शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
4
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
5
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
6
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
20
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?

खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजप लोकप्रतिनिधींची दांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:11 IST

शिवसेनेचे मंत्री असलेल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.  

ठळक मुद्देशुक्रवारी वाल्मी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीकडे भाजपचे स्थानिक आमदार, नेते कोणीच फिरकले नाही.

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली आहे. मात्र, जिल्ह्यातील आमदारांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असे चित्र शुक्रवारी दिसले. शिवसेनेचे मंत्री असलेल्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित खरीप हंगामपूर्व बैठकीला भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दांडी मारली.  

जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हजर राहणे अपेक्षित असते. कृषी विभागाचे नियोजन समजून घेणे व आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणे हीच अपेक्षा लोकप्रतिनिधीकडून असते. मात्र, शुक्रवारी वाल्मी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीकडे भाजपचे स्थानिक आमदार, नेते कोणीच फिरकले नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा. चंद्रकांत खैरे, आ. अब्दुल सत्तार, आ. संदीपान भुमरे, महापौर नंदकुमार घोडेले, जि.प. अध्यक्षा देवयानी डोणगावकर व शिवसेनेचे अंबादास दानवे यांचीच उपस्थिती होती. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरील बैठकीत भाजप व शिवसेनेतील काही आमदारांची अनुपस्थिती सर्वांना खटकली. आ. अब्दुल सत्तार यांनी यावरील आपली खंत व्यक्त केली. पालकमंत्री शिवसेनेचे असल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे अन्य लोकप्रतिनिधी आले नाहीत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. खाजगीत बोलताना खा. खैरे म्हणाले की, खुद्द विधानसभेचे अध्यक्ष आज शहरात आहेत. त्यांनी तरी बैठकीत यायला पाहिजे होते.  पालकमंत्र्यांनी जरी दोन्ही पक्षांत सर्व आलबेल असल्याचे सांगितले असले तरीही बैठकीत आलेल्यांमध्ये दोन्ही पक्षांतील वाद एवढे टोकाला गेले, की पालकमंत्र्यांनी बोलविलेल्या  बैठकीलाही भाजपचे आमदार, लोकप्रतिनिधी हजर राहिले नाहीत, अशीच चर्चा सुरू होती.

वैयक्तिक कारणाचा खुलासापत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचारले असता, पालकमंत्री डॉ. सावंत यांनी सारवासारवीचे उत्तर दिले. शिवसेना व भाजपचे संबंध चांगले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये काहीच वाद नाही. सर्व काही आलबेल आहे. भाजपचे आमदार व अन्य लोकप्रतिनिधी त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे बैठकीला येऊ शकले नाहीत, असा खुलासाही त्यांनी केला. शिवसेना-भाजपत चांगले संबंध असल्याने मी चांगल्या प्रकारे खरीप हंगाम बैठकीत बोलू शकलो, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

टॅग्स :BJPभाजपाAgriculture Sectorशेती क्षेत्रAtul Saaveअतुल सावेdr. deepak sawantदीपक सावंतguardian ministerपालक मंत्री