शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजपने पक्षातील ‘लव्ह जिहाद’ आधी संपवावा : इम्तियाज जलील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 13:56 IST

भाजपने कायदे करण्यापेक्षा स्वतःच्या नेत्यांवर कारवाई करून दाखवावी.

ठळक मुद्देदेशप्रेम आणि संविधानप्रेमावर बोलायला हवे

औरंगाबाद : भाजपने अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी एकानंतर एक कायदे करण्यास सुरुवात केली आहे. ‘लव्ह जिहाद’ हासुद्धा त्याचाच एक भाग आहे. भाजपमधील मंत्री मुक्तार अब्बास नकवी तसेच शाहनवाज हुसैन या ‘लव्ह जिहाद’ करणाऱ्या नेत्यांवर पक्षाने आधी कारवाई करावी, त्यानंतर देशभरात कायदा आणावा, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधावरी येथे पत्रकार परिषदेत मांडली. 

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात एमआयएम पक्षातर्फे कुणाल खरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ते म्हणाले की, भाजप देशप्रेम आणि संविधानाच्या प्रेमावर बोलत नाही. भाजपने कायदे करण्यापेक्षा स्वतःच्या नेत्यांवर कारवाई करून दाखवावी. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर खा. जलील यांनी जोरदार टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देताना ज्या लोकांनी टीका केली होती तेच आज निवडणूक रिंगणात उभे आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठाला औरंगाबादेत आणण्यास याच मंडळींनी विरोध केला होता. मात्र, विभाजनासाठी आम्ही निवडणूक लढवतो, असा आरोप आमच्यावर वारंवार करण्यात येतो. बिहारच्या निवडणुकीत आम्ही आमच्या पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचंड मेहनत घेत आहोत आणि प्रामाणिकपणे कामही करीत आहोत. यश आम्हाला मिळेल,  असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला गौतम खरात, अरुण बोर्डे, शारेक नक्शबंदी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलBJPभाजपाAurangabadऔरंगाबादAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन