शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

सर्व काही देऊनही विश्वासघात, गद्दारी

By admin | Updated: June 18, 2017 00:43 IST

बीड : त्यांना आमदार केलं, मंत्रीपद दिलं, खासदारकीची उमेदवारी दिली, मात्र काहींनी विश्वासघात केला, अशा शब्दात अजित पवार यांनी सुरेश धस यांना टोला लगावला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : त्यांना आमदार केलं, मंत्रीपद दिलं, खासदारकीची उमेदवारी दिली, मात्र काहींनी विश्वासघात केला, गद्दारी केली, नीचपणा केला अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माजी मंत्री सुरेश धस यांना टोला लगावला. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री प्रकाश सोळंके, आ. अमरसिंह पंडित, संग्राम कोलते, माजी आ. उषा ठोंबरे, सय्यद सलीम, राजेंद्र जगताप, जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी उपस्थित होते. स्व. काकूंचा संदर्भ देत पवार यांनी चांगला मेसेज जावा हीच भावना असल्याचे सप्ष्ट केले. काळ बदलतोय, जनरेशन गॅप वाढला आहे, संदीप व बाकीचे बरोबर राहावे ही भूमिका होती. जि. प., न. प. निवडणुकीत मार्ग काढण्याचा प्रयत्न झाल्याचे पवार म्हणाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजकारणात सर्व गोष्टी कशा घडल्या याचं चिंतन करणे गरजेचे आहे असे पवार म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. धनंजय मुंडे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. तरूण, उमदे नेतृत्व वाढवा असे बोलत पवार यांनी संदीप क्षीरसागर यांचा नामोल्लेख करत सूचक संकेत दिले. सरकार आपलं नसलं तरी प्रयत्न ठेवा, यश मिळतं हे परळीवरुन लक्षात घ्या. जि. प. मध्ये जागा जास्त, मार्केट कमिटी आपल्याच ताब्यात. असेच काम इतर मतदार संघात व्हावे. उद्याचा महाराष्ट्र राष्ट्रवादीमय करा, राष्ट्रवादीचे सरकार आणण्यासाठी काम करा, असा सल्ला देतानाच जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांचा नामोल्लेख करत एकजुटीने एकोप्याने काम करा, जिवाचे रान करा असे आवाहन पवार यांनी या वेळी केले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सत्तेमध्ये चढउतार होत असतात, परंतु, सत्ता गेल्यानंतर काही सत्तापिपासू दूर जातात, असा टोला बंडखोरांना लगावत जोपर्यंत पवार साहेबांच्या विचाराशी जोपर्यंत आमची नाळ जुळली आहे, तोपर्यंत काही फरक पडणार नाही असे ते म्हणाले. जुलैमध्ये राजकीय भूकंप, यावर तटकरे म्हणाले, शिवसेनेला भाकिते करायची सवय आहे. भूकंप झाला आणि निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी शंभर टक्के यश मिळवील असा दावा तटकरे यांनी केला. निष्ठावंत, संकटकाळात सोबत राहणाऱ्या कार्यकर्त्याला पद, सन्मान देण्याची पक्षाची भूमिका आहे. शाहू- फुलेंचा महाराष्ट्र सांभाळायचा असेल तर अजितदादांनी नेतृत्व केलं पाहिजे असे मत व्यक्त करताना राजकीय परिवर्तनाची सुरुवात बीड जिल्ह्यापासून करा असे आवाहन तटकरे यांनी केले. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, या मेळाव्यामुळे उत्साह संचारला असून २००९ व २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांचा उल्लेख करत आगामी निवडणुकीत सहापैकी सहा जागा राष्ट्रवादीला मिळतील, असा शब्द मुंडे यांनी या वेळी श्रेष्ठींना दिला. जि.प. निवडणुकीत भाजपला १९ पेक्षा जास्त जागा आणता आल्या नाही, राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी विश्वास दिला परंतु, दुर्दैवाने यश टिकविता आले नाही. परंतु, आता पुर्वीप्रमाणे तक्रारी येणार नाहीत, वाट आणि वहिवाट एकच राहील, अशी ग्वाही देत पवारांनी बीड जिल्ह्यावर प्रेम केले, अनेक संधी दिल्या. स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी मजबूत करायची आहे. मग लाटेचा फरक पडणार नाही असेही मुंडे म्हणाले. रेखा फड जिल्हाध्यक्ष,हेमा पिंपळे प्रदेश सरचिटणीसराष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला अत्याचाराच्या घटनांवर भाष्य करत सुरक्षेची गंभीर समस्या असल्याचे सांगितले. महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री म्हणून ‘चिक्कीताई’ काम करतात असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी रेखा फड यांची तर प्रदेश सरचिटणीसपदी माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. हेमा पिंपळे यांची निवड जाहीर केली.