शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘भाजप हटाव-देश बचाव’ : भाकपची आजपासून जनजागरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 00:46 IST

‘भाजप हटाव... देश बचाव’ असा नारा घेऊन १ आॅगस्टपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. १४ आॅगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. या मोहिमेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, जिल्हा सचिव कॉ. अश्फाक सलामी आदींनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘भाजप हटाव... देश बचाव’ असा नारा घेऊन १ आॅगस्टपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे देशव्यापी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. १४ आॅगस्टपर्यंत ही मोहीम चालेल. या मोहिमेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रपरिषदेत भाकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. राम बाहेती, जिल्हा सचिव कॉ. अश्फाक सलामी आदींनी दिली.यावेळी जिल्हा सहसचिव कॉ. अभय टाकसाळ, कॉ. तारा बनसोडे, शहर सचिव कॉ. भास्कर लहाने आदींची उपस्थिती होती. या मोहिमेअंतर्गत १ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने करण्यात येतील. १ ते ५ आॅगस्टपर्यंत गंगापूर तालुक्यात, ६ ला वैजापूर तालुक्यात, ७ व ८ आॅगस्ट रोजी सिल्लोड तालुक्यात, ९ व १० आॅगस्ट रोजी फुलंब्री तालुक्यात, ११ आॅगस्ट रोजी कन्नड व औरंगाबाद ग्रामीणमध्ये, तर १२ ते १४ आॅगस्टपर्यंत औरंगाबाद शहरात जथाद्वारे जनजागरण करण्यात येईल. १४ आॅगस्टला मनपा कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील.कॉ. बाहेती म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या काळात काळा पैसा परत आलाच नाही. नोटाबंदीचे नाटक करण्यात आले. शेती क्षेत्राचे बेहाल करण्यात आले. विम्याचे पैसे अंबानीला देण्यात आले. बेरोजगार तरुणांची क्रूर चेष्टा करण्यात आली. दलित - अल्पसंख्याकांवर अन्याय, अत्याचार वाढले. पत्रकारांवरील हल्ले वाढले. महिलांवरसुध्दा कमालीचे अत्याचार वाढले. धर्मांध, फॅसिस्ट, कॉर्पोरेट उद्योगाला खैरात वाटणारे हे सरकार पायउतार होणे आवश्यक आहे. म्हणून ही मोहीम आम्ही हाती घेतली आहे.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबाद