शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

मोबाईल अ‍ॅप्सचा होतोय फायदा...!

By admin | Updated: August 18, 2016 00:51 IST

जालना : संगणक क्रांतीनंतर मोबाईल क्रांतीमुळे मोठे बदल होताना दिसत आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे हाताच्या बोटावर होत असल्याने अनेकांना नवल वाटते.

जालना : संगणक क्रांतीनंतर मोबाईल क्रांतीमुळे मोठे बदल होताना दिसत आहेत. स्मार्टफोनमुळे अनेक कामे हाताच्या बोटावर होत असल्याने अनेकांना नवल वाटते. त्यातच बँका, विमा कंपन्या, महावितरण,मोबाईल कंपन्या, स्पर्धा परीक्षांची माहिती या अ‍ॅप्समुळे फायदा होण्यासोबतच कामे सुकर हात असल्याचे लोकमत सर्व्हेक्षणातून समोर आले. बहुतांश स्मार्टफोनधारक मोबाईल बिल, वीज बिल, विमा पॉलिसी अथवा बँकांचे व्यवहार अ‍ॅप्सद्वारे करीत असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले. व्यवहार तात्काळ होण्यासोबतच वेळेची बचत होते. आपले खात्याची काय स्थिती आहे याची माहिती तात्काळ समोर येते. विशेष म्हणजे आपण पाहिजे त्या ठिकाणाहून ही कामे करता येत असल्याने अनेकांनी मोबाईल अ‍ॅप्सला महत्व दिले. मोबाईल अ‍ॅप्स त्याचा उपयोग व दुरूपयोग यावर स्मार्टफोनधारकांच्या प्रश्नावलीच्या माध्यमातून प्रतिक्रया जाणून घेण्यात आल्या. यात चार प्रश्न विचारण्यात आले. मोबाईल अ‍ॅप्समुळे कामे सुकर झाली का? यावर ४० टक्के नागरिकांना होय असे वाटते. ३० टक्के नागरिकांना नाही असे वाटते तर ३० टक्के नागरिकांना याबबत काहीच माहिती नाही. पण काहीवेळा आम्ही अ‍ॅप्स पाहत असल्याचे अनेकांनी सांगितले. मोबाईल अ‍ॅप्समुळे कामे व्यवस्थित होतात का? यावर ३५ टक्के नागरिक होय म्हणतात. २५ टक्के नाही म्हणतात तर ४० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ आहेत. काहींकडे स्मार्टफोन नसल्याचे अनेकांनी सांगितले.स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी अ‍ॅप्स उपयोगी ठरत आहे का? यावर तरूणांनी प्रतिसाद देत ५० टक्के कौल दिला. ३० टक्के तरूणांना फायदा होत नसल्याचे वाटते. तर २० टक्के लोकांना याबाबत काहीच माहिती नाही. (प्रतिनिधी)