शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:28 IST

भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे.

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि जालना येथील पाणीप्रश्न हाती घेतला आहे. फुकटचे हंडे वाटून भाजपचा मोर्चा एका उत्सवासारखे झाला. शिवाय मागील काही काळांपासून सत्तेत असताना त्यांनी काहीच केले नाही, सत्तेतून बाहेर पडताच मोर्चा काढायचे, हे भाजपचे उल्लू बनवण्याचे धंदे आहेत, अशी चपराक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी लगावली. 

औरंगाबाद आणि जालना येथे पाणी प्रश्न पेटला आहे. दोन्ही ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मोर्चाचे नेतृत्व केले. यावर औरंगाबाद एमआयएमचे खासदार जलील यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी शहरातून काढलेल्या जल आक्रोश मोर्चामुळे माजी मुख्यमंत्री फडणवीस पाणीप्रश्नी गंभीर असल्याचे वाटले होते. परंतु, मोर्चात फुकट हंडे वाटून माणसे बोलावली. तसेच भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे. पालिका, नगरसेवक, आमदार, खासदार राज्य आणि केंद्रात सत्तेत असताना हे प्रश्न का सुटत नाही. भाजपचे आंदोलन म्हणजे लोकांना उल्लू बनविण्याचे काम आहे, अशी चपराक खासदार जलील यांनी लगावली. 

इतके वर्ष सत्तेत, बाहेर पडताच आता मोर्चा येथील नागरिकांना माहिती आहे मागील तीस वर्ष यांना मतदान केले. याकाळात यांची सत्ता होती. आमदार, खासदार यांच्या बरोबर देशात आणि राज्यातही भाजपाची सत्ता राहिली. मात्र, या काळात कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. आता सत्तेतून गेल्यास उत्सवासारखे मोर्चे काढायचे. पैसे देऊन, फुकट हंडे देऊन लोकं आणायची. जालन्यात इतके वर्ष दानवे खासदार, मंत्री आहेत. तरीही मोर्चा काढायचा. भाजप जर सत्तेत असताना मोर्चा काढत असेल तर आम्ही काय करायचे असा सवालही खासदार जलील यांनी केला. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद