शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
7
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
8
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
9
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
10
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
11
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
12
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
13
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
14
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
15
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
16
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
17
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
18
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
19
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
20
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
Daily Top 2Weekly Top 5

केज मतदारसंघात भाजपातील निष्ठावंतांची कायम गोची

By admin | Updated: September 8, 2014 00:55 IST

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाई जनसंघांच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या भाजपच्या कर्मभूमीत अनेक निष्ठावंत आजही कायम आहेत.

अविनाश मुडेगावकर, अंबाजोगाईजनसंघांच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या निर्मितीत योगदान असणाऱ्या भाजपच्या कर्मभूमीत अनेक निष्ठावंत आजही कायम आहेत. मात्र, सातत्याने पक्षात नव्याने दाखल होणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे निष्ठावंतांची कायम गोची सुरूच आहे. महाराष्ट्रात आणिवाणीनंतर जनसंघाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची मोठी फौज अंबाजोगाईत व केजमध्ये निर्माण झाली. या जनसंघाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाली. अंबाजोगाईच्या मातीतून कै. प्रमोद महाजन, कै. गोपीनाथ मुंडे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, अशी कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली. ही सर्व नेतृत्व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचली. या सर्वांना घडविण्याचे काम अंबाजोगाईत प्राचार्य राजाभाऊ धाट, मा.मा. क्षीरसागर, राजाभाऊ चौसाळकर, यांच्यासह मान्यवरांनी केली. आज भाजपचा वटवृक्ष झाल्यानंतर पक्षाच्या निर्मितीपासून खस्ता खाणारे हे लोक कुठे आहेत? याचा विसर भाजपला पडला आहे. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून प्रा. सतीश पत्की, प्रा. अशोक लोमटे, अनिल बायस असे नेतृत्व तयार झाले. हे निष्ठावंत आजही पक्षात अडगळीला पडले आहेत. तर भाजपामध्ये प्रारंभीपासून कार्यकर्त्यांची भूमिका निम्भावणारे डॉ. अमृतराव देशपांडे, भारत पसारकर, राम घाडगे (केज), अशी अनेकांची नावे सांगता येतील. या सर्वांनी पक्षाच्या विस्तारासाठी कठोर परिश्रम व मेहनत घेतली. मात्र, पक्ष सत्तेत आल्यानंतर सत्तेची फळे चाखण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयाराम - गयाराम यांची गर्दी वाढली. अन् परिणामी निष्ठावंतांची आजही कायम गोची सुरूच आहे.अंबाजोगाई व केज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातून भाजपमधून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्या पाच वर्षात दत्तात्रय पाटील, राजेश कराड, सुनिल लोमटे, अविनाश लोमटे, हारूण इनामदार, अशा कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करीत ज्यांना भाजपचा इतिहासही माहित नाही. असे अनेक कार्यकर्ते पक्षात येऊन सत्तेची फळे चाखत आहेत. मात्र, पक्षासाठी परिश्रम घेतलेले निष्ठावंत मात्र आजही कायम अडगळीलाच पडलेले आहेत. ज्या कर्मभूमीतून राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व साध्य करण्याची किमया या मतदार संघात झाली. त्याच मतदार संघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची उपेक्षा कायम आहे.