शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बजेट कोलमडले ! निवडणुकीच्या धामधुमीत महागाईचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:15 IST

राजकारणी प्रचारात व्यस्त, तर सर्वसामान्यांची महागाईने होरपळ

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंचे दर ४० टक्क्यांपर्यंत वधारले सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त तर दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. यामुळे  महागाई नियंत्रणात आणण्यात कुणाकडे वेळ नाही. परिणामी बाजारात जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ  ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये तर ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. जानेवारीत २६ ते २८ रुपये विक्री होणारी ज्वारी सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. तर १८ ते २० रुपयांनी मिळणारी बाजरी २४ ते २६ रुपये किलोने विकत आहे.

या दरवाढीनंतरही बाजरी बाजारात कमी उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महागून २८ ते ११२ रुपये किलोपर्यंत विकत आहेत. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने मूग व उडदाचा पेरा कमालीचा घटला होता. तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता. पाण्याअभावी रबीत गहू, ज्वारी, हरभऱ्याचा पेराही कमीच झाला होता. गव्हाची मध्यप्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हात जास्त परिणाम दिसून आला नाही.   

नियंत्रण कुणाचे?राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना नागरिकांच्या दु:खावर फुंकर घालायला कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019InflationमहागाईAurangabadऔरंगाबाद