शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींचा खर्च; पण दुष्काळ तसाच

By admin | Updated: December 7, 2014 00:20 IST

वैजापूर : रामकृष्ण-गोदावरी उपसा सिंचन योजना, मन्याड साठवण तलाव, नांदूर-मधमेश्वर जलदगती कालवा व टाकळीचा प्रकल्प, असे चार प्रकल्प झाले.

वैजापूर : रामकृष्ण-गोदावरी उपसा सिंचन योजना, मन्याड साठवण तलाव, नांदूर-मधमेश्वर जलदगती कालवा व टाकळीचा प्रकल्प, असे चार प्रकल्प झाले. त्यावर शासनाने कोट्यवधींचा खर्च केला; पण वैजापूर तालुक्याच्या पाचविला पुजलेला दुष्काळ काही हटला नाही. पुढाऱ्यांची वाढलेली गुत्तेदारीही याला कारणीभूत असल्याचा आरोप करीत भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे प्रकल्प ताब्यात घेऊन चालविण्यासाठी साकडे घातले असून, काही अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीचीही त्यांनी मागणी केली आहे. रामकृष्ण-गोदावरी उपसा सिंचन योजना २० वर्षांपूर्वी पूर्ण झाली. ७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणणाऱ्या या योजनेचा लाभ २३ गावांना होतो; मात्र ही योजना १५ वर्षांपासून किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहे. या योजनेचे मूळ कर्ज ३५ कोटींच्या जवळपास असून जिल्हा बँकेचे १४० कोटी व्याजासहत देणे आहे. यापैकी ७५ कोटी व्याज माफ करण्याचा ठराव बँकेने घेतला असून तो शासनाला पाठवला आहे. ही योजना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे; मात्र आता शासनाने योजनेचे कर्ज माफ करून ही योजना स्वत: चालवावी किंवा वैजापूर एमआयडीसीच्या ताब्यात दिली पाहिजे. मन्याड साठवण तलावाचा कॅचमेंट एरिया मोठा आहे. डोंगरदरीत हा तलाव आहे, त्यामुळे यात बाराही महिने पाणी असते. डोंगरदरीत तलाव असल्याने याचा उपयोग शेतकऱ्यांना होत नाही. या तलावाची उंची वाढविल्यावर जास्त पाणी उपलब्ध होईल, शिवाय खंडाळा, शिऊर, आघूर या जि.प. गटातील जवळपास १०० गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. दहा हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. वैजापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील सुटू शकतो. या पाण्यावर लहान क्षमतेचा जलविद्युत प्रकल्पही उभा राहू शकतो, असे जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. ‘नांमका’च्या तर चार पोटचाऱ्यांची कामे रखडल्याने त्याचा असून काहीच उपयोग होत नाही. ६० टक्के पाणी वाया जाते, त्यामुळे पोटचाऱ्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. वैजापूर तालुक्यातील या योजनांसह टाकळीचा कालवा आणि त्यावरील चाऱ्यांचे काम झाले पाहिजे. या कामचे टेंडर झालेले आहे. मात्र, कंत्राटदार काम करीत नाही. हा कालवा झाल्यास पोखरी, गारज, पाथ्री आदींसह परिसरातील गावांना लाभ होतो. तसेच, खारी खामगावच्या प्रकल्पाचे २० वर्षांपासून सांडव्याचे काम रखडल्याने पाणी साठवण होत नाही. प्रकल्पांवर आतापर्यंत मोठा खर्च झालेला आहे. मात्र, किरकोळ खर्चांसाठी या योजना पडून आहेत. त्याचा लाभ तालुक्याला होत नाही. -एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजपा