शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत नियामक आयोगाला मोठी चपराक; मंचावर न्यायिक पार्श्वभूमी असलेलाच व्यक्ती नेमण्याचे खंडपीठाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 12:11 IST

Electricity Regulatory Commission वीज कायदा २००३ मधील कलम ४२.५ नुसार वीज वितरण करणाऱ्या कंपनीस ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच’ स्थापन करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देराज्यात सन २००६ पासून महावितरणचे १६ व अन्य कंपन्यांचे ३ असे एकूण १९ मंचसप्टेंबर २०२० मध्ये वीज ग्राहक मंचसंबंधीचे जुने २००६ चे अधिनियम रद्द नवीन अधिनियमात महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता हे मंचचे अध्यक्ष असू शकतात

औरंगाबाद : वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचावर न्यायिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीशिवाय पुढील आदेशापर्यंत अन्य कोणाही व्यक्तीची नेमणूक करू नये, या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशामुळे विद्युत नियामक आयोगाला मोठी चपराक बसली आहे.

राज्यात औरंगाबादसह १३ ठिकाणी वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचावर अध्यक्ष, सदस्य सचिव व ग्राहक प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाने हालचाली सुरू केल्या होत्या. ‘सीएमआयए’चे मानद सचिव सतीश लोणीकर व हेमंत कपाडिया यांनी आयोगाच्या कृतीस आक्षेप घेणारी याचिका दाखल केली. औरंगाबाद खंडपीठाने ती जनहितार्थ याचिका म्हणून स्वीकारली.

वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०२० मध्ये वीज ग्राहक मंचसंबंधीचे जुने २००६ चे अधिनियम रद्द करून नवीन अधिनियम पारित केले. या नवीन अधिनियमात महावितरणचे निवृत्त अधीक्षक अभियंता किंवा कार्यकारी अभियंता हे मंचचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करता येतील, असे म्हटले आहे. त्यास राज्यातील अनेक ग्राहक संस्था व संघटनांनी विरोध दर्शविला होता. वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारी या महावितरणविरुद्ध असतील. या मंचवर जर महावितरणचा निवृत्त अभियंत्याची नेमणूक केली, तर ग्राहकांना योग्य न्याय कसा मिळेल. न्यायदानाची प्रक्रिया ही पारदर्शक राहणार नाही. मंचवर न्यायिक पार्श्वभूमी व्यक्ती अध्यक्ष असावा, अशी आग्रही मागणी आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली; मात्र आयोगाने त्यास दाद न देता नवीन अधिनियम पारित केले व त्यानुसार १३ ठिकाणी मंचवर तीन पदाधिकारी नेमण्यासाठी जाहिरात देण्यात आली. 

आयोगाच्या या नवीन अधिनियमातील अनेक तरतुदींविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात सीएमआयए’चे लोणीकर व कपाडिया यांनी संयुक्त याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठाने वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचवर न्यायिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीशिवाय पुढील आदेशापर्यंत मंचवर कोणाचीही नियुक्ती करू नये, असा आदेश दिला आहे. याचिकाकर्त्यांच्यावतीने ॲड. किशोर संत यांनी बाजू मांडली.

अधिनियमानुसार बंधनकारकवीज कायदा २००३ मधील कलम ४२.५ नुसार वीज वितरण करणाऱ्या कंपनीस ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ‘वीज ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच’ स्थापन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यात सन २००६ पासून महावितरणचे १६ व अन्य कंपन्यांचे ३ असे एकूण १९ मंच सुरू केले होते. या सर्व मंचांची रचना व कार्य हे महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने पारित केलेल्या २००६ च्या अधिनियमानुसार सुरू होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठmahavitaranमहावितरण