शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

भाजप सरकार शेतकरीविरोधी

By admin | Updated: June 12, 2017 00:24 IST

जालना : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या इतिहासात शेतकऱ्यांनी संप केलेला कधी पाहिला का? मात्र, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही वेळ आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांच्या इतिहासात शेतकऱ्यांनी संप केलेला कधी पाहिला का? मात्र, भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर ही वेळ आली. सरसकट कर्जमाफी देण्याऐवजी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करणारे, हे सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रविवारी येथील अग्रसेन भवनमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, अ‍ॅड. जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, प्रदीप सोळुंके, संग्राम कोते पाटील, शंकरअण्णा धोंडगे, ईश्वर बाळबुधे, सुहास तेंडूलकर, शिवाजीराव पाटील, अ.गफ्फार, डॉ. निसार देशमुख आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, की भाजप सरकार सर्वसामान्यांसह शेतकरी, शिक्षक, युवकांना न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालास योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधकांनी अधिवेशनात आक्रमक पवित्रा घेतला. तेंव्हा सरकारने १९ आमदारांना निलंबित केले. सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढून शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफीच्या मुद्यावर भाजप सरकारने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. उत्तर प्रदेशात योगी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी महिनाभरात कर्जमाफी दिली. आपले डबल ग्रॅज्युएट मुख्यमंत्री अभ्यास सुरू असल्याचे सांगत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी आॅक्टोबरमध्ये मुहूर्त पाहून देणार का? सरकारच्या असंवेदनशील भूमिकेमुळे शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त होत आहेत. मेरा भाषण, मेरा शासन अािण जाहिरात बाजीवर सरकार करोडो रुपये खर्च करत आहे. कर्जमाफी झालेली नसताना जाहिराती कशा लावताय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी देशभरातील शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्याप्रमाणे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अशी मागणी त्यांनी केली. केवळ लेटरहेड छापण्यासाठी तुम्ही पदाधिकारी झाला नाहीत. जनमानसात चांगली प्रतिमा असणाऱ्या लोकांची बेरीज करा, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा, असा सल्ला पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. प्रदेशाध्यक्ष तटके म्हणाले, की बळीराजाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, शेतमालास हमी भाव द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. युवकांनी राष्ट्रवादीची भूमिका सोशल मीडियातून प्रभावीपणे मांडावी, असे आवाहन तटकरे यांनी केले. आ.टोपे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट केली. पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. पक्षाचे सर्व सेल सशक्त करण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असेही टोपे म्हणाले. मेळाव्यास राष्ट्रवादीच्या विविध सेलचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.