शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बजेट कोलमडले ! निवडणुकीच्या धामधुमीत महागाईचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:15 IST

राजकारणी प्रचारात व्यस्त, तर सर्वसामान्यांची महागाईने होरपळ

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंचे दर ४० टक्क्यांपर्यंत वधारले सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त तर दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. यामुळे  महागाई नियंत्रणात आणण्यात कुणाकडे वेळ नाही. परिणामी बाजारात जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ  ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये तर ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. जानेवारीत २६ ते २८ रुपये विक्री होणारी ज्वारी सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. तर १८ ते २० रुपयांनी मिळणारी बाजरी २४ ते २६ रुपये किलोने विकत आहे.

या दरवाढीनंतरही बाजरी बाजारात कमी उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महागून २८ ते ११२ रुपये किलोपर्यंत विकत आहेत. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने मूग व उडदाचा पेरा कमालीचा घटला होता. तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता. पाण्याअभावी रबीत गहू, ज्वारी, हरभऱ्याचा पेराही कमीच झाला होता. गव्हाची मध्यप्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हात जास्त परिणाम दिसून आला नाही.   

नियंत्रण कुणाचे?राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना नागरिकांच्या दु:खावर फुंकर घालायला कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019InflationमहागाईAurangabadऔरंगाबाद