शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

भीमसागर उसळला..!

By admin | Updated: April 15, 2015 00:44 IST

बीड: ‘जयभीम’चा घोष... ढोल- ताशांचा गजर... नीळ्या रंगाची उधळण, भीमगितांवर थिरकणारी तरुणाई... अशा सळसळत्या उत्साहात मंगळवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

बीड: ‘जयभीम’चा घोष... ढोल- ताशांचा गजर... नीळ्या रंगाची उधळण, भीमगितांवर थिरकणारी तरुणाई... अशा सळसळत्या उत्साहात मंगळवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. समता रॅली, मिरवणुकांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. अभिवादनासाठी प्रचंड भीमसागर उसळला होता. शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम पार पडले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास समता रॅलीला प्रारंभ झाला.पोलीस अधीक्षक नवीनचंद रेड्डी यांनी ज्योत घेऊन रॅलीत सहभाग नोंदविला. सुभाषरोड, माळीवेस चौकातून रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाली. तेथे रॅलीचा समारोप झाला.मंगळवारी सकाळपासूनच अभिवादनासाठी डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ गर्दी होण्यास सुरुवात झाली. लहान मुले, महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. गर्दीच रुपांतर अक्षरश: जनसागरात झाले. भन्ते पट्टीसेन यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन झाले तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. विविध पक्ष, संघटना, मित्रमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. विनायक मेटे, युवा रिपार्इंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, न.प. चे गटनेते डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि.प. सभापती संदीप क्षीरसागर, माजी आ. राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, काँग्रेसचे अशोक हिंगे, दिलीप भोसले, शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, अजिंक्य चांदणे, प्रा. प्रदीप रोडे, चंद्रकांत नवले, अमरसिंह ढाका, प्रा. सुशीला मोराळे, अजय सवाई, विनोद इनकर, तत्वशील कांबळे, डॉ. जितेंद्र ओव्हाळ, शाहेद पटेल आदी उपस्थित होते. गेवराई, माजलगाव, परळी, आष्टी, वडवणी, धारुर, अंबाजोगाई, शिरुर, पाटोदा, केज येथे देखील जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम झाले. मिरवणुकीत थिरकली तरुणाईमंगळवारी शहरात ठिकठिकाणी अभिवादन सभा, व्याख्यान, रॅली, मिरवणुका आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. सायंकाळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी विविध गितांवर ढोल- ताशाच्या गजरात तरुणाईची पाऊले थिरकली. ‘लई मजबूत भीमाचा किल्ला, भीमा तुझ्या जन्मामुळे, कसा शोभला असता भीम माझा नोटावऱ़़ आहे कोणाचं योगदान...? लाल दिव्याच्या गाडीला...’ या आणि अशा विविध गितांनी शहर अक्षरश: दणाणून गेले.