शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

सरकार आल्यास गारपीटग्रस्तांना मोठी मदत

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्‍यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे.

तुळजापूर : गारपीटग्रस्त शेतकर्‍यांचे पंचनामे झालेच नाहीत. जे झाले आहेत ते बहुतांश राजकीय शेतकर्‍यांचे झाले आहेत. गारपीटग्रस्तांचे खरे पंचनामे होणे गरजेचे आहे. मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असताना राज्याने फक्त नऊशे कोटी रुपये देऊन गारपीटग्रस्तांची थट्टा केल्याचे सांगतानाच एनडीएचे सरकार येताच केंद्राकडून राज्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मोठी आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली. गोपीनाथ मुंडे यांनी रविवारी सपत्नीक तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले़ त्यानंतर प्रदेश सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी मुंडे यांचा सत्कार केला. यावेळी त्यांच्यासमवेत जावई अमित पालवे, गौरव खाडे उपस्थित होते. राज्यात दलित अत्याचारात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसातच दलित अत्याचाराच्या ३० घटना घडल्याचे सांगत, राज्यात काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १६५० दलित अत्याचाराच्या घटना घडल्याची माहिती मुंडे यांनी दिली. अत्याचारातील आरोपी निर्दोष सुटण्याचे प्रमाण वाढले असल्याचे सांगत, यावरुन सरकार गुन्हेगारास शिक्षा देण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते, असा आरोपही मुंडे यांनी यावेळी बोलताना केला. राज्यात कायद्याचा वचक राहिला नसल्याने रॉकेल, वाळू माफिया यांचे वर्चस्व निर्माण झाले असल्याचे सांगत सर्वसामान्य जनतेबरोबर कर्मचारी, अधिकारीही या राज्यात सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. अनिल काळे, माजी जिल्हाध्यक्ष खंडेराव चौरे, उस्मानाबादचे माजी नगरसेवक धनंजय शिंगाडे, संजय निंबाळकर यांच्यासह विजय शिंगाडे, गुलचंद व्यवहारे, सुहास साळुंके, विकास मलबा, महानंदा पैलवान, दत्ता राजमाने, प्रभाकर मुळे, सचिन रसाळ, बाळा शामराज, श्रीकांत हिरोळीकर, उमेश गवते, विपीन शिंदे आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर) मराठवाड्यातील आठही जागा जिंकू-मुंडे लोकसभा निवडणुकीत एनडीए ला स्पष्ट बहुमत मिळणार असून, नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान हातील असा विश्वासही मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपाला २३० ते २४० जागा मिळतील तर महाराष्ट्रात महायुतीस ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील आठही जागा महायुती जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.