शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

भिसेंच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान !

By admin | Updated: September 28, 2014 00:42 IST

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. त्र्यंबकनाना भिसे यांच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान ठरले. शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस

लातूर : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात अ‍ॅड. त्र्यंबकनाना भिसे यांच्या उमेदवारीचे बाशिंगबळ बलवान ठरले. शुक्रवारी त्यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी धुसफूस सुरू केली होती. त्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हवा धीरज देशमुख यांच्या नावाची आली. मात्र ही हवा काही त्यांच्या उमेदवारीत बदलली नाही. तासाला एका नवीन चर्चेने ‘लातूर ग्रामीण’च्या उमेदवारीवरुन झालेल्या काँग्रेसच्या ढिसाळ नियोजनाच्या पोरखेळाने मात्र स्व. विलासराव देशमुखानंतर पोरकी झाल्याचे क्षणोक्षणी जाणवत होते. जशी लातूर ग्रामीणमधून त्र्यंबक भिसेंची उमेदवारी घोषित झाली. तशी कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी रेटली. पार मुंबई, दिल्लीपर्यंत सूत्रे हलली. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमेदवार बदलण्याच्या हालचालीनी वेग घेतला. शनिवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता.धीरज देशमुखांचे नाव येताच हौसी कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत रॅली गाठली. पण अपेक्षाभंग झाला आणि धीरज यांनीच स्वत: पुढे येत त्र्यंबक भिसे हेच उमेदवार असतील, असे घोषित केले. जिल्हा काँग्रेस कमिटीनेही पत्रक काढून भिसे हेच उमेदवार असल्याचे ठसविण्याचा प्रयत्न सुरू केला. धीरज देशमुख यांच्या नावाची फक्त चर्चाच रंगली़ त्यांनी स्वत: भिसे नानांचे नाव जाहीर केल्याने चर्चेला पुर्णविराम मिळाला़ परंतु, त्यांच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यातला उत्साह जाणवला नाही़पडद्याआड नेमके काय झाले ? हे मात्र अद्याप उघड झाले नाही. परंतु, आता त्र्यंबक भिसे हेच लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढणार आहेत़ कार्यकर्त्यांची मोट आता ते कशी बांधतात याकडे डोळे आहेत़ (प्रतिनिधी)४काँग्रेसमध्ये लातूर ग्रामीणच्या उमेदवारीवरुन दिवसभर लातुरात ढिसाळ नियोजनाचा चांगलाच पोरखेळ रंगला. स्व. विलासराव देशमुख यांच्यानंतर जिल्ह्याची काँग्रेस पोरकी झाली. याची प्रचिती आता येते आहे. दिलीपराव देशमुख यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने आ. वैजनाथ शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते. परंतु त्यांचे सत्यकथनही पचनी पडले नाही. कारण अ‍ॅड. त्र्यंबकनाना भिसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. या उमेदवारीवरुन ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेवटच्या दिवशी पुन्हा धीरज देशमुख यांच्या नावाची चर्चा झाली. मात्र त्यांनीच भिसे हेच उमेदवार असल्याचे जाहीर केले. विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर यासारख्या शिस्तबध्द नेत्यांनी राबविलेले नियोजन आता या निवडणुकीत काँग्रेसने हरवून पोरखेळ केल्याची चर्चा कार्यकर्त्यात रंगली होती.