शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

थॅलेसेमियाग्रस्तांसाठी मराठवाड्यामध्ये ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’चा कणा मोडला

By संतोष हिरेमठ | Updated: May 8, 2024 13:47 IST

जागतिक थॅलेसेमिया दिन विशेष: फक्त ब्लड कॅन्सरग्रस्तांचे होतात ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ब्लड कॅन्सरग्रस्तांचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ होतात, मात्र, थॅलेसेमियाग्रस्तांचे ‘बोन मॅरो ट्रान्सप्लांट’ होत नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे मराठवाड्यातील थॅलेसेमियाग्रस्तांना मुंबई, पुणे, बंगळुरु गाठावे लागत आहेत. शिवाय यासाठी शासनाकडून तोकडी मदत मिळत असल्याने लाखो रुपये जमा करण्यासाठी थॅलेसेमियाग्रस्तांच्या कुटुंबियांना मदतीसाठी याचना करण्याची वेळ येत आहे.

दरवर्षी ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळण्यात येतो. दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढत असून, बालकांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांना १५ ते २५ दिवसांनी रक्त द्यावे लागते. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने हा आजार होतो. शरीरात रक्तनिर्मिती बंद झाल्याने थॅलेसेमिया हा आजार होतो. त्याबरोबरच दोन ‘मायनर थॅलेसेमिया’ग्रस्तांनी विवाह केला तर जन्माला येणारे मूल ‘थॅलेसेमिया मेजर’ राहण्याची शक्यता असते.

जिल्ह्यात थॅलेसेमियाग्रस्तांची स्थिती- २०१६ : ६८०- २०२४ : १,२००

काय आहे हा आजार?थॅलेसेमिया हा एक जनुकीय आजार आहे. थॅलेसेमियाग्रस्तांना दर १५-२० दिवसांच्या अंतराने रक्त द्यावे लागते. वारंवार रक्त घेतल्याने रक्तातील लोहाचे प्रमाण मर्यादेपलीकडे वाढते. त्यामुळे अतिरिक्त औषधांची गरज असते. लाल रक्तपेशीमधील हिमोग्लोबीनच्या निर्मितीशी संबंधित असलेल्या जीन्समध्ये असामान्यता हे थॅलेसेमियाचे प्रमुख कारण आहे. आनुवंशिक दोष वारसाने येतो. जीन्समध्ये असलेल्या या असामान्यतेचे निम्मे प्रमाण दोन्ही पालकांमध्ये असल्यास (थॅलेसेमिया ट्रेट) यांच्या अपत्यामध्ये २५ टक्के हा आजार उद्भवतो, तर ५० टक्के अपत्ये कॅरिअर्स (निम्मे दोषवाहक) असतात.

मराठवाड्यात हवी ट्रान्सप्लांटची सुविधाथॅलेसेमियाग्रस्तांच्या बोन बॅरो ट्रान्सप्लांटसाठी आजघडीला मुंबई, पुण्याला जावे लागते. त्यासाठी किमान १८ लाखांचा खर्च येतो. सरकारकडून पूर्वी ३ लाखांची मदत होत असे. आता ती दीड लाखांवर आली आहे. उर्वरित रक्कम पालकांना जमा करावी लागते. मराठवाड्यात सरकारी आणि खासगी रुग्णालय या दोन्ही ठिकाणी हे ट्रान्सप्लांट होत नाही. मराठवाड्यात ही सुविधा सुरू झाली पाहिजे.- अनिल दिवेकर, सचिव, थॅलेसेमिया सोसायटी

पालकांनी घ्यावी काळजीथॅलेसेमियाग्रस्त मुलांची पालकांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. वेळेवर रक्त दिले पाहिजे. दर तीन महिन्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. भाऊ-बहिणीचे बोन मॅरो मॅच झाल्यामुळे २५ टक्के थॅलेसेमियाग्रस्तांचे ट्रान्सप्लांट शक्य होते. जवळपास ७५ टक्के थॅलेसेमियाग्रस्तांना आयुष्यभर रक्त घेत राहावे लागते. शहरात ब्लॅड कॅन्सरच्या रुग्णांचे बोन मॅरो ट्रान्सप्लांट होतात. लवकरच इथेही थॅलेसेमियाग्रस्तांचेही ट्रान्सप्लांट होईल, अशी अपेक्षा आहे.- डाॅ. मनोज तोष्णीवाल, रक्तविकार व बोन मॅरो ट्र्रान्सप्लांट तज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य