शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील एनएचएआय प्रकल्पांना अनुदानाअभावी ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:30 IST

जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत

ठळक मुद्दे जालना रोड, बीड बायपासकडे दुर्लक्षअजिंठा रस्त्याचे काम रखडले

औरंगाबाद : जिल्ह्यातील नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत सुरू असलेली कामे ठप्प पडली आहेत. जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत, तर औरंगाबाद ते अजिंठामार्गे जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण निधीअभावी रखडले आहे. धुळे ते औरंगाबाद या एनएच २११ शिवाय कुठलेही काम सध्या सुरू नाही. औरंगाबाद ते पैठण डीपीआरचे काम बंद पडले आहे.

एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडीकडे वर्ग केलेली कामे गुलदस्त्यात आहेत. राज्य एनएचएआयच्या विभागाला तातडीने दिलेल्या निधीतून जालना रोडचे तात्पुरते मजबुतीकरण करण्यात येणार आहे. ते कामही अजून सुरू झालेले नाही, तर बीड बायपास चर्चेतून गायबच झाला आहे.  जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यात ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट आहे.

चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने ते काम सध्या बंद ठेवले आहे. त्या रस्त्याचा केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे वाढीव निधीसाठी दिलेला प्रस्ताव पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाच्या देखरेखीखाली त्या रस्त्याचे काम आहे. सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असली तरी अंतिम मंजुरी अजून दिलेली नाही. पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली. ही तरतदू द्विपदरीकरणासाठी करण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी सध्या तरी तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. 

सुधारित घोषणेची, कार्यवाही नाहीजालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने २७५ कोटी निधी देण्याचे जाहीर केले. बीड बायपाससाठी १२५ कोटी रुपयांचा, तर जालना रोडसाठी १५० अशी २७५ कोटींची सुधारित घोषणा १ जून २०१८ रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कामाच्या निविदा निघतील, असा दावा सूत्रांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाCentral Governmentकेंद्र सरकार