शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जनहितैषी चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:09 IST

बुकशेल्फ : ‘समाजपरिवर्तनाच्या दिशेने’ हे, प्रगत आणि प्रगल्भ मानसिकतेचे धनी असलेले विचारवंत, लेखक अ‍ॅड. डी.आर. शेळके यांनी यथास्थित लिहिलेल्या चौपन्न लेखांचे ग्रंथस्वरूप संकलन आहे.

- डॉ. बलभीमराज गोरे

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांची या ग्रंथास अत्यंत अभ्यासपूर्ण, समर्पक तथा प्रशस्त आणि म्हणूनच प्रतिष्ठापूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे. ग्रंथातील एकूण एक विषय वस्तूच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेला सार-स्वरूप परामर्श निश्चितच विचारणीय आहे. प्रस्तावनेतील अक्षर-अक्षरांतून त्यांनी घेतलेल्या कष्टांची प्रचीती येते.

ग्रंथातून लेखक या नात्याने माजी न्यायाधीश डी.आर. शेळके यांनी व्यक्त केलेले मनोगत, सोपस्काराचाच एक भाग असले, तरी ते लेखकाचा उपजत पिंड जाणून घेण्याच्या दृष्टीने तसेच लेखांतून त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांच्या मुळातील भूमिकेस समजून घेण्याच्या दृष्टीने पूरक आहे. आपण आधी मराठा सेवा संघाचे काम केले आहे; पण हल्ली आपण सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय असल्याचे विनम्र तथा प्रामाणिक विधान म्हणजे लेखकाने, स्वत:हून कबूल केलेला आपल्या रूढ विचारसणीतील ‘यू-टर्न ’ आहे. एक व्यक्ती या नात्याने ज्या लेखकाच्या मनावर महात्मा फुले यांच्या विचारांचा सखोल प्रभाव आहे आणि ज्या लेखकास साक्षात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभले आहे, त्यांच्या विचारसरणीत उल्लेखित ‘यू-टर्न’ आला नसता तरच नवल!...

या ‘यू-टर्न’मुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे ती ही की, आपल्या ग्रंथातून अ‍ॅड. शेळके यांनी जे चौपन्न लेख संकलित केले आहेत त्या सर्वच्या सर्व लेखांची प्रकृती आणि ती मधील पोटतिडीक लगेच दिसू लागते, तिचे आकलन होते आणि ते काळजाला भिडते. कारण वाचकांना ती संभ्रमात टाकीत नाही. शिवाय प्रत्येक लेखाचे मथळे इतके सुस्पष्ट आहेत की, जणू ते लेखकाचे अंतिम वक्तव्य वाटावेत. मथळ्यांचे आशय-विषय एक-दुसर्‍याच्या तुलनेत कितीही भिन्न असले तरी अंततोगत्व : लेखकाने, ‘माणूस’ आणि समाजजीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील बहुतेक सर्व प्रश्नांना ज्या-त्यावेळी मोठ्या धाडसाने ऐरणीवर घेण्याचे काम केले आहे. लेख परखड असले तरी त्यातील मांडणी समतोल व विवेकनिष्ठ आहे. ‘समाजपरिवर्तनाच्या दिशेने’ या ग्रंथात सामान्यत: अकरा लेख असे आहेत की, ज्यांना निक्षून सामाजिक पृष्ठभूमी आहे. सात लेख काहीसे राजकीय स्वरूपाचे, सात प्रबोधनात्मक, बारा वैचारिक, तर सतरा नितांत संवेदनशील असे विषय आहेत.

सर्व लेख सर्व स्तरांतील आणि सर्व जाती-धर्मांतील समाजासाठी वाचनीय आहेत; पण त्यातून व्यक्ती आणि समाजजीवनात अशात जे काही चालले आहे त्यासंबंधी लेखक स्वत:च्या ठिकाणी गंभीर आहे. यामुळेच तो असमाधानी आहे आणि मननशील परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. लेखक अ‍ॅड. डी.आर. शेळके हे कायद्याचे अभ्यासक असण्याबरोबरच व्यापक जनहितैषी असल्यामुळे त्यांच्यातील लेखनसामर्थ्य आणि तर्कबुद्धीला चांगलाच दुजोरा आणि बळकटी मिळत गेली आहे. पुस्तक मन:पूर्वक वाचून झाल्यानंतर अनेकांची विचार करण्याची दिशा बदलावी, निश्चितच या ताकदीचा हा लेखन प्रपंच आहे.