शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’कडे साहित्याचाही तुटवडा

By admin | Updated: August 23, 2015 23:45 IST

लोहारा : शहरासह तालुक्यात भारत संचार निगमच्या मोबाईल सेवेसह लँडलाईन सेवा म्हणजे रामभरोसे झाली असून, याचा लोहारा येथे भारत संचार निगमचे दूरध्वनी केंद्र असून

लोहारा : शहरासह तालुक्यात भारत संचार निगमच्या मोबाईल सेवेसह लँडलाईन सेवा म्हणजे रामभरोसे झाली असून, याचा लोहारा येथे भारत संचार निगमचे दूरध्वनी केंद्र असून, येथील उपअभियंता पद मागील सहा-सात महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे उमरगा येथील उपअभियंता एन. जे. सूर्यवंशी यांच्याकडे येथील पदभार आहे. त्यात एक टेलिफोन मेकॅनिक (टीएम) पद भरलेले आहे. तर दोन कंत्राटी कामगार आहेत. दोन ते तीन वर्षापूर्वी शहरात सातशेच्या जवळपास लँडलाईन कनेक्शन होते. पण त्यानंतर आलेली मोबाईल सेवा, त्यात सेवेतील व्यत्यय यामुळे अनेकांनी लँडलाईन सेवा बंद केली. सध्या साधारण ३०० लँडलाईन शहरात आहेत. यातील बहुतांश कनेक्शन हे इंटरनेट सेवा, फॅक्स तसेच शासकीय कार्यालय या ठिकाणीच वापर केला जात आहे. नेटवर्कमध्ये सातत्याने व्यत्यय येत असल्याने ग्राहकांना याचा फटका सोसावा लागतो. असे असतानाच सध्या छात्रभारती परिसर, हिप्परगा रोड भागात अंतर्गत वायरिंगचे काम चालू असल्याने आठ-दहा दिवसांपासून या भागातील लँडलाईन सेवा पूर्णपणे बंद आहे. त्यात होणारा वीज पुरवठा खंडित झाला की, मोबाईल सेवाही बंद पडते. जनरेटर आहे. पण अशावेळी तेही चालू केले जात नाही. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील माकणी, जेवळी, कानेगाव, सास्तूर, सालेगाव, आष्टाकासार या गावात एक्सचेंज कार्यालये आहेत. त्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा कायम आहे. लोहारा येथील टीएमकडे कानेगावचा पद्भार, माकणीच्या टीएमकडे सालेगावचा, येणेगुरच्या टीएमकडे जेवळीचा पद्भार अशी दुरवस्था आहे. याकडे बघण्यास कोणाकडेही वेळ नसल्याचे चित्र आहे. एक्सचेंजच्या ठिकाणी कंत्राटी कामगार आहेत. मात्र तेही तुटपुंजा ३०० ते ४०० रुपये मानधनावर. त्यांचे मानधन आज वाढेल उद्या वाढेल या आशेवर काम करीत आहेत. एखादे नवीन लँडलाईनचे कनेक्शन द्यायचे म्हटले तर वायर नाही. इन्स्टुमेंट नाही, त्यामुळे करायचे तरी काय, असा प्रश्न या कंत्राटी कामगारांना पडत आहे.लोहारा तालुक्यात साधारण एक हजारपेक्षा जास्त लँडलाईन कनेक्शन होते. ते आता सातशे ते आठशेवर आले असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तालुक्यात साधारण १० ते १५ हजार मोबाईलधारक बीएसएनएलची सेवा वापरतात. यातील ८० टक्के ग्राहक हे कृषी प्लॅनचे सीम वापरत आहेत. दरम्यान, तालुक्यात मोबाईल, लँडलाईन, इंटरनेट सेवा ही महिन्यातून दोन ते तीनदा सतत विस्कळीत होत आहे. यासंदर्भात प्रभारी उपअभियंता एन.जे. सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आमची सेवा ही सुरळतीच आहे. मात्र सध्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे ‘ओएफसी’ वायर सातत्याने तुटून सेवा विस्कळीत होत असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. (वार्ताहर)