शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बायपासचे त्रांगडे सुटता सुटेना; महापालिका, बांधकाम विभाग, एनएचएआयपैकी पुढाकार कोण घेणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 17:26 IST

बीड बायपासच्या रुंदीकरणाचे, सर्व्हिस रोड विकसित करण्याचे त्रांगडे कोण सोडविणार, याबाबत कुठलीही यंत्रणा पुढाकार घेण्यास तयार नाही.

- विकास राऊत 

औरंगाबाद : शहरातील मृत्यूचा महामार्ग म्हणून चर्चेत असलेल्या बीड बायपासच्या रुंदीकरणाचे, सर्व्हिस रोड विकसित करण्याचे त्रांगडे कोण सोडविणार, याबाबत कुठलीही यंत्रणा पुढाकार घेण्यास तयार नाही.

महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियापैकी कुठलीही संस्था तातडीने पुढाकार घेऊन काम सुरू करण्याबाबत पुढे येत नसल्यामुळे फक्त पोलिसांच्या वाहतूक नियंत्रणावरच तो रस्ता सध्या सुरू आहे.  २३ वर्षांपूर्वी २० फुटांचा बीड बायपास विकसित करण्यात आला. सिडकोने १३ व्या योजनेसह सातारा-देवळाई विकसित करण्यासाठी लक्ष केंद्रित केले होते; परंतु सिडकोने सातारा-देवळाईकडे मोर्चा वळविला नाही, दरम्यान २००१ च्या विकास आराखड्यात यलो बेल्टमध्ये आलेल्या जागांवर झपाट्याने प्लॉटिंग होत गेली. २०१५ पर्यंत सातारा-देवळाई नवीन उपनगर म्हणून विकसित झाले; परंतु त्या तुलनेत बीड बायपासकडे इन्फ्र ास्ट्रक्चर यंत्रणांनी काहीही लक्ष दिले नाही. परिणामी तो रस्ता सध्या अपघाताचा महामार्ग म्हणून दररोज सामान्य नागरिकांचे बळी घेत आहे. 

बांधकाम विभागाने चुकविले मार्किंगबांधकाम विभागाने बीड बायपासचे मार्किंग करून चौपदरीकरण करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्या रस्त्याचे मध्यवर्ती मार्किंग चुकविले. त्यानुसार रस्त्याचे काम न झाल्यामुळे अनेक मालमत्ता रस्त्यात बाधित होत असल्याने काही जणांनी विरोध केला. भूसंपादन एकीकडे आणि रस्त्याचे काम दुसरीकडे, असा प्रकार त्यावेळी झाला. भूसंपादनाची अवांतर रक्कमदेखील काही मालमत्ताधारकांना बांधकाम विभागाने दिल्याचे कळते. काही ठिकाणी रस्ता रुंद आहे, तर काही ठिकाणी रस्ता अरुंद  आहे. परिणामी आता मनपाला सर्व्हिस रोड बांधणीत अनेक अडचणी येत आहेत. 

३० मीटरसह सर्व्हिस रोडच्या काढल्या होत्या निविदाबीड बायपासच्या रुंदीकरणासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने ३० मीटरसह सर्व्हिस रोड बांधणीच्या निविदा काढल्या होत्या; परंतु त्या निविदांना ब्रेक लागला. बांधकाम विभाग, जागतिक बँक प्रकल्प, रस्ते विकास महामंडळ, एनएचएआय आणि महापालिका, असा त्या रस्त्याचा प्रवास सुरू आहे; परंतु अपघाती महामार्ग म्हणून पुढे आलेल्या त्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तातडीने कुणीही जबाबदारीने काम करण्यास तयार नाही. गायत्री इंजिनिअरिंगने साडेपाच वरून साडेसात मीटर रस्ता १९९५ मध्ये केला. त्यानंतर २००९ मध्ये रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले. 

वस्तुस्थिती जाणून न घेताच घोषणाकेंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी २५ डिसेंबर २०१५ रोजी जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरणासाठी ७८९ कोटी रुपयांची घोषणा केली; परंतु त्याचवेळी एनएचएआयने या दोन्ही रस्त्यांची वस्तुस्थिती विभागासमोर मांडली नाही.  बीड बायपास बांधकाम विभागाने बीओटीवर विकसित केला असून, त्याचा करार २०२९ पर्यंत आहे. ही बाब जून २०१८ मध्ये समोर आली. तीन वर्षे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर यंत्रणा गाफील राहिल्या. दरम्यानच्या काळात मनपाने सर्व्हिस रोडसाठी काहीही केले नाही. बांधकाम विभागाने वस्तुस्थिती समोर आणली नाही, तर एनएचएआयने प्रत्येक वेळी दिल्ली मुख्यालयाकडे बोट दाखविले. या सगळ्या बेपर्वाईत सामान्यांचे बळी बीड बायपास घेतो आहे. 

२४ तास मद्यपींचा राबता बीड बायपासवर २४ तास मद्यपींचा राबता असतो. अधिकृत, अनधिकृत हॉटेल्सचा भरणा या रस्त्यावर आहे. देवळाई चौकातून मधुबन हॉटेलकडे जाताना राँगसाईडने येणारे वाहनचालक नशेतच असतात. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले तरीही त्या रस्त्यावर सातारा-देवळाईव्यतिरिक्त शहर आणि शहराबाहेरून येणारी वाहतूक मोठी आहे, त्यामुळे दुचाकीस्वारांना भयमुक्त वाहन चालविणे अवघड झालेले आहे. काय असू शकतात उपाय 

महापालिकेने तातडीने स्वत:च्या हद्दीपुरता सर्व्हिस रोड विकसित करणे. बांधकाम विभागाकडून एनएचएआयने तो रस्ता हस्तांतरित करून घेणे. बीओटी करारात शासनाने तातडीने लक्ष घालून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तरतूद केलेला १२५ कोटींचा निधी बायपासच्या कामासाठी वापरण्याचा मार्ग मोकळा करणे. रस्त्यावर प्रत्येक १ ते दीड कि़मी.वर डांबरी गतिरोधक टाकणे. रस्त्यांवरून वाहणाऱ्या वाहनांची गती त्यामुळे कमी होईल. सिग्नलवरून डावीकडे जाण्यासाठीचा मार्ग अतिक्रमणमुक्त करून तेथे तातडीने डांबरी रस्ता विकसित करणे, त्यामुळे सिग्नलवरील वाहतूक खोळंबण्याचे प्रकार होणार नाहीत. मनपाने १५० कोटींतून किमान एखादा उड्डाणपूल त्या परिसरात स्वत: बांधावा किंवा अंतर्गत वसाहतींतून बाहेर येणाऱ्या रस्त्यांसाठी बीड बायपासलगत स्वतंत्र सर्व्हिस रोड महिनाभरात विकसित करावा. 

६ कि़मी.मध्ये १२ ठिकाणांहून येते वाहतूकबीड बायपास महानुभाव आश्रमाकडून सुरू होतो. उजवीकडून नाईकनगरमध्ये जाताना सहा कि़मी.च्या अंतरात सुमारे १२ नागरी वसाहतींतील वाहने व नागरिकांना बीड बायपासवरून दैनंदिनीसाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे ‘राँगसाईड’ने जाण्याशिवाय नागरिकांना पर्याय उरलेला नाही. महानुभाव आश्रम, कमलनयन बजाज हॉस्पिटल, एमआयअी कॉलेज, आमदार रोडकडे, रेणुकामाता मंदिर कमान, आयप्पा मंदिरकडे, देवळाई चौक, दत्त मंदिरालगतचा रस्ता, अरुणोदय कॉलनी, सूर्या लॉनलगतचा रस्ता, नाईकनगरकडे जाणारा रस्ता. ही सगळी १२ ठिकाणे उजव्या बाजूने आहेत आणि या १२ मार्गांवरून सातारा-देवळाई परिसरातील ५० हजार लोकसंख्या बीड बायपास ते शहर असा रोजचा भयावह प्रवास करीत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका