शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादचे भूमिपुत्र रोहित बिर्ला कतारमध्ये ‘भारत को जानिये क्विझ’मध्ये चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:37 IST

कतार येथील भारतीय दूतावासातर्फे शनिवारी भारतीय सांस्कृतिक केंद्र, दोहा येथे १६ वे ‘प्रवासी भारतीय दिन संमेलन’ नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण आभासी पद्धतीने आयोजित केले होते.

ठळक मुद्देविजेत्यांना केंद्राकडून १५ दिवस भारत दर्शननिवासी भारतीय गटातून बाजी मारली.

- योगेश पायघन

औरंगाबाद : प्रवासी भारतीय दिनानिमित्त शनिवारी (दि. ९) आभासी पद्धतीने आयोजित प्रवासी भारतीयांच्या संमेलनात ‘भारत को जानिये क्विझ’च्या १५ विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत सोयगाव येथील रोहित बिर्ला यांनी कतार येथे अनिवासी भारतीय गटातून बाजी मारली. विजेते केंद्र शासनाकडून १५ दिवसांच्या ‘भारत दर्शन’ यात्रेचे मानकरी ठरले.

कतार येथील भारतीय दूतावासातर्फे शनिवारी भारतीय सांस्कृतिक केंद्र, दोहा येथे १६ वे ‘प्रवासी भारतीय दिन संमेलन’ नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण आभासी पद्धतीने आयोजित केले होते. या कार्यक्रमास कतारमधील प्रख्यात भारतीय प्रवासी आणि कतारमधील भारतीय राजदूतासमवेत दूतावासअंतर्गत सर्वोच्च संस्थाप्रमुखांनी हजेरी लावली. कतार देशातील भारतीय राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्या हस्ते रोहित बिर्ला यांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक प्रवासातील यशानंतर अभियंता असलेल्या रोहित यांनी कॅम्पस सिलेक्शन होऊन कंपनीतही त्याच्या कर्तृत्वाला साजेल अशी कामगिरी केल्याने अनेकदा त्यांना गौरविले गेले.

या स्पर्धेची तिसरी फेरी जिंकल्यावर त्यांनी चौथी फेरी जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सोयगाव येथील व्यापारी दिलीप बिर्ला यांचा मुलगा रोहित हे विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद प्रशाला सोयगावच्या शिक्षकांसह, विद्यार्थी, मित्रपरिवार, सोयगावकरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कोविडमुळे दीड वर्षांपासून मायदेशी येऊ न शकल्याचे सांगत लवकर परिस्थिती निवळल्यावर गावाकडे येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

विजेत्यांना केंद्राकडून १५ दिवस भारत दर्शन

परदेशी राहणाऱ्या युवा विदेशी भारतीयांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाद्वारे ‘भारत को जानिये क्विझ’ २०१५-१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या वर्षी २०२०-२१ चे हे तिसरे वर्ष होते. ३० सप्टेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान हे क्विझ चार फेऱ्यांत झाले. या स्पर्धेचा विजयी पुरस्कार म्हणून १५ दिवसांची भारत दर्शन यात्रा भारत सरकारमार्फ़त प्रायोजित असते. ती यात्रा कोविड संक्रमण नियंत्रणानंतर आयोजित केली जाणार असल्याचे रोहित यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndiaभारत