शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

सत्ता गेल्यावर पाणीप्रश्न आठवला का?, हे भाजपाचे उल्लू बनवण्याचे धंदे; जलील यांची चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:28 IST

भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे.

औरंगाबाद: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद आणि जालना येथील पाणीप्रश्न हाती घेतला आहे. फुकटचे हंडे वाटून भाजपचा मोर्चा एका उत्सवासारखे झाला. शिवाय मागील काही काळांपासून सत्तेत असताना त्यांनी काहीच केले नाही, सत्तेतून बाहेर पडताच मोर्चा काढायचे, हे भाजपचे उल्लू बनवण्याचे धंदे आहेत, अशी चपराक एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी लगावली. 

औरंगाबाद आणि जालना येथे पाणी प्रश्न पेटला आहे. दोन्ही ठिकाणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या मोर्चाचे नेतृत्व केले. यावर औरंगाबाद एमआयएमचे खासदार जलील यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी शहरातून काढलेल्या जल आक्रोश मोर्चामुळे माजी मुख्यमंत्री फडणवीस पाणीप्रश्नी गंभीर असल्याचे वाटले होते. परंतु, मोर्चात फुकट हंडे वाटून माणसे बोलावली. तसेच भाजपाचे स्वतःचे पदाधिकारी,कार्यकर्ते यात सामील होण्यास साशंक होते. कारण सत्तेत असताना प्रश्न सुटले नाहीत. आता सत्ता गेल्यास मोर्चे काढायचे. पालिका, नगरसेवक, आमदार, खासदार राज्य आणि केंद्रात सत्तेत असताना हे प्रश्न का सुटत नाही. भाजपचे आंदोलन म्हणजे लोकांना उल्लू बनविण्याचे काम आहे, अशी चपराक खासदार जलील यांनी लगावली. 

इतके वर्ष सत्तेत, बाहेर पडताच आता मोर्चा येथील नागरिकांना माहिती आहे मागील तीस वर्ष यांना मतदान केले. याकाळात यांची सत्ता होती. आमदार, खासदार यांच्या बरोबर देशात आणि राज्यातही भाजपाची सत्ता राहिली. मात्र, या काळात कोणतेच प्रश्न सुटले नाहीत. आता सत्तेतून गेल्यास उत्सवासारखे मोर्चे काढायचे. पैसे देऊन, फुकट हंडे देऊन लोकं आणायची. जालन्यात इतके वर्ष दानवे खासदार, मंत्री आहेत. तरीही मोर्चा काढायचा. भाजप जर सत्तेत असताना मोर्चा काढत असेल तर आम्ही काय करायचे असा सवालही खासदार जलील यांनी केला. 

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबाद