शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

औरंगाबाद जिल्ह्यात अडीच लाख कुटुंबीय ‘आयुष्यमान भारत’चे लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:05 IST

औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.

ठळक मुद्दे पाच लाखांपर्यंत उपचार : पहिल्या टप्प्यात शासकीय, तर दुसऱ्या टप्प्यात खाजगी रुग्णालयांत योजना

औरंगाबाद : ‘आयुष्यमान भारत’ म्हणजे ‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ २३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील अडीच लाख कुटुंबियांना लाभ मिळणार आहे.‘आयुष्यमान भारत’ म्हणजे राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेंतर्गत एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण, कोणत्याही आजारावर देशभरातील रुग्णालयात लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहे. आरोग्य विभागाकडून शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे, अशाच कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे.राज्यात २०११ मध्ये झालेले सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) केवळ सुमारे ८३ लाख लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १ लाख ४७ हजार कुटुंबीय, तर शहरात सुमारे ९५ हजार कुटुंबीय या योजनेचे लाभार्थी आहेत. किमान १२ लाखांवर लोकांना या योजनेतून उपचार मिळणार आहेत. या योजनेबरोबरच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनाही सुरू राहणार आहे.घाटीत उपचारपहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा, महिला रुग्णालयांत या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होणार आहे. औरंगाबादेत जिल्हा सामान्य रुग्णालय कार्यान्वित नसल्याने केवळ घाटी रुग्णालयात या योजनेतून उपचार होणार आहेत. योजनेतून होणारे उपचार होणार, योजनेची अंमलबजावणी आदींसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे देण्यात येणार आहे.योजनेचा पहिला टप्पाआगामी काही दिवसांत लाभार्थीच्या संख्येत आणखी वाढ होईल. पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालय, जिल्हा रुग्णालयांत, महिला रुग्णालयांत ही योजना राबविण्यात येणार आहे. दुसºया टप्प्यात खाजगी रुग्णालयांचा समावेश होईल. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल