शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

मधमाशांना ‘परफ्यूम’चे आकर्षण; हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांतील पोळे हलवणार

By उदयकुमार जैन | Updated: June 6, 2025 12:57 IST

पर्यटकांवरील हल्ल्यानंतर युद्धपातळीवर हालचाली

उदयकुमार जैन, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: आग्या मोहळच्या माश्यांना परफ्यूम अर्थात अत्तराच्या काही विशिष्ट फ्लेवर्सचे आकर्षण असते. शिवाय विडी-सिगारेटचा धूर, गोंगाट या कारणातूनही माश्या पर्यटकांवर हल्ले करतात. तीन दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतही तेच घडले. असे हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांमधील आग्या मोहळचे पोळे जवळच जंगलात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मधमाश्यांचे पोळे वाचेल, शिवाय पर्यटकांवरील हल्लेदेखील थांबतील.

अजिंठा लेणीत मंगळवारी आग्या मोहळच्या माश्यांनी पुण्यातील ५० पर्यटकांवर हल्ला केला. गेल्या ४ महिन्यांत ८०० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक उपवन संरक्षक कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. पुरातत्व विभाग आणि वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लेणीत ८ ते १० पोळे आहेत.  वारंवार हल्ले करणारे तीन पोळे जवळच स्थलांतरित करण्याचा निर्णय या बैठकीत घतेली, अशी माहिती प्रादेशिक उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी  दिली. 

प्रथमोपचाराचीही सुविधा नाही

हल्ला करणाऱ्या मधमाश्या या आग्या मोहळाच्या असल्याने त्याच्या वेदना जीवघेण्या असतात. अशा वेळी अजिंठा लेण्यांत प्रथमोपचारांचीही सुविधा नाही. रुग्णालयात जाऊनच उपचार घ्यावे लागतात.

पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?

विशिष्ट परफ्यूम, रंगीबेरंगी कपडे याकडे कीटक, वन्यजीव व मधमाश्या आकर्षित होतात. त्यामुळे जंगलात किंवा लेण्यांसारख्या ठिकाणी जाताना परफ्यूम, असे कपडे वापरू नयेत. वन्यजीवांना गोंगाट आवडत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शांतता बाळगावी. विडी-सिगारेटच्या धुरामुळेदेखील मधमाश्या आक्रमक होऊ शकतात. हे सोबत नेणे टाळावे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञ किशोर पाठक यांनी दिला. 

व्यावसायिक आर्थिक संकटात

शेकडो वर्षांपासून ही समस्या आहे. बऱ्याच वेळा स्थानिक पातळीवर यावर उपाय केला जायचा. परंतु आता कायदा, नियमांचा बाऊ करून याकडे दुर्लक्ष होत आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे वाईट संदेश जात आहे. यामुळे पर्यटकांची संख्या कमी व्हायला नको. स्थानिक व्यावसायिक यामुळे धास्तावले आहेत, असे अजिंठा लेणी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पपिंद्रपालसिंग वाय. टी. यांनी सांगितले.

शिवनेरी किल्ल्यावरही अशीच समस्या होती, तेथे ज्या रेस्क्यू टीमने काम केले होते, त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. लवकरच ही टीम मधमाश्यांना कुठलीही हानी न पोहोचवता पोळे स्थलांतरित करणार आहेत. -संतोष ठोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी

अजिंठा प्रमाणेच वेरूळ, पितळखोरा, नाशिकच्या पांडव लेण्यांसह आमच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व लेण्यांत हीच समस्या आहे. त्यामुळे येथेही आग्या मोहळ पोळ जवळच्या जंगलात स्थलांतरित केले जाईल.  -मनोज पवार, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळ