शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

सावकारीचा नवा फंडा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 00:44 IST

जालना : अनधिकृत खाजगी सावकारीला चाप लावण्यासाठी शासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केल्यानंतर अनेकांनी कृषी सेवा केंद्राआडून सावकारीचा नवा फंडा सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनधिकृत खाजगी सावकारीला चाप लावण्यासाठी शासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केल्यानंतर अनेकांनी कृषी सेवा केंद्राआडून सावकारीचा नवा फंडा सुरू केला आहे. गोरगरीब शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीला कृषी केंद्रातून बी-बियाणे, खते, कृषी साहित्याची विक्री करायची आणि शेतकऱ्याचे पीक बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर व्याजासह दामदुप्पट रक्कम वसूल करायची या प्रकारामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सावकारीच्या दुष्टचक्रात अडकले आहेत.खाजगी सावकार व बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या चिंतेने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात १९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. सावकारीवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने मुंबई सावकारी अधिनियमानुसार मनमानी व्याज वसूल करणाऱ्या अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला. शेतकऱ्यांना सावकाराच्या दरात जाण्याची गरज पडू नये यासाठी बँकामधून पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले. मात्र, बँकांच्या जाचक अटी,कर्ज देताना होणाऱ्या विलंबामुळे बहुतांश शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळत नाही. अपात्रतेच्या नावाखाली बँका अनेक शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे टाळतात. परिणामी ऐन हंगामात हातात पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजास्तव सावकाराच्या दारात जावे लागते. सावकारी कारवाईपासून पळवाट शोधण्यासाठी काहींनी कृषी केंद्राच्या आडून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा नवा मार्ग शोधला आहे. जालना जिल्ह्यात सुमारे १८०० कृषीसेवा केंद्र असून, शेतकऱ्यांची संख्या साडेपाच लाखांपर्यंत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्यामुळे बी-बियाणे, रासायनिक खते, औषधे, सिंचन साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. रोख पैसे नसणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रावर अनेकदा कुठलीही पावती देत नाहीत. उधारीवर दिलेल्या कृषी साहित्याचे पैसे वसूल करताना शेतकऱ्यांकडून मूळ रकमेवर तीन ते पाच टक्के व्याज आकारणी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. तालुक्याची ठिकाणे व मोठ्या बाजार गावातील कृषीसेवा केंद्रावर हे प्रमाण अधिक असून, एका गावातील सुमारे १५० शेतकरी सावकारीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कृषी सेवा केंद्राआड होणाऱ्या व्याजबट्ट्याच्या या व्यवहाराची नोंद होत नाही. परिणामी माहिती असतानाही अशा सावकारीवर कायदेशीर अंकुश ठेवणे शक्य नसल्याचे अधिकारी सांगत आहेत.