शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या २५ कोटींच्या योजनांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 20:23 IST

अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची निवड करण्याबाबत तत्परता दाखविली नाही.

ठळक मुद्देजि.प. समाजकल्याण विभागाचा अधिकारी-पदाधिकाऱ्यांची अनास्था कारणीभूत

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागणार, याची कल्पना असतानादेखील जि.प. समाजकल्याण अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांची निवड करण्याबाबत तत्परता दाखविली नाही. परिणामी, चालू आर्थिक वर्षामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (दलित वस्ती सुधार योजना) या योजनेंतर्गत २५ कोटी २५ लाख ५५ हजार रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. 

जिल्हा परिषदेत ज्यांना योजनांची अंमलबजावणी करावी लागते, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्यांना योजना राबविली किंवा नाही, याबद्दल कसलेही देणे-घेणे नाही. प्रशासन व्यवस्थेतील अशा विरोधाभासामुळे कोणतीही योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही, हे दुर्दैव आहे, अशी खंत प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते, याची वर्षभरापासून चर्चा होती, असे असतानाही समाजकल्याण विभागाने चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीचे वेळेच्या आत नियोजन केले नाही. विषय समितीला योजनांच्या लाभार्र्थींची निवड करण्याचे अधिकार आहेत.

समितीनेही योजनांचे पुनर्नियोजन करण्यामध्ये वेळ घालवला. त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांची निवड होऊ शकली नाही. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेसाठी पंचवार्षिक बृहत आराखडा तयार करण्यात आला; परंतु गटविकास अधिकाऱ्यांकडून सदोष आराखडा तयार झाल्यामुळे समाजकल्याण आयुक्तांनी तो पहिल्यांना नामंजूर केला. त्रुटींच्या पूर्ततेनंतर तो मंजूर केला. यालाही बराच वेळ गेला. त्यामुळे यासाठी प्राप्त ३० कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यात ८ कोटी ६८ लाख ४८ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यंदा चालू आर्थिक वर्षात २१ कोटी ३१ लाख ६२ हजार रुपये अखर्चित राहिले आहेत. या निधीच्या खर्चासाठी दोन वर्षांची मुदत असली, तरी अखर्चित निधी दायित्वात जातो आणि पुढच्या वर्षी कमी तरतूद प्राप्त होते, यात जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान आहे, असे बोलले जाते. 

अपंगांची घरकुल योजना लागली मार्गीसमाजकल्याण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या उपकरातील ५ टक्के निधी अपंगांच्या कल्याणकारी योजनांवर खर्च केला जातो. जिल्हा परिषदेने अपंगांसाठी घरकुल योजना हाती घेतली असून, यंदा ७० अपंगांना प्रती घरकुल १ लाख २० रुपये याप्रमाणे ८४ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, अनेक घरकुलांची कामे मार्गी लागली आहेत. समाजकल्याण विभागाच्या एकूण योजनांपैकी एकमेव अपंगांची ही योजना आचारसंहितेच्या कचाट्यातून सुटली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी