शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

काेकणातील वारे मंदावल्यामुळे पावसाला ब्रेक; तापमान कमी, दमट वातावरणामुळे घामाच्या धारा

By विकास राऊत | Updated: June 19, 2024 18:26 IST

तापमान वाढत असून, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे वातावरण दमट झाले आहे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून, सर्व भागांत कमी-अधिक पाऊस होत आहे. मात्र, मराठवाड्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. कोकणातील वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळे पावसाने ब्रेक घेतला आहे. तापमान वाढत असून, हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेली आहे. त्यामुळे वातावरण दमट झाले असून, जनसामान्य घामाघूम होत आहेत.

जिल्ह्यात १५ जून रोजी सकाळपर्यंत १०.९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आजवर १४५.३ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाल्याचे आकडे सांगत आहेत. असे असले तरी जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांत पुरेसा पाणीसाठा निर्माण झालेला नाही. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ५८१.७ मि.मी. आहे.

जिल्ह्यात आजवर झालेला पाऊसतालुका.........................पाऊसछत्रपती संभाजीनगर........१३९ मि.मीपैठण.................१६८ मि.मी.गंगापूर..............१३८ मि.मी.वैजापूर...............१२३ मि.मी.कन्नड..............१५६ मि.मी.खुलताबाद............१६१ मि.मी.सिल्लोड ............१३७ मि.मी.सोयगाव.............१२६ मि.मी.फुलंब्री..............१८० मि.मी.एकूण.........१४५.३ मि.मी.

वाऱ्याचा वेग मंदावलाकोकणातून येणाऱ्या वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पावसाने ब्रेक घेतला आहे. पुढील दोन ते तीन दिवस पाऊस कमी राहील. परिणामी, तापमान वाढत आहे. हवेतील आर्द्रता ६० टक्क्यांवर गेल्यामुळे दुपारी पाऊस येईल, अशी चिन्हे होती; परंतु वाऱ्याचा वेग कमी असल्याने पाऊस आला नाही. कमाल तापमान ३६, तर किमान तापमान २९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.- श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊस