शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

लाभार्थी गोधंळातच !

By admin | Updated: May 10, 2014 23:49 IST

गंगाराम आढाव , जालना मागील तीन महिन्यांपासून सुमारे तीन लाख नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित रहावे लागल्याने जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी गोंधळात सापडले आहेत.

गंगाराम आढाव , जालना मागील तीन महिन्यांपासून सुमारे तीन लाख नागरिकांना अन्नधान्यापासून वंचित रहावे लागल्याने जिल्ह्यात अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी गोंधळात सापडले आहेत. शासनाच्या निकषाचा मोठा फटका या लाभार्थ्यांना बसत असून रेशनकार्ड असूनही धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीही अनेक भागांतून करण्यात येत आहेत. जालना जिल्ह्यात १ फेब्रुवारीपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. एकही नागरिक उपाशी राहणार नाही. या हेतूने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सरकारने अंमलात आणली. मात्र योजनेच्या लाभार्थी निवडीचा जिल्ह्यात मोठा घोळ झालेला आहे. योजनेचे लाभार्थी निवडताना वार्षिक उत्पन्नाचा नियम घालून दिलेला आहे. त्यात शहरी भागातील नागरिकांसाठी १५ हजार १ रूपया ते ५९ हजार वार्षिक उत्पन्नाची तर ग्रामीण भागात १५ हजार १ रूपया ते ४४ हजार रूपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरीकांचा समावेश करण्याचा निकष लावण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मात्र या निकषांकडे योजना राबविणार्‍या यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. योजनेत सहभाग घेण्यासाठी रेशन दुकानदारच कार्ड धारकांची निवड करत आहेत. प्रत्यक्षात येथे उत्पन्न तपासून किंवा तसे प्रमाणपत्र एकाही पात्र लाभार्थ्यांकडून घेण्यात आलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी रेशनकार्डाची झेराक्स प्रत रेशन दुकानदाराकडे जमा करण्यात आली. त्यावरून रेशन दुकानदाराने यादी तयार केली. तीच यादी याजनेसाठी ग्राह्य धरण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. यादीतील घोळामुळे अनेक गोरगरीब नागरिक या योजनेपासून वंचित राहिलेले आहे. तसेच अनेक नागरिकांना अद्यापपर्यंत नवीन रेशनकार्ड वाटप झालेले नसल्याने तेही धान्यापासून वंचित आहे. शासनाने शहरी भागासाठी ४३. ३२ टक्के नागरिकांचा समावेश योजनेत केला. त्यामुळे शहरी भागातील सुमारे ५७ टक्के नागरीक तर ग्रामीण भागात ७६.३२ टक्के नागरिकांचा समावेश केल्याने ग्रामीण भागातील २४ टक्के नागरीक वंचित राहिले आहेत. १३ लाख ७७ हजार पात्र लाभार्थी अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यात १३ लाख ७७ हजार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. यात एकूण लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार शहरी भागातील ४३.३५ व ग्रामीण भागातील ७६.३२ टक्के नागरिकांचा समावेश आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील काही नागरीक योजने पासून वंचित राहणार आहे. मात्र त्यांना एपीएल योजनेचे धान्य वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी केला. ज्यांचा योजनेत समावेश झाला नाही, अशा नागरिकांना पूर्वीच्या दरानुसार धान्य वाटप करण्यात येत आहे. काही ठिकाणी धान्य वाटप झाले नसल्याच्या तक्रारी आल्या, अशा तक्रारींची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यात १२८५ रेशन दुकान आहेत. त्यांच्यामार्फत योजनेतील १३ लाख ७७ हजार लाभार्थ्यांना ५ हजार ८०० मे. अन्नधान्य महिन्याला वितरीत करण्यात येत आहे. त्यात गहु ३४८० मे.टन व तांदुळ २३६९ मे. टन आहे. मागील तीन महिन्यांत धान्य वाटप न झाल्याच्या व त्याचा काळा बाजार केल्याच्या काही तक्रारी येत आहे. त्यानुसार ३५९ रेशन दुकानांची तपासणी केली. त्यातील दोष आढळलेल्या २५ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. तर ३ दुकानाचा परवाना निलंबित करण्यात करण्यात आला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी माचेवाड यांनी सांगितले.