शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

औरंगाबाद जिल्ह्यात अडीच लाख कुटुंबीय ‘आयुष्यमान भारत’चे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:05 IST

औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्दे पाच लाखांपर्यंत उपचार : पहिल्या टप्प्यात शासकीय, तर दुसऱ्या टप्प्यात खाजगी रुग्णालयांत योजना

औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.‘आयुष्यमान भारत’ म्हणजे राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण, कोणत्याही आजारावर देशभरातील रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. आरोग्य विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.राज्यात २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ सुमारे ८३ लाख लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १ लाख ४७ हजार कुटुंबीय, तर शहरात सुमारे ९५ हजार कुटुंबीय या योजनेचे लाभार्थी आहेत. किमान १२ लाखांवर लोकांना या योजनेतून उपचार मिळणार आहेत. या योजनेबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनाही सुरू राहणार आहे.घाटीत उपचारपहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा, महिला रुग्णालयांत या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होणार आहे. औरंगाबादेत जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित नसल्याने केवळ घाटी रुग्णालयात या योजनेतून उपचार होणार आहेत. योजनेतून होणारे उपचार होणार, योजनेची अंमलबजावणी आदींसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे देण्यात येणार आहे.योजनेचा पहिला टप्पाआगामी काही दिवसांत लाभार्थीच्या संख्येत आणखी वाढ होईल. पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय, जिल्हा रुग्णालयांत, महिला रुग्णालयांत ही योजना राबविण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल