शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

गं्रथ अधिक काळ जगतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:08 IST

गं्रथ हजार वर्षांहून अधिक काळ जगत असल्याचे प्रतिपादन साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. के. डी. सोनकांबळे व डॉ. तोहर एच. पठाण संपादित डॉ. परशुराम गिमेकर यांच्यावर लिखित ‘कस्तुरी’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गं्रथ हजार वर्षांहून अधिक काळ जगत असल्याचे प्रतिपादन साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. के. डी. सोनकांबळे व डॉ. तोहर एच. पठाण संपादित डॉ. परशुराम गिमेकर यांच्यावर लिखित ‘कस्तुरी’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त केले.प्रा.फ.मुं. शिंदे हस्ते व प्रा.अविनाश डोळस यांच्या अध्यक्षतेखाली मजनू हिल येथील मौलाना आझाद संशोधन सभागृहात उपस्थितीत रविवारी गौरव गं्रथाचा प्रकाशन सोहळा झाला. यावेळी डॉ. सतीश बडवे, डॉ. गणेशराज सोनाळे, प्रा.डी.बी.जगत्पुरीया यांंच्यासह साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषण करताना प्रा. डोळस म्हणाले, गं्रथ हजार वर्षांहून अधिक जगतात. प्रत्येकाचे जगणे वेगळे असते. त्या जगण्याचे प्रश्न व शोधलेली उत्तरे वेगळी असतात. जगत असताना सांस्कृतिक संघर्ष असतो. त्याचेही वेगळे महत्त्व असते. त्याचे प्रतिबिंब गौरव गं्रथात, आत्मचरित्रात उमटत असते. कस्तुरी हा ग्रंथ १०० वर्षांहून अधिक काळ उपलब्ध राहील. गिमेकर यांच्यावरील गौरव ग्रंथात सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिक्षणातून परिवर्तन होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक चळवळीचा आदर्श घेऊन अनेक जण परिवर्तनातून पुढे आले. गिमेकर यांनादेखील चळवळीच्या पार्श्वभूमी दृष्टी आली. साहित्य एका जातीचे होऊ नये, विशिष्ट जातीचे ब्रॅण्ड होऊ नये. याची काळजी घेतली जावी, असे सांगून डोळस यांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्यासह इतर साहित्यिकांचे दाखले दिले. याप्रसंगी प्रा. शिंदे यांनी गौरव ग्रंथाला शुभेच्छा दिल्या.प्रास्ताविक डॉ. सोनकांबळे, डॉ. पठाण यांनी केले. डॉ. सोनाळे, प्रा.जगत्पुरीया, डॉ. बडवे यांनी गौरव ग्रंथावर भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समाधान इंगळे यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिक