शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

औरंगाबादेतील एनएचएआय प्रकल्पांना अनुदानाअभावी ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:30 IST

जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत

ठळक मुद्दे जालना रोड, बीड बायपासकडे दुर्लक्षअजिंठा रस्त्याचे काम रखडले

औरंगाबाद : जिल्ह्यातील नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) अंतर्गत सुरू असलेली कामे ठप्प पडली आहेत. जालना रोड, बीड बायपासच्या कामासाठी २७५ कोटींची घोषणा होऊन पाच महिने झाले आहेत, तर औरंगाबाद ते अजिंठामार्गे जळगाव या रस्त्याचे चौपदरीकरण निधीअभावी रखडले आहे. धुळे ते औरंगाबाद या एनएच २११ शिवाय कुठलेही काम सध्या सुरू नाही. औरंगाबाद ते पैठण डीपीआरचे काम बंद पडले आहे.

एमएसआरडीसी आणि पीडब्ल्यूडीकडे वर्ग केलेली कामे गुलदस्त्यात आहेत. राज्य एनएचएआयच्या विभागाला तातडीने दिलेल्या निधीतून जालना रोडचे तात्पुरते मजबुतीकरण करण्यात येणार आहे. ते कामही अजून सुरू झालेले नाही, तर बीड बायपास चर्चेतून गायबच झाला आहे.  जळगाव ते औरंगाबाद या चौपदरी रस्त्याचे काम सध्या बंद पडल्यासारखेच आहे. औरंगाबाद ते अजिंठापासून पुढे फर्दापूर ते जळगावपर्यंत हा रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी तीन टप्प्यात ८५० कोटींच्या आसपास खर्च होणार आहे. ऋत्विक एजन्सी या संस्थेकडे त्या कामाचे कंत्राट आहे.

चौपदरीकरणाच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मंजुरी न मिळाल्यामुळे कंत्राटदाराने ते काम सध्या बंद ठेवले आहे. त्या रस्त्याचा केंद्रीय दळणवळण मंत्रालयाकडे वाढीव निधीसाठी दिलेला प्रस्ताव पडून आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नॅशनल हायवे विभागाच्या देखरेखीखाली त्या रस्त्याचे काम आहे. सरकारने तत्त्वत: मान्यता दिली असली तरी अंतिम मंजुरी अजून दिलेली नाही. पहिल्या टप्प्यात ३०४ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी, तर तिसऱ्या टप्प्यात ३१६ कोटी अशी त्या रस्त्याच्या कामासाठी तरतूद करण्यात आली. ही तरतदू द्विपदरीकरणासाठी करण्यात आलेली आहे. चौपदरीकरणासाठी सध्या तरी तत्त्वत: मान्यता देण्यात आलेली आहे. 

सुधारित घोषणेची, कार्यवाही नाहीजालना रोड आणि बीड बायपास या दोन्ही रस्त्यांसाठी नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाने २७५ कोटी निधी देण्याचे जाहीर केले. बीड बायपाससाठी १२५ कोटी रुपयांचा, तर जालना रोडसाठी १५० अशी २७५ कोटींची सुधारित घोषणा १ जून २०१८ रोजी केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्याबाबत अजून काहीही निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर २०१८ पर्यंत या कामाच्या निविदा निघतील, असा दावा सूत्रांनी केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाCentral Governmentकेंद्र सरकार