांच्यासंदर्भात माहिती दिली़ अधिकार्‍यांनी चर्चा केल्यानंतर येथील रहिवाशांनी दहा दिवसांचा वेळ मागितला होता़ त्यानंतर आम्ही आज अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले़ सहाय्यक विभागीय अभियंता बी़ दयाल म्हणाले, रेल्वेपटरीपासून १०० मीटरपर्यंतची जमीन रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रणात असते़ १०० मीटरपर्यंतच्या परिसरात लालवाडीमध्ये आम्ही मार्किंगदेखील केली होती़ ज्यामध्ये मनपातर्फे बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट व महावितरणचे खांब होते़ यासंदर्भात स्थानीय प्रशासनाने रेल्वे विभागाचे कोणतेच नाहरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते़ रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक डी़ डी़ बैनवाड म्हणाले, अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत अडसर निर्माण करणार्‍या लोकांना हटविण्यासाठी ५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ यामध्ये दोन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला पोलिस व इतर ५० पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश होता़ शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता़ नागरिकांची काय चूक? मनपा अधिकार्‍यांनी संबंधित जमीन रेल्वे प्रशासनाची असूनदेखील नागरिकांना अंधारात ठेवण्याचे काम केले़ विशेष म्हणजे, या परिसरात १९६७ मध्ये महाराष्टÑ प्रज्ञा करुणा विद्याविकास संस्थेने इंदिरा विद्यालयाची स्थापना केली़ या अनुदानित शाळेला राज्य सरकारची मंजुरी आहे़ (प्रतिनिधी)