शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

बीबी का मकबराही गायब होऊ शकतो; दैवीशक्तीने नव्हे तर 'असा' करता येईल हा चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 16:57 IST

जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाही

औरंगाबाद :बीबी का मकबराही जादूगार गायब करू शकतो. एका व्यक्तीचे दोन तुकडे करणे व पुन्हा जोडणे असे प्रयोग फक्त रंगमंचावरच यशस्वी होऊ शकतात. ही दैवीशक्ती नव्हे तर विज्ञानाचा चमत्कार आहे. खुल्या मैदानात प्रत्यक्षात हजारो लोकांसमोर प्रयोग करणे जगातील कोणत्याही जादुगाराला शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती लोकप्रिय जादुगार जितेंद्र रघुवीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

प्रयोगानिमित्त औरंगाबादेत आलेल्या जितेंद्र रघुवीर यांनी सांगितले की, रघुवीर जादुगार हे माझे आजोबा. त्यांनी ८३ वर्षांपूर्वी जादूचे प्रयोग सादर करायला सुरुवात केली. या कलेला भाषेचे व वयाचे बंधन नाही. विजय रघुवीर हे माझे वडील. त्यांनी जादूच्या प्रयोगात ‘तंत्रज्ञान’ आणले. आता मी जादूचे प्रयोग करतो यात अद्ययावत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला. एखाद्या व्यक्तीचे दोन तुकडे करणे, एखाद्या मुलीला हवेत तरंगविणे, एखाद्या तरुणाची मान कापणे, हवेत हात फिरवून वस्तू काढणे किवा डोळ्यांवर पट्टी बांधून दुचाकी चालविणे. हे प्रयोग तेच आहेत. जे आजोबा व वडील करायचे. पूर्वी जादूचा प्रयोग करताना रंगमंचावर लाईट डिम करावे लागत असे. ज्या व्यक्तीचे दोन तुकडे करत ती व्यक्ती आम्ही प्रशिक्षण दिलेली व्यक्ती असे. आता प्रशिक्षित व्यक्तीची गरज नाही. आम्ही समोर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीला रंगमंचावर बोलावून जादूचे प्रयोग करतो.

जादू हे विज्ञान, दैवी शक्ती नाहीभोंदूबाबा दैवीशक्तीच्या नावाखाली अनेक जणांना फसवत असतात. पैशांचा पाऊस पाडणे, हातातून साखळी काढणे, सोने दुप्पट करून देणे असे प्रयोग करतात व लोक त्याला फसतात. मुळात हा दैवी चमत्कार नाही, तर या पाठीमागे विज्ञान दडलेले आहे. हे नागरिकांनी समजून घ्यावे. ते नारळ, फणस काढत नाहीत, कारण, ते लपवून ठेवण्याएवढी हातात जागा नसते. असे जितेंद्र रघुवीर म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBibi-ka-Maqbaraबीबी का मकबरा