शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

‘बेगाने शादी में अब्दुला दिवाना’ असे होऊ नये; अंबादास दानवेंचा खासदार जलील यांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 14:45 IST

घरकुलासाठी केंद्र आणि राज्याचा निधी असतो. त्यामुळे केवळ आम्हीच केले, असे आम्ही म्हणणार नाही.

औरंगाबाद : घरकुल योजनेसाठी जमीन राज्य शासनाने दिली. त्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यावर महसूलमंत्र्यांनी जमीन उपलब्ध करून दिली. त्यातील काही गोष्टी अडल्या होत्या. त्यासाठी सर्वांनीच पाठपुरावा केला. ज्या गोष्टी होणार, त्याचे श्रेय लाटून ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ असे होऊ नये, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख, आ. अंबादास दानवे यांनी लगावला. त्यांचा रोख खा. इम्तियाज जलील यांच्याकडे होता.

विधान परिषदेत त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या मागण्या व पाठपुराव्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी घरकुल योजनेतील श्रेयवादावर बोलताना ते म्हणाले, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड शहराच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. घरकुलासाठी केंद्र आणि राज्याचा निधी असतो. त्यामुळे केवळ आम्हीच केले, असे आम्ही म्हणणार नाही. इम्तियाज जलील हे जिल्ह्याचे खासदार असल्याने पाठपुरावा करणे त्यांची जबाबदारी आहे. जिल्ह्यातील विकासकामे ही सामूहिक प्रयत्नांतून होत असताना ‘मीच केले’, असे म्हणणे योग्य नसल्याचे आ. दानवे यांनी स्पष्ट केले.

वैजापूर, गंगापूरमध्ये वाॅटर ग्रीडला लवकरच मिळेल निधी३९ तारांकित, ६ अतारांकित, २१ लक्षवेधी, १ औचित्याचा मुद्दा, ६ विशेष उल्लेख, ५ अशासकीय ठराव, दोन चर्चेत सहभाग घेत विधिमंडळातील १३ पैकी ११ आयुधे वापरून जिल्ह्यासह मराठवाड्यातील विविध ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली. वाॅटर ग्रीड योजनेसाठी वैजापूर, गंगापूर तालुक्यांसाठी लवकरच निधीची तरतूद होऊन मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्र्यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होईल. पर्यावरण विभागासाठी जिल्ह्याला ५१ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, खंडोबा मंदिर, क्रांती चाैक परिसरातील पोलीस वसाहत, रिंगरोड, निजामकालीन शाळा विकासाला वाचा फोडल्याचे ते म्हणाले.

‘अलर्ट’ आमदारांना निधी मिळतोकाॅंग्रेसच्या आमदारांतील निधीसंदर्भातील नाराजीसंदर्भातील आ. दानवे म्हणाले, ‘अलर्ट’ आमदारांना निधी मिळतो. सप्टेंबरपासून अर्थसंकल्पासाठी तयारी करावी लागते. हिवाळी, पावसाळी पुरवणी मागण्यांसाठी अलर्ट राहावे लागते. जे अलर्ट राहतात, त्यांना निधी मिळतो. ज्यांना निधी मिळत नाही, ते कमी पडले असावेत.

टॅग्स :Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAmbadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबाद