शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ असे होऊ नये; अंबादास दानवेंचा खासदार जलील यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:45 IST

घरकुलासाठी केंद्र आणि राज्याचा निधी असतो. त्यामुळे केवळ आम्हीच केले, असे आम्ही म्हणणार नाही.

औरंगाबाद : घरकुल योजनेसाठी जमीन राज्य शासनाने दिली. त्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यावर महसूलमंत्र्यांनी जमीन उपलब्ध करून दिली. त्यातील काही गोष्टी अडल्या होत्या. त्यासाठी सर्वांनीच पाठपुरावा केला. ज्या गोष्टी होणार, त्याचे श्रेय लाटून ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ असे होऊ नये, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख, आ. अंबादास दानवे यांनी लगावला. त्यांचा रोख खा. इम्तियाज जलील यांच्याकडे होता.

विधान परिषदेत त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या मागण्या व पाठपुराव्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी घरकुल योजनेतील श्रेयवादावर बोलताना ते म्हणाले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. घरकुलासाठी केंद्र आणि राज्याचा निधी असतो. त्यामुळे केवळ आम्हीच केले, असे आम्ही म्हणणार नाही. इम्तियाज जलील हे जिल्ह्याचे खासदार असल्याने पाठपुरावा करणे त्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील विकासकामे ही सामूहिक प्रयत्नांतून होत असताना ‘मीच केले’, असे म्हणणे योग्य नसल्याचे आ. दानवे यांनी स्पष्ट केले.

वैजापूर, गंगापूरमध्ये वाॅटर ग्रीडला लवकरच मिळेल निधी३९ तारांकित, ६ अतारांकित, २१ लक्षवेधी, १ औचित्याचा मुद्दा, ६ विशेष उल्लेख, ५ अशासकीय ठराव, दोन चर्चेत सहभाग घेत विधिमंडळातील १३ पैकी ११ आयुधे वापरून जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. वाॅटर ग्रीड योजनेसाठी वैजापूर, गंगापूर तालुक्यांसाठी लवकरच निधीची तरतूद होऊन मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होईल. पर्यावरण विभागासाठी जिल्ह्याला ५१ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, खंडोबा मंदिर, क्रांती चाैक परिसरातील पोलीस वसाहत, रिंगरोड, निजामकालीन शाळा विकासाला वाचा फोडल्याचे ते म्हणाले.

‘अलर्ट’ आमदारांना निधी मिळतोकाॅंग्रेसच्या आमदारांतील निधीसंदर्भातील नाराजीसंदर्भातील आ. दानवे म्हणाले, ‘अलर्ट’ आमदारांना निधी मिळतो. सप्टेंबरपासून अर्थसंकल्पासाठी तयारी करावी लागते. हिवाळी, पावसाळी पुरवणी मागण्यांसाठी अलर्ट राहावे लागते. जे अलर्ट राहतात, त्यांना निधी मिळतो. ज्यांना निधी मिळत नाही, ते कमी पडले असावेत.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद