शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

बलुतेदारांना नव्या आर्थिक वर्षातच ‘पीएम विश्वकर्मा’चा लाभ? योजनेची लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता

By विजय सरवदे | Updated: December 22, 2023 14:29 IST

तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी बलुतेदारांमधील १८ घटकांसाठी ही योजना जाहीर केली.

छत्रपती संभाजीनगर : बारा बलुतेदारांमधील पारंपरिक कारागिरांचे कौशल्य टिकावे व त्यांची आर्थिक प्रगती व्हावी म्हणून पहिल्यांदाच अमलात आलेल्या विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी या योजनेसाठी प्रथम सरपंचांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच लाभार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्यक्ष लाभ नवीन आर्थिक वर्षातच होईल, अशी शक्यता आहे.

तीन महिन्यांपूर्वी पंतप्रधानांनी बलुतेदारांमधील १८ घटकांसाठी ही योजना जाहीर केली. जिल्ह्यात सध्या या योजनेसाठी ‘पीएम विश्वकर्मा’ या पोर्टलवर सरपंचांची नोंदणी करून घेतली जात आहे. ८७० पैकी आतापर्यंत १६० सरपंचांची नोंदणी झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत सरपंचांच्या नोंदणी पूर्ण करण्याचा जिल्हा परिषद पंचायत विभागाचा मानस आहे. त्यानंतरच लाभार्थ्यांना या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील कारागिरांचे लक्ष या योजनेसाठी अर्ज करण्याकडे लागले आहे.

कौशल्य विकास विभागाकडून सरपंचांच्या नोंदणीस मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना या विभागाकडून लॉगिन आयडी व पासवर्ड मिळेल. त्यानंतर लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो अर्ज सरपंचांच्या लॉगिनला जाईल. सरपंचांनी लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर ते पुढे कौशल्य विकास विभागाकडे फॉरवर्ड करतील. या विभागाने अर्जाची पडताळणी करून मंजुरी दिल्यानंतर निवडलेल्या लाभार्थ्यांना ५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात सहभागी लाभार्थ्यांना प्रतिदिन ५०० रुपयांचे विद्यावेतन, पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र, तसेच व्यवसायासाठी साधने घेण्यासाठी (टूल किट) १५ हजार रुपयांचे कार्ड दिले जाणार आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभया योजनेंतर्गत सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, गटई कामगार, सुर्वणकार, शिंपी, गवंडी, धोबी, चावी बनविणारे, विणकर, दोरी वळणारे, मासेमारीचे जाळे बनविणारे, शिल्पकार (मूर्ती बनविणारे) या बारा बलुतेदारांतील १८ घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अल्पदारात कर्जाची तरतूदप्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना अवघ्या ५ टक्के व्याजदरात कोणत्याही हमीशिवाय, विना तारण बँकांकडून कर्जदेखील मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांचे कर्ज १८ महिन्यांत फेडणाऱ्यास दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचे कर्ज मिळणार आहे. २ लाखांच्या कर्ज परतफेडीसाठी ३० महिन्यांचा कालावधी असेल.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद