शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्व काही देऊनही विश्वासघात, गद्दारी

By admin | Updated: June 18, 2017 00:43 IST

बीड : त्यांना आमदार केलं, मंत्रीपद दिलं, खासदारकीची उमेदवारी दिली, मात्र काहींनी विश्वासघात केला, अशा शब्दात अजित पवार यांनी सुरेश धस यांना टोला लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : त्यांना आमदार केलं, मंत्रीपद दिलं, खासदारकीची उमेदवारी दिली, मात्र काहींनी विश्वासघात केला, गद्दारी केली, नीचपणा केला अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांना टोला लगावला. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित, संग्राम कोलते, माजी आ. उषा ठोंबरे, सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते. स्व. काकूंचा संदर्भ देत पवार यांनी चांगला मेसेज जावा हीच भावना असल्याचे सप्ष्ट केले. काळ बदलतोय, जनरेशन गॅप वाढला आहे, संदीप व बाकीचे बरोबर राहावे ही भूमिका होती. जि. प., न. प. निवडणुकीत मार्ग काढण्याचा प्रयत्न झाल्याचे पवार म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकारणात सर्व गोष्टी कशा घडल्या याचं चिंतन करणे गरजेचे आहे असे पवार म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. धनंजय मुंडे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. तरूण, उमदे नेतृत्व वाढवा असे बोलत पवार यांनी संदीप क्षीरसागर यांचा नामोल्लेख करत सूचक संकेत दिले. सरकार आपलं नसलं तरी प्रयत्न ठेवा, यश मिळतं हे परळीवरुन लक्षात घ्या. जि. प. मध्ये जागा जास्त, मार्केट कमिटी आपल्याच ताब्यात. असेच काम इतर मतदार संघात व्हावे. उद्याचा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करा, राष्ट्रवादीचे सरकार आणण्यासाठी काम करा, असा सल्ला देतानाच जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचा नामोल्लेख करत एकजुटीने एकोप्याने काम करा, जिवाचे रान करा असे आवाहन पवार यांनी या वेळी केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सत्तेमध्ये चढउतार होत असतात, परंतु, सत्ता गेल्यानंतर काही सत्तापिपासू दूर जातात, असा टोला बंडखोरांना लगावत जोपर्यंत पवार साहेबांच्या विचाराशी जोपर्यंत आमची नाळ जुळली आहे, तोपर्यंत काही फरक पडणार नाही असे ते म्हणाले. जुलैमध्ये राजकीय भूकंप, यावर तटकरे म्हणाले, शिवसेनेला भाकिते करायची सवय आहे. भूकंप झाला आणि निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी शंभर टक्के यश मिळवील असा दावा तटकरे यांनी केला. निष्ठावंत, संकटकाळात सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याला पद, सन्मान देण्याची पक्षाची भूमिका आहे. शाहू- फुलेंचा महाराष्ट्र सांभाळायचा असेल तर अजितदादांनी नेतृत्व केलं पाहिजे असे मत व्यक्त करताना राजकीय परिवर्तनाची सुरुवात बीड जिल्ह्यापासून करा असे आवाहन तटकरे यांनी केले. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, या मेळाव्यामुळे उत्साह संचारला असून २००९ व २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांचा उल्लेख करत आगामी निवडणुकीत सहापैकी सहा जागा राष्ट्रवादीला मिळतील, असा शब्द मुंडे यांनी या वेळी श्रेष्ठींना दिला. जि.प. निवडणुकीत भाजपला १९ पेक्षा जास्त जागा आणता आल्या नाही, राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी विश्वास दिला परंतु, दुर्दैवाने यश टिकविता आले नाही. परंतु, आता पुर्वीप्रमाणे तक्रारी येणार नाहीत, वाट आणि वहिवाट एकच राहील, अशी ग्वाही देत पवारांनी बीड जिल्ह्यावर प्रेम केले, अनेक संधी दिल्या. स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी मजबूत करायची आहे. मग लाटेचा फरक पडणार नाही असेही मुंडे म्हणाले. रेखा फड जिल्हाध्यक्ष,हेमा पिंपळे प्रदेश सरचिटणीसराष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराच्या घटनांवर भाष्य करत सुरक्षेची गंभीर समस्या असल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री म्हणून ‘चिक्कीताई’ काम करतात असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रेखा फड यांची तर प्रदेश सरचिटणीसपदी माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हेमा पिंपळे यांची निवड जाहीर केली.