शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
5
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
7
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
8
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
9
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
10
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
11
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
12
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
13
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
14
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
15
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
16
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
17
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
18
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
19
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
20
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!

भाजपकडून घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू : जिग्नेश मेवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:13 IST

संविधान वाचविण्यासाठी भाजपला रोखा

ठळक मुद्देआंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता

औरंगाबाद : हळूहळू घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवायचे असेल, तर मतदानाच्या ताकदीतून आरएसएस आणि भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विखुरलेल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जिग्नेश मेवानी यांनी केले. 

संविधान सन्मान यात्रा औरंगाबादेत आल्यावर ते आयोजित सभेला संबोधित करीत होते. रिपाइं नेते तथा जि.प. सदस्य रमेश गायकवाड अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रल्हाद लुुलेकर, निवृत्ती सांगवे, डॉ. सुशील गौतम, नगरसेवक रवी सोनकांबळे, अशोक पगार आदींची उपस्थिती होती. 

आ. मेवानी पुढे म्हणाले की, दुष्काळ व महापुराच्या खाईत मराठवाड्याला ढकलून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत जनतेच्या पैशावर महाजनादेश यात्रा काढणाऱ्या मुख्यमंत्र्याला जनतेचे काही देणे घेणे नाही. याचा जाब जनतेने विचारायला हवा. मुस्कटदाबीचे राजकारण जनतेला समजू लागले आहे. गुजरातचा दलित आणि महाराष्ट्राच्या दलिताच्या जोडीला हिंमत देण्यासाठी आला आहे. नामांतर चळवळीत औरंगाबादचे नाव सर्वांना परिचित आहे. दलित क्रांतीचे बीज या शहरातूनच निर्माण झाले आहे. नवीन नेतृत्व विकाऊ नव्हे तर टिकाऊ तयार करण्याची जबाबदारी सामान्य जनतेत आहे. आंबेडकरी जनतेने सर्वांना सोबत घेऊनच राजकीय लढाई लढायची असून, त्यासाठी तुमची सर्वांची साथ आवश्यक आहे. म्हणून संविधान सन्मान यात्रा काढावी लागत आहे. 

प्रा. लुलेकर यांनी घटनेच्या बाजू कमकुवत करणाऱ्या जातीयवादी संघटनेचे डाव आता तरी तुम्ही ओळखा असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोप करताना रमेश गायकवाड यांनी समाजाची होत असलेली वाताहत टाळण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून मतदान घेण्यासाठी पेटून उठावे लागेल, असे सांगितले. 

यावेळी कडूबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक भीमगीताला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर संयोजकांनी खरात यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप पगारे व प्रमोद मगरे यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजकांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रात युवकांनी जागरूक व्हावेशिक्षण ही विकासाची जननी असून, सध्या सोशय मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट अगदी विचारपूर्वक आवश्यकता असेल तरच पुढे टाकाव्यात. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या नाहक आणि व्यर्थ पोस्टला टाकू नये, याविषयी सतत जागरूक असले पाहिजे.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद