शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत बोगस पटसंख्येद्वारे शाळांची बनवेगिरी; शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीत झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 17:11 IST

गंभीर स्वरूपाच्या अनियमितता शाळाभेटीदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांच्या नजरेस आल्या. 

ठळक मुद्दे शाळांकडून शासनाची फसवणूक स्पष्टयासंदर्भात एकेका शिक्षकाकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारपूस केली.

औरंगाबाद : बोगस विद्यार्थ्यांच्या आधारे वाढीव पटसंख्या दाखविणे, बोगस पटसंख्येच्या आधारे वाढीव शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव शिक्षण विभागात दाखल करणे, शाळेत न येणाऱ्या शिक्षकांना नियमित वेतन अदा करणे, आदी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता शाळाभेटीदरम्यानशिक्षणाधिकाऱ्यांच्या नजरेस आल्या. 

शनिवारी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी काही शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली. तेव्हा खोकडपुरा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये हजेरी पटावर नमूद एकूण विद्यार्थी संख्येपेक्षा अनेक विद्यार्थी व शिक्षक गैरहजर असल्याचे दिसून आले. या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग असून, हजेरी पटावर एकूण १८२ विद्यार्थी आहेत. शनिवारी भेटीदरम्यान प्रत्यक्षात एकूण ५६ विद्यार्थीच उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. गैरहजर विद्यार्थ्यांबाबत शिक्षणाधिकारी चव्हाण यांनी विचारणा केली असता एकाही शिक्षकाला त्यासंबंधी उत्तर देता आले नाही. सरलप्रणालीअंतर्गत शाळा व विद्यार्थ्यांना कोड नंबर देण्यात आलेले आहेत; परंतु नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक दिसून आला नाही. त्याामुळे अन्य शाळांतील विद्यार्थी अथवा विद्यार्थ्यांची काल्पनिक नावे हजेरीपटावर नोंदविण्यात आली असावीत, असा संशय शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, बोगस विद्यार्थी संख्येच्या आधारे ३-४ शिक्षकांच्या मान्यतेचे प्रस्ताव या शाळेने शिक्षण विभागात सादर केले आहेत. एक शिक्षिका स्वेच्छा निवृत्ती घेणार होती; परंतु तिला स्वेच्छा निवृत्तीपासून परावृत्त करून तिला घरी बसूनच वेतन अदा केले जाते. तब्बल वर्षभरापासून सदरील शिक्षिका शाळेतच आलेली नाही. यासंदर्भात एकेका शिक्षकाकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारपूस केली. त्यावेळी शिक्षक दडपणाखाली दिसून आले. काही वाच्यता करावी, तर दुसऱ्या जिल्ह्यात बदली केली जाते. सेवाज्येष्ठता डावलली जाते. पदोन्नती नाकारली जाते, अशी कैफियत शिक्षकांनी मांडल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

दोषींविरुद्ध कारवाई करणारयासंदर्भात माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले की, हा अतिशय गंभीर प्रकार असून, बोगस पटसंख्येच्या आधारे शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्या संस्था, मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. यासारखे प्रकार अनेक शाळांमध्ये असल्याचा संशय चव्हाण यांनी व्यक्त केला असून, अचानक भेटी देऊन शासनाच्या रकमेचा अपहार करणाऱ्या शाळांचा भांडाफोड करणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :SchoolशाळाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र