शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बजेट कोलमडले ! निवडणुकीच्या धामधुमीत महागाईचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:15 IST

राजकारणी प्रचारात व्यस्त, तर सर्वसामान्यांची महागाईने होरपळ

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंचे दर ४० टक्क्यांपर्यंत वधारले सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे.

- प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जीवनावश्यक वस्तूंचे दर सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वधारले आहेत. राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी निवडणूक प्रचारात व्यस्त तर दुसरीकडे सर्वसामान्य महागाईने होरपळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, साबुदाणा महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. सरकार व प्रशासन निवडणुकीच्या कामात गुंतले आहे. यामुळे  महागाई नियंत्रणात आणण्यात कुणाकडे वेळ नाही. परिणामी बाजारात जीवनावश्यक वस्तूंसह इतर वस्तूंची दरवाढ सुरूच आहे. मागील तीन महिन्यांत तूर डाळीच्या भावात किलोमागे ९ रुपयांनी वाढ होऊन ७४ ते ७५ रुपये प्रतिकिलो, हरभरा डाळ  ६ ते ८ रुपयांनी वधारून ५८ ते ६० रुपये, मठ डाळ १२ रुपयांनी वाढून ८२ ते ८४ रुपये, मूग व उडीद डाळीत २ रुपयांनी वाढ होऊन अनुक्रमे ७६ ते ७८ रुपये तर ६२ ते ६४ रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. जानेवारीत २६ ते २८ रुपये विक्री होणारी ज्वारी सध्या ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने मिळत आहे. तर १८ ते २० रुपयांनी मिळणारी बाजरी २४ ते २६ रुपये किलोने विकत आहे.

या दरवाढीनंतरही बाजरी बाजारात कमी उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तांदूळ क्विंटलमागे दोन ते अडीच रुपयांनी महागून २८ ते ११२ रुपये किलोपर्यंत विकत आहेत. खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने मूग व उडदाचा पेरा कमालीचा घटला होता. तुरीच्या उत्पादनावरही परिणाम झाला होता. पाण्याअभावी रबीत गहू, ज्वारी, हरभऱ्याचा पेराही कमीच झाला होता. गव्हाची मध्यप्रदेश व राजस्थानमधून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने गव्हात जास्त परिणाम दिसून आला नाही.   

नियंत्रण कुणाचे?राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणा सध्या निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना नागरिकांच्या दु:खावर फुंकर घालायला कोणी नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019InflationमहागाईAurangabadऔरंगाबाद