शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांना ‘परफ्यूम’चे आकर्षण; हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांतील पोळे हलवणार

By उदयकुमार जैन | Updated: June 6, 2025 12:57 IST

पर्यटकांवरील हल्ल्यानंतर युद्धपातळीवर हालचाली

उदयकुमार जैन, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: आग्या मोहळच्या माश्यांना परफ्यूम अर्थात अत्तराच्या काही विशिष्ट फ्लेवर्सचे आकर्षण असते. शिवाय विडी-सिगारेटचा धूर, गोंगाट या कारणातूनही माश्या पर्यटकांवर हल्ले करतात. तीन दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतही तेच घडले. असे हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांमधील आग्या मोहळचे पोळे जवळच जंगलात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मधमाश्यांचे पोळे वाचेल, शिवाय पर्यटकांवरील हल्लेदेखील थांबतील.

अजिंठा लेणीत मंगळवारी आग्या मोहळच्या माश्यांनी पुण्यातील ५० पर्यटकांवर हल्ला केला. गेल्या ४ महिन्यांत ८०० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक उपवन संरक्षक कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. पुरातत्व विभाग आणि वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लेणीत ८ ते १० पोळे आहेत.  वारंवार हल्ले करणारे तीन पोळे जवळच स्थलांतरित करण्याचा निर्णय या बैठकीत घतेली, अशी माहिती प्रादेशिक उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी  दिली. 

प्रथमोपचाराचीही सुविधा नाही

हल्ला करणाऱ्या मधमाश्या या आग्या मोहळाच्या असल्याने त्याच्या वेदना जीवघेण्या असतात. अशा वेळी अजिंठा लेण्यांत प्रथमोपचारांचीही सुविधा नाही. रुग्णालयात जाऊनच उपचार घ्यावे लागतात.

पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?

विशिष्ट परफ्यूम, रंगीबेरंगी कपडे याकडे कीटक, वन्यजीव व मधमाश्या आकर्षित होतात. त्यामुळे जंगलात किंवा लेण्यांसारख्या ठिकाणी जाताना परफ्यूम, असे कपडे वापरू नयेत. वन्यजीवांना गोंगाट आवडत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शांतता बाळगावी. विडी-सिगारेटच्या धुरामुळेदेखील मधमाश्या आक्रमक होऊ शकतात. हे सोबत नेणे टाळावे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञ किशोर पाठक यांनी दिला. 

व्यावसायिक आर्थिक संकटात

शेकडो वर्षांपासून ही समस्या आहे. बऱ्याच वेळा स्थानिक पातळीवर यावर उपाय केला जायचा. परंतु आता कायदा, नियमांचा बाऊ करून याकडे दुर्लक्ष होत आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे वाईट संदेश जात आहे. यामुळे पर्यटकांची संख्या कमी व्हायला नको. स्थानिक व्यावसायिक यामुळे धास्तावले आहेत, असे अजिंठा लेणी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पपिंद्रपालसिंग वाय. टी. यांनी सांगितले.

शिवनेरी किल्ल्यावरही अशीच समस्या होती, तेथे ज्या रेस्क्यू टीमने काम केले होते, त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. लवकरच ही टीम मधमाश्यांना कुठलीही हानी न पोहोचवता पोळे स्थलांतरित करणार आहेत. -संतोष ठोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी

अजिंठा प्रमाणेच वेरूळ, पितळखोरा, नाशिकच्या पांडव लेण्यांसह आमच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व लेण्यांत हीच समस्या आहे. त्यामुळे येथेही आग्या मोहळ पोळ जवळच्या जंगलात स्थलांतरित केले जाईल.  -मनोज पवार, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळ