शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
3
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
4
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
5
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
6
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
7
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
8
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
9
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
10
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
11
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
12
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
13
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
14
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
15
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
20
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू : जिग्नेश मेवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 20:13 IST

संविधान वाचविण्यासाठी भाजपला रोखा

ठळक मुद्देआंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता

औरंगाबाद : हळूहळू घटनेचा ढाचा ढिसूळ करण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवायचे असेल, तर मतदानाच्या ताकदीतून आरएसएस आणि भाजपला रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी विखुरलेल्या आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जिग्नेश मेवानी यांनी केले. 

संविधान सन्मान यात्रा औरंगाबादेत आल्यावर ते आयोजित सभेला संबोधित करीत होते. रिपाइं नेते तथा जि.प. सदस्य रमेश गायकवाड अध्यक्षस्थानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रल्हाद लुुलेकर, निवृत्ती सांगवे, डॉ. सुशील गौतम, नगरसेवक रवी सोनकांबळे, अशोक पगार आदींची उपस्थिती होती. 

आ. मेवानी पुढे म्हणाले की, दुष्काळ व महापुराच्या खाईत मराठवाड्याला ढकलून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत जनतेच्या पैशावर महाजनादेश यात्रा काढणाऱ्या मुख्यमंत्र्याला जनतेचे काही देणे घेणे नाही. याचा जाब जनतेने विचारायला हवा. मुस्कटदाबीचे राजकारण जनतेला समजू लागले आहे. गुजरातचा दलित आणि महाराष्ट्राच्या दलिताच्या जोडीला हिंमत देण्यासाठी आला आहे. नामांतर चळवळीत औरंगाबादचे नाव सर्वांना परिचित आहे. दलित क्रांतीचे बीज या शहरातूनच निर्माण झाले आहे. नवीन नेतृत्व विकाऊ नव्हे तर टिकाऊ तयार करण्याची जबाबदारी सामान्य जनतेत आहे. आंबेडकरी जनतेने सर्वांना सोबत घेऊनच राजकीय लढाई लढायची असून, त्यासाठी तुमची सर्वांची साथ आवश्यक आहे. म्हणून संविधान सन्मान यात्रा काढावी लागत आहे. 

प्रा. लुलेकर यांनी घटनेच्या बाजू कमकुवत करणाऱ्या जातीयवादी संघटनेचे डाव आता तरी तुम्ही ओळखा असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोप करताना रमेश गायकवाड यांनी समाजाची होत असलेली वाताहत टाळण्यासाठी ईव्हीएम मशीन बंद करून मतदान घेण्यासाठी पेटून उठावे लागेल, असे सांगितले. 

यावेळी कडूबाई खरात यांच्या प्रबोधनात्मक भीमगीताला समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर संयोजकांनी खरात यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप पगारे व प्रमोद मगरे यांनी केले. यशस्वीतेसाठी संयोजकांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रात युवकांनी जागरूक व्हावेशिक्षण ही विकासाची जननी असून, सध्या सोशय मीडियावर टाकण्यात येणाऱ्या पोस्ट अगदी विचारपूर्वक आवश्यकता असेल तरच पुढे टाकाव्यात. अंधश्रद्धा पसरविणाऱ्या नाहक आणि व्यर्थ पोस्टला टाकू नये, याविषयी सतत जागरूक असले पाहिजे.

टॅग्स :Jignesh Mevaniजिग्नेश मेवानीBJPभाजपाAurangabadऔरंगाबाद