शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

भारनियमनास महावितरणच जबाबदार..!

By admin | Updated: November 25, 2015 00:19 IST

जालना : जिल्ह्यात वाढलेल्या भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचा सूर लोकमतने मंगळवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून उमटला.

जालना : जिल्ह्यात वाढलेल्या भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचा सूर लोकमतने मंगळवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून उमटला. अखंड वीज मिळण्यासाठी नागरिकांनीही वीज बिल भरण्यासाठी पुढे येण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केली. वीजचोरी रोखण्यासाठी जनजागृती केल्यास हे प्रमाण निश्चित कमी होईल असेही काही वाचकांचे म्हणणे आले. वाढते भारनियमन, वीजचोरी संदर्भात लोकमतने मंगळवारी प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले. भारनियमनास सर्वच जनता जबाबदार आहे का? या प्रश्नावर ७० वाचकांनी नाही असे उत्तर दिले. १० टक्के वाचक होय म्हणतात तर २० टक्के वाचकांनी माहिती नाही असे उत्तर दिले. यामुळे भारनियमनाला सर्वच जनतेला दोषी ठरविणे योग्य नसल्याचे चित्र दिसून आले. वीजचोरीमुळे भारनियमन वाढले का ५० वाचकांनी होय उत्तर दिले. तर ४० वाचक नाही म्हणतात तर १० वाचकांना याबद्दल माहिती नाही. वीजचोरी बंद झाल्यास भारनियमन थांबेल असा ५५ टक्के लोकांना वाटते तर तब्बल २५ टक्के वाचनकांना वीजचोरी कमी झाली तरी भारनियमन थांबणार नाही असे वाटते. २० टक्के वाचकांना माहिती नाही असे उत्तर दिले. भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचे ४५ टक्के लोकांना वाटते ३० टक्के लोकांना नाही असे वाटते तर २५ टक्के नागरिकांना माहिती नाही. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण कमी पडते का? यावर ७५ टक्के वाचकांनी महावितरणला दोषी धरले तर २५ नागरिकांनी नाही असे उत्तर दिले. वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड वीजमीटर बसवावेत का या विषयावर ६५ टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले. २५ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले तर १० टक्के वाचनकांना माहित नाही. महावितरणने जनजागृती केल्यास अथवा वीज बिलांतील दुरूस्ती केल्यास वीज ग्राहक थकित बिल भरण्यास पुढे येतील असेही अनेकांनी सांगितले. अनेकदा महावितरणकडून चुकीचे बिल येत असल्याने नागरिक बिल भरण्यास अनुत्सुक असतात. एकूणच या सर्व्हेक्षणातून जनतेने काहीअंशी महावितरणला दोषी ठरविण्यासोबतच नागरिकांनी सजग भूमिका बजावावी, असे अधोरेखित केले. (टीम लोकमत)