शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू : जिग्नेश मेवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:13 IST

संविधान वाचविण्यासाठी भाजपला रोखा

ठळक मुद्देआंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता

औरंगाबाद : हळूहळू घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवायचे असेल, तर मतदानाच्या ताकदीतून आरएसएस आणि भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विखुरलेल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जिग्नेश मेवानी यांनी केले. 

संविधान सन्मान यात्रा औरंगाबादेत आल्यावर ते आयोजित सभेला संबोधित करीत होते. रिपाइं नेते तथा जि.प. सदस्य रमेश गायकवाड अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रल्हाद लुुलेकर, निवृत्ती सांगवे, डॉ. सुशील गौतम, नगरसेवक रवी सोनकांबळे, अशोक पगार आदींची उपस्थिती होती. 

आ. मेवानी पुढे म्हणाले की, दुष्काळ व महापुराच्या खाईत मराठवाड्याला ढकलून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत जनतेच्या पैशावर महाजनादेश यात्रा काढणाऱ्या मुख्यमंत्र्याला जनतेचे काही देणे घेणे नाही. याचा जाब जनतेने विचारायला हवा. मुस्कटदाबीचे राजकारण जनतेला समजू लागले आहे. गुजरातचा दलित आणि महाराष्ट्राच्या दलिताच्या जोडीला हिंमत देण्यासाठी आला आहे. नामांतर चळवळीत औरंगाबादचे नाव सर्वांना परिचित आहे. दलित क्रांतीचे बीज या शहरातूनच निर्माण झाले आहे. नवीन नेतृत्व विकाऊ नव्हे तर टिकाऊ तयार करण्याची जबाबदारी सामान्य जनतेत आहे. आंबेडकरी जनतेने सर्वांना सोबत घेऊनच राजकीय लढाई लढायची असून, त्यासाठी तुमची सर्वांची साथ आवश्यक आहे. म्हणून संविधान सन्मान यात्रा काढावी लागत आहे. 

प्रा. लुलेकर यांनी घटनेच्या बाजू कमकुवत करणाऱ्या जातीयवादी संघटनेचे डाव आता तरी तुम्ही ओळखा असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोप करताना रमेश गायकवाड यांनी समाजाची होत असलेली वाताहत टाळण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून मतदान घेण्यासाठी पेटून उठावे लागेल, असे सांगितले. 

यावेळी कडूबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक भीमगीताला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर संयोजकांनी खरात यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप पगारे व प्रमोद मगरे यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजकांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रात युवकांनी जागरूक व्हावेशिक्षण ही विकासाची जननी असून, सध्या सोशय मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट अगदी विचारपूर्वक आवश्यकता असेल तरच पुढे टाकाव्यात. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या नाहक आणि व्यर्थ पोस्टला टाकू नये, याविषयी सतत जागरूक असले पाहिजे.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद