शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनास महावितरणच जबाबदार..!

By admin | Updated: November 25, 2015 00:19 IST

जालना : जिल्ह्यात वाढलेल्या भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचा सूर लोकमतने मंगळवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून उमटला.

जालना : जिल्ह्यात वाढलेल्या भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचा सूर लोकमतने मंगळवारी केलेल्या सर्व्हेक्षणातून उमटला. अखंड वीज मिळण्यासाठी नागरिकांनीही वीज बिल भरण्यासाठी पुढे येण्याची गरजही अनेकांनी व्यक्त केली. वीजचोरी रोखण्यासाठी जनजागृती केल्यास हे प्रमाण निश्चित कमी होईल असेही काही वाचकांचे म्हणणे आले. वाढते भारनियमन, वीजचोरी संदर्भात लोकमतने मंगळवारी प्रश्नावलीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण केले. भारनियमनास सर्वच जनता जबाबदार आहे का? या प्रश्नावर ७० वाचकांनी नाही असे उत्तर दिले. १० टक्के वाचक होय म्हणतात तर २० टक्के वाचकांनी माहिती नाही असे उत्तर दिले. यामुळे भारनियमनाला सर्वच जनतेला दोषी ठरविणे योग्य नसल्याचे चित्र दिसून आले. वीजचोरीमुळे भारनियमन वाढले का ५० वाचकांनी होय उत्तर दिले. तर ४० वाचक नाही म्हणतात तर १० वाचकांना याबद्दल माहिती नाही. वीजचोरी बंद झाल्यास भारनियमन थांबेल असा ५५ टक्के लोकांना वाटते तर तब्बल २५ टक्के वाचनकांना वीजचोरी कमी झाली तरी भारनियमन थांबणार नाही असे वाटते. २० टक्के वाचकांना माहिती नाही असे उत्तर दिले. भारनियमनास महावितरणच जबाबदार असल्याचे ४५ टक्के लोकांना वाटते ३० टक्के लोकांना नाही असे वाटते तर २५ टक्के नागरिकांना माहिती नाही. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण कमी पडते का? यावर ७५ टक्के वाचकांनी महावितरणला दोषी धरले तर २५ नागरिकांनी नाही असे उत्तर दिले. वीजचोरी रोखण्यासाठी प्रीपेड वीजमीटर बसवावेत का या विषयावर ६५ टक्के नागरिकांनी होय उत्तर दिले. २५ टक्के नागरिकांनी नाही असे उत्तर दिले तर १० टक्के वाचनकांना माहित नाही. महावितरणने जनजागृती केल्यास अथवा वीज बिलांतील दुरूस्ती केल्यास वीज ग्राहक थकित बिल भरण्यास पुढे येतील असेही अनेकांनी सांगितले. अनेकदा महावितरणकडून चुकीचे बिल येत असल्याने नागरिक बिल भरण्यास अनुत्सुक असतात. एकूणच या सर्व्हेक्षणातून जनतेने काहीअंशी महावितरणला दोषी ठरविण्यासोबतच नागरिकांनी सजग भूमिका बजावावी, असे अधोरेखित केले. (टीम लोकमत)