शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

भाजप सरकार शेतकरीविरोधी

By admin | Updated: June 12, 2017 00:24 IST

जालना : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या इतिहासात शेतकऱ्यांनी संप केलेला कधी पाहिला का? मात्र, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही वेळ आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या इतिहासात शेतकऱ्यांनी संप केलेला कधी पाहिला का? मात्र, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही वेळ आली. सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे, हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी येथील अग्रसेन भवनमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, प्रदीप सोळुंके, संग्राम कोते पाटील, शंकरअण्णा धोंडगे, ईश्वर बाळबुधे, सुहास तेंडूलकर, शिवाजीराव पाटील, अ.गफ्फार, डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, की भाजप सरकार सर्वसामान्यांसह शेतकरी, शिक्षक, युवकांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालास योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला. तेंव्हा सरकारने १९ आमदारांना निलंबित केले. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या मुद्यावर भाजप सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. उत्तर प्रदेशात योगी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात कर्जमाफी दिली. आपले डबल ग्रॅज्युएट मुख्यमंत्री अभ्यास सुरू असल्याचे सांगत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी आॅक्टोबरमध्ये मुहूर्त पाहून देणार का? सरकारच्या असंवेदनशील भूमिकेमुळे शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत. मेरा भाषण, मेरा शासन अािण जाहिरात बाजीवर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. कर्जमाफी झालेली नसताना जाहिराती कशा लावताय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी देशभरातील शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी त्यांनी केली. केवळ लेटरहेड छापण्यासाठी तुम्ही पदाधिकारी झाला नाहीत. जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्या लोकांची बेरीज करा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा, असा सल्ला पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रदेशाध्यक्ष तटके म्हणाले, की बळीराजाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतमालास हमी भाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. युवकांनी राष्ट्रवादीची भूमिका सोशल मीडियातून प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन तटकरे यांनी केले. आ.टोपे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. पक्षाचे सर्व सेल सशक्त करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असेही टोपे म्हणाले. मेळाव्यास राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.