शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

वृक्षसंवर्धनाचा बिहार पॅटर्ऩ़़

By admin | Updated: July 23, 2014 00:24 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे़़पक्षी ही सुस्वरे आळविती़़़या रचनेतून संत तुकाराम महाराज यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व शेकडो वर्षांपूर्वी सांगितले़

श्रीनिवास भोसले, नांदेडवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे़़पक्षी ही सुस्वरे आळविती़़़या रचनेतून संत तुकाराम महाराज यांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व शेकडो वर्षांपूर्वी सांगितले़ मात्र वैयक्तिक हव्यासापोटी मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्यास आपण कारणीभूत ठरत आहोत़ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज बनली आहे़ वृक्षसंवर्धनासाठी राज्यात बिहार पॅटर्न राबविला जात आहे़ सजीव जीवनावर विपरीत परिणाम करणारे घटक शोषून घेत शुद्ध वायू निर्मितीचे कार्य वृक्ष करतात़ समृद्ध वनसंपदेतून अनेक औषधी वनस्पती तसेच इंधन मिळते़ मात्र स्वत:चा आर्थिक लाभ व वाढते नागरिकीरणाची समस्या सोडवण्यासाठी झाडांची कटाई केली जाते़ यामुळे पावसात अनियमितता, पर्यावरणाचा ऱ्हास आदी गंभीर समस्या उद्भवत आहेत़ यावर नियंत्रण मिळविण्यासाठी केंद्र व राज्य शासनासह सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी अहोरात्र प्रयत्न करत आहेत़ सामाजिक वनिकरण विभागातर्फे विशेष योजना राबविल्या जातात़ वृक्षारोपण मोहीम व्यापक स्वरुपात राबविण्यासाठी शाळा, महाविद्यालय, सामाजिक संस्था, शासकीय कार्यालयांना मोफत रोपे दिली जात आहेत़ महराष्ट्रातही वृक्षसंवर्धनाचा बिहार पॅटर्नवनराई समृद्ध होण्यासाठी बिहार राज्यात वृक्ष संगोपनाची जबाबदारी एका कुटुंबावर देवून प्रत्येक कुटुंबास दोनशे रोपांचे संगोपन करण्यासाठी महिन्याला चार हजार रुपये दिले जातात़ याच धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना राबविण्यात येत आहे़ जिल्ह्यात १ हजार कुटुंंबावर वृक्ष संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ यामध्ये ज्येष्ठ नागरिक,महिलांना प्राधान्य दिले आहे़ जिल्ह्यातील जंगलामध्ये अनेक औषधी वनस्पतीजिल्हात वनराईने समृद्ध असून सागवान, मोह, निलगिरी, शिसम, करंज, सीताफळ, आवळा, धावडा, लेंडी, साल, अंजन यासह विविध औषधी वनस्पती किनवट, माहूर, कंधार, लोहा आदी तालुक्यांत आढळून येतात़ वनविभागात समस्याच समस्यावनसंवर्धन व संरक्षणाचे काम वनविभागाला करावे लागते़ जिल्हास्तरावर उपवनसंरक्षक तर तालुकास्तरावर वनक्षेत्रपाल यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी कार्यरत असतात़ झाडांची कत्तल व तस्करी रोखण्याचे आव्हान या विभागावर आहे़ परंतु या विभागातील अनेक जागा रिक्त असल्याने आणि गस्तीसाठी वाहनांची वाणवा असल्याने त्यांना काम करणे कठीण होत आहे़ वनविभागाच्या पथकावर तस्करांकडून अनेकवेळा हल्ले होतात़ अशावेळी त्यांच्याकडे स्वरक्षणासाठी कोणतेही हत्यार उपलब्ध नसते़ जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावावे लागते़रस्त्याच्या दुतर्फा झाडे़़़रस्त्यावर वाहनाच्या माध्यमातून होणारे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली जातात़ वनविभागाकडून यासाठी दरवर्षी खर्च केला जातो़ जिल्ह्यातील बहुतांश मुख्य रस्त्यावर नव्याने लावण्यात आलेली झाडे दिसत नाहीत़ जुनी आहेत ती झाडे राजरोसपणे तोडून नेण्याचा सपाटा लावला जातो़ याकडे संबंधित प्रशासन लक्ष देत नाही़ यामुळे आजघडीला जिल्ह्यातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली झांडाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ झाडांची कत्तल थांबवा़़़पक्षी निवासाची सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे वृक्ष़ आज सर्वत्र सिमेंटचे जंगल वाढत असल्याने पक्ष्यांच्या राहण्याचे ठिकाणेच धोक्यात आली आहेत़ आपल्या सभोवताल पक्षी असणे निसर्गातील पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून झाडाची कत्तल थांबवविणे गरजेचे आहे़ जंगलाचा ऱ्हास़़़आज तीव्र गतीने जंगलतोड होत असल्यामुळे जैवविविधता हळूहळू नष्ट होत आहे़ जंगलाचा होणारा ऱ्हास संपला नाही तर त्याचे दुष्परिणाम मानवालाच भोगावे लागणार आहेत़ जिल्ह्यातील जंगलात होणारी वृक्षतोड पर्यावरणाचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरू शकते़इंधन म्हणून उपयोग़़़ इंधन तसेच मोकळी जमीन तयार करण्यासाठी झाडांची होणारी कत्तल थांबविण्यास सर्र्वांनी पुढाकार घ्यावा़जिल्ह्याचे वनक्षेत्रजिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६ हजार ५२ चौरस किलोमीटर आहे़ जिल्ह्यातील १ हजार २९९ चौरस किलोमीटर वनक्षेत्रापैकी १ लाख ८ हजार २४० हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर तालुक्यात वनविभागाचे सर्वाधिक क्षेत्र आहे़ माहूर तालुक्यात १३ हजार ४७४ हेक्टरवर वनक्षेत्र आहे़ तर किनवट तालुक्यात ६७ हजार १२६ हेक्टर वनक्षेत्र असून मांडवी, इस्लापूर, बोधडी आदी भागात सागवानी जंगल आहे़ शतकोटी योजनेअंतर्गत गतवर्षी लावण्यात आलेल्या रोपांपैकी जवळपास ९० टक्के रोपटे जगली असल्याचा अहवाल आहे़पावसाळ्यात शेतातील सुपीक माती वाहून जात असल्याने जमीन खडकाळ व नापीक बनते़