शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

औरंगाबादचे भूमिपुत्र रोहित बिर्ला कतारमध्ये ‘भारत को जानिये क्विझ’मध्ये चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:37 IST

कतार येथील भारतीय दूतावासातर्फे शनिवारी भारतीय सांस्कृतिक केंद्र, दोहा येथे १६ वे ‘प्रवासी भारतीय दिन संमेलन’ नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण आभासी पद्धतीने आयोजित केले होते.

ठळक मुद्देविजेत्यांना केंद्राकडून १५ दिवस भारत दर्शननिवासी भारतीय गटातून बाजी मारली.

- योगेश पायघन

औरंगाबाद : प्रवासी भारतीय दिनानिमित्त शनिवारी (दि. ९) आभासी पद्धतीने आयोजित प्रवासी भारतीयांच्या संमेलनात ‘भारत को जानिये क्विझ’च्या १५ विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत सोयगाव येथील रोहित बिर्ला यांनी कतार येथे अनिवासी भारतीय गटातून बाजी मारली. विजेते केंद्र शासनाकडून १५ दिवसांच्या ‘भारत दर्शन’ यात्रेचे मानकरी ठरले.

कतार येथील भारतीय दूतावासातर्फे शनिवारी भारतीय सांस्कृतिक केंद्र, दोहा येथे १६ वे ‘प्रवासी भारतीय दिन संमेलन’ नवी दिल्ली येथून थेट प्रक्षेपण आभासी पद्धतीने आयोजित केले होते. या कार्यक्रमास कतारमधील प्रख्यात भारतीय प्रवासी आणि कतारमधील भारतीय राजदूतासमवेत दूतावासअंतर्गत सर्वोच्च संस्थाप्रमुखांनी हजेरी लावली. कतार देशातील भारतीय राजदूत डॉ. दीपक मित्तल यांच्या हस्ते रोहित बिर्ला यांचा सन्मान करण्यात आला. शैक्षणिक प्रवासातील यशानंतर अभियंता असलेल्या रोहित यांनी कॅम्पस सिलेक्शन होऊन कंपनीतही त्याच्या कर्तृत्वाला साजेल अशी कामगिरी केल्याने अनेकदा त्यांना गौरविले गेले.

या स्पर्धेची तिसरी फेरी जिंकल्यावर त्यांनी चौथी फेरी जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. सोयगाव येथील व्यापारी दिलीप बिर्ला यांचा मुलगा रोहित हे विद्यार्थी असलेल्या जिल्हा परिषद प्रशाला सोयगावच्या शिक्षकांसह, विद्यार्थी, मित्रपरिवार, सोयगावकरांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. कोविडमुळे दीड वर्षांपासून मायदेशी येऊ न शकल्याचे सांगत लवकर परिस्थिती निवळल्यावर गावाकडे येणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

विजेत्यांना केंद्राकडून १५ दिवस भारत दर्शन

परदेशी राहणाऱ्या युवा विदेशी भारतीयांबरोबरचे संबंध दृढ करण्यासाठी भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाद्वारे ‘भारत को जानिये क्विझ’ २०१५-१६ मध्ये सुरू करण्यात आले होते. या वर्षी २०२०-२१ चे हे तिसरे वर्ष होते. ३० सप्टेंबर ते २८ डिसेंबरदरम्यान हे क्विझ चार फेऱ्यांत झाले. या स्पर्धेचा विजयी पुरस्कार म्हणून १५ दिवसांची भारत दर्शन यात्रा भारत सरकारमार्फ़त प्रायोजित असते. ती यात्रा कोविड संक्रमण नियंत्रणानंतर आयोजित केली जाणार असल्याचे रोहित यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIndiaभारत