शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
5
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
6
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
7
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
8
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
9
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
10
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
11
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
12
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
13
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
14
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
15
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
16
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
17
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
18
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
19
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
20
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जनहितैषी चिंतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 18:09 IST

बुकशेल्फ : ‘समाजपरिवर्तनाच्या दिशेने’ हे, प्रगत आणि प्रगल्भ मानसिकतेचे धनी असलेले विचारवंत, लेखक अ‍ॅड. डी.आर. शेळके यांनी यथास्थित लिहिलेल्या चौपन्न लेखांचे ग्रंथस्वरूप संकलन आहे.

- डॉ. बलभीमराज गोरे

सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांची या ग्रंथास अत्यंत अभ्यासपूर्ण, समर्पक तथा प्रशस्त आणि म्हणूनच प्रतिष्ठापूर्ण अशी प्रस्तावना लाभलेली आहे. ग्रंथातील एकूण एक विषय वस्तूच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेला सार-स्वरूप परामर्श निश्चितच विचारणीय आहे. प्रस्तावनेतील अक्षर-अक्षरांतून त्यांनी घेतलेल्या कष्टांची प्रचीती येते.

ग्रंथातून लेखक या नात्याने माजी न्यायाधीश डी.आर. शेळके यांनी व्यक्त केलेले मनोगत, सोपस्काराचाच एक भाग असले, तरी ते लेखकाचा उपजत पिंड जाणून घेण्याच्या दृष्टीने तसेच लेखांतून त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांच्या मुळातील भूमिकेस समजून घेण्याच्या दृष्टीने पूरक आहे. आपण आधी मराठा सेवा संघाचे काम केले आहे; पण हल्ली आपण सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय असल्याचे विनम्र तथा प्रामाणिक विधान म्हणजे लेखकाने, स्वत:हून कबूल केलेला आपल्या रूढ विचारसणीतील ‘यू-टर्न ’ आहे. एक व्यक्ती या नात्याने ज्या लेखकाच्या मनावर महात्मा फुले यांच्या विचारांचा सखोल प्रभाव आहे आणि ज्या लेखकास साक्षात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सान्निध्य लाभले आहे, त्यांच्या विचारसरणीत उल्लेखित ‘यू-टर्न’ आला नसता तरच नवल!...

या ‘यू-टर्न’मुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे ती ही की, आपल्या ग्रंथातून अ‍ॅड. शेळके यांनी जे चौपन्न लेख संकलित केले आहेत त्या सर्वच्या सर्व लेखांची प्रकृती आणि ती मधील पोटतिडीक लगेच दिसू लागते, तिचे आकलन होते आणि ते काळजाला भिडते. कारण वाचकांना ती संभ्रमात टाकीत नाही. शिवाय प्रत्येक लेखाचे मथळे इतके सुस्पष्ट आहेत की, जणू ते लेखकाचे अंतिम वक्तव्य वाटावेत. मथळ्यांचे आशय-विषय एक-दुसर्‍याच्या तुलनेत कितीही भिन्न असले तरी अंततोगत्व : लेखकाने, ‘माणूस’ आणि समाजजीवनाशी संबंधित सर्व क्षेत्रांतील बहुतेक सर्व प्रश्नांना ज्या-त्यावेळी मोठ्या धाडसाने ऐरणीवर घेण्याचे काम केले आहे. लेख परखड असले तरी त्यातील मांडणी समतोल व विवेकनिष्ठ आहे. ‘समाजपरिवर्तनाच्या दिशेने’ या ग्रंथात सामान्यत: अकरा लेख असे आहेत की, ज्यांना निक्षून सामाजिक पृष्ठभूमी आहे. सात लेख काहीसे राजकीय स्वरूपाचे, सात प्रबोधनात्मक, बारा वैचारिक, तर सतरा नितांत संवेदनशील असे विषय आहेत.

सर्व लेख सर्व स्तरांतील आणि सर्व जाती-धर्मांतील समाजासाठी वाचनीय आहेत; पण त्यातून व्यक्ती आणि समाजजीवनात अशात जे काही चालले आहे त्यासंबंधी लेखक स्वत:च्या ठिकाणी गंभीर आहे. यामुळेच तो असमाधानी आहे आणि मननशील परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. लेखक अ‍ॅड. डी.आर. शेळके हे कायद्याचे अभ्यासक असण्याबरोबरच व्यापक जनहितैषी असल्यामुळे त्यांच्यातील लेखनसामर्थ्य आणि तर्कबुद्धीला चांगलाच दुजोरा आणि बळकटी मिळत गेली आहे. पुस्तक मन:पूर्वक वाचून झाल्यानंतर अनेकांची विचार करण्याची दिशा बदलावी, निश्चितच या ताकदीचा हा लेखन प्रपंच आहे.